शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या अधिसूचनेने मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होणार का?, संजय राऊत यांचा सवाल

By बापू सोळुंके | Updated: January 27, 2024 19:38 IST

मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटावा, अशी सर्वांचीच राजकारण पलीकडे जाऊन इच्छा होती.

छत्रपती संभाजीनगर : शासनाने काढलेल्या अधिसूचनेनंतर मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होणार आहेत का, असा सवाल शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला. यापुढे मनोज जरांगे आणि मराठा समाजावर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली

वैजापूर येथील एका नियोजित कार्यक्रमासाठी खा. राऊत शुक्रवारी रात्री शहरात मुक्कामी होते. शनिवारी सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून सामाजिक वातावरण तणावाखाली होत ढवळून निघाले. जरांगे पाटील लाखो लोक घेऊन मुंबईला निघाले होते. मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटावा, अशी सर्वांचीच राजकारण पलीकडे जाऊन इच्छा होती. यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना जाऊन भेटावे, अशी मागणी दोन दिवसांपूर्वी केली होती. शनिवारी मुख्यमंत्री जरांगे पाटील यांना भेटले. सरकारने काढलेल्या अध्यादेशात मागण्या पूर्ण होत आहेत का, हा मुख्य सवाल असल्याचे ते म्हणाले. ओबीसीचे सर्व मोठे नेते भाजपसोबत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

राम मंदिर झाल्यानंतर देशात रामराज्य आल्याचे बोलले जात आहे, याकडे तुम्ही कसे पाहता याविषयी शिवसेना नेते म्हणाले, देशात रामराज्य नव्हे तर पलटूरामाचे राज्य आलेले आहे. नितीशकुमारांसाठी भाजपचे रस्ते बंद आहेत. अमित शाह यांनी पाटणा येथे जाऊन ‘पलटी कुणी मारली?’ असा सवाल नितीशकुमारांना केला आहे. मग आता पलटी कोण मारतंय? रामराज्य आले असते तर राज्यात एवढ्या शेतकरी आत्महत्या झाल्या नसत्या, असेही ते म्हणाले. यापेक्षा रावणाचे राज्य चांगले होते, अशी खोचक टीकाही त्यांनी केंद्र सरकारवर केली.

प्रकाश आंबेडकर यांच्यावर संविधान रक्षणाची जबाबदारीकुणी देशात भाजपला मदत करीत आहेत का? या प्रश्नाचे उत्तर देताना खा. राऊत म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे भाजपला मदत होईल, असे त्यांच्याकडून होऊ देणार नाहीत. प्रकाश आंबेडकर यांच्यावर संविधानाच्या रक्षणाची सर्वात जास्त जबाबदारी आहे. भाजपचा पराभव करायचा आहे, असे आमचे ठरल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतMaratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबाद