शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

सरकारच्या अधिसूचनेने मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होणार का?, संजय राऊत यांचा सवाल

By बापू सोळुंके | Updated: January 27, 2024 19:38 IST

मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटावा, अशी सर्वांचीच राजकारण पलीकडे जाऊन इच्छा होती.

छत्रपती संभाजीनगर : शासनाने काढलेल्या अधिसूचनेनंतर मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होणार आहेत का, असा सवाल शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला. यापुढे मनोज जरांगे आणि मराठा समाजावर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली

वैजापूर येथील एका नियोजित कार्यक्रमासाठी खा. राऊत शुक्रवारी रात्री शहरात मुक्कामी होते. शनिवारी सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून सामाजिक वातावरण तणावाखाली होत ढवळून निघाले. जरांगे पाटील लाखो लोक घेऊन मुंबईला निघाले होते. मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटावा, अशी सर्वांचीच राजकारण पलीकडे जाऊन इच्छा होती. यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना जाऊन भेटावे, अशी मागणी दोन दिवसांपूर्वी केली होती. शनिवारी मुख्यमंत्री जरांगे पाटील यांना भेटले. सरकारने काढलेल्या अध्यादेशात मागण्या पूर्ण होत आहेत का, हा मुख्य सवाल असल्याचे ते म्हणाले. ओबीसीचे सर्व मोठे नेते भाजपसोबत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

राम मंदिर झाल्यानंतर देशात रामराज्य आल्याचे बोलले जात आहे, याकडे तुम्ही कसे पाहता याविषयी शिवसेना नेते म्हणाले, देशात रामराज्य नव्हे तर पलटूरामाचे राज्य आलेले आहे. नितीशकुमारांसाठी भाजपचे रस्ते बंद आहेत. अमित शाह यांनी पाटणा येथे जाऊन ‘पलटी कुणी मारली?’ असा सवाल नितीशकुमारांना केला आहे. मग आता पलटी कोण मारतंय? रामराज्य आले असते तर राज्यात एवढ्या शेतकरी आत्महत्या झाल्या नसत्या, असेही ते म्हणाले. यापेक्षा रावणाचे राज्य चांगले होते, अशी खोचक टीकाही त्यांनी केंद्र सरकारवर केली.

प्रकाश आंबेडकर यांच्यावर संविधान रक्षणाची जबाबदारीकुणी देशात भाजपला मदत करीत आहेत का? या प्रश्नाचे उत्तर देताना खा. राऊत म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे भाजपला मदत होईल, असे त्यांच्याकडून होऊ देणार नाहीत. प्रकाश आंबेडकर यांच्यावर संविधानाच्या रक्षणाची सर्वात जास्त जबाबदारी आहे. भाजपचा पराभव करायचा आहे, असे आमचे ठरल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतMaratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबाद