शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या अधिसूचनेने मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होणार का?, संजय राऊत यांचा सवाल

By बापू सोळुंके | Updated: January 27, 2024 19:38 IST

मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटावा, अशी सर्वांचीच राजकारण पलीकडे जाऊन इच्छा होती.

छत्रपती संभाजीनगर : शासनाने काढलेल्या अधिसूचनेनंतर मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होणार आहेत का, असा सवाल शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला. यापुढे मनोज जरांगे आणि मराठा समाजावर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली

वैजापूर येथील एका नियोजित कार्यक्रमासाठी खा. राऊत शुक्रवारी रात्री शहरात मुक्कामी होते. शनिवारी सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून सामाजिक वातावरण तणावाखाली होत ढवळून निघाले. जरांगे पाटील लाखो लोक घेऊन मुंबईला निघाले होते. मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटावा, अशी सर्वांचीच राजकारण पलीकडे जाऊन इच्छा होती. यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना जाऊन भेटावे, अशी मागणी दोन दिवसांपूर्वी केली होती. शनिवारी मुख्यमंत्री जरांगे पाटील यांना भेटले. सरकारने काढलेल्या अध्यादेशात मागण्या पूर्ण होत आहेत का, हा मुख्य सवाल असल्याचे ते म्हणाले. ओबीसीचे सर्व मोठे नेते भाजपसोबत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

राम मंदिर झाल्यानंतर देशात रामराज्य आल्याचे बोलले जात आहे, याकडे तुम्ही कसे पाहता याविषयी शिवसेना नेते म्हणाले, देशात रामराज्य नव्हे तर पलटूरामाचे राज्य आलेले आहे. नितीशकुमारांसाठी भाजपचे रस्ते बंद आहेत. अमित शाह यांनी पाटणा येथे जाऊन ‘पलटी कुणी मारली?’ असा सवाल नितीशकुमारांना केला आहे. मग आता पलटी कोण मारतंय? रामराज्य आले असते तर राज्यात एवढ्या शेतकरी आत्महत्या झाल्या नसत्या, असेही ते म्हणाले. यापेक्षा रावणाचे राज्य चांगले होते, अशी खोचक टीकाही त्यांनी केंद्र सरकारवर केली.

प्रकाश आंबेडकर यांच्यावर संविधान रक्षणाची जबाबदारीकुणी देशात भाजपला मदत करीत आहेत का? या प्रश्नाचे उत्तर देताना खा. राऊत म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे भाजपला मदत होईल, असे त्यांच्याकडून होऊ देणार नाहीत. प्रकाश आंबेडकर यांच्यावर संविधानाच्या रक्षणाची सर्वात जास्त जबाबदारी आहे. भाजपचा पराभव करायचा आहे, असे आमचे ठरल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतMaratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबाद