शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
4
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
5
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
6
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
7
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
8
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
9
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
10
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
11
शाब्बास पोरा! ६ वेळा नापास, ३ वेळा UPSC क्रॅक; शेतकरी वडिलांच्या सल्ल्याने लेक झाला IPS
12
Navratri 2025: अश्विन शुद्ध सप्तमीला सरस्वतीला आवाहन आणि दशमीला पूजन; ३ दिवसांचा शारदोत्सव का?
13
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
14
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
15
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
16
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
17
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
18
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
19
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
20
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...

शासनाच्या अनुदान योजनेसाठी नवलेखक उत्साह दाखवतील का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 17:14 IST

मराठी साहित्याची गौरवशाली परंपरा पुढे चालविण्यासाठी नवनवीन साहित्यिक लिहिते होणे गरजेचे आहे. ही गरज ओळखून मराठी भाषेबद्दल नेहमीच ‘शाब्दिक’ जिव्हाळा बाळगणारे राज्य शासनदेखील कार्यपरिहार्यतेतून का होईना, पण दरवर्षी नवलेखकांसाठी अनुदान देते; मात्र नवलेखक दरवेळीच या योजनेकडे पाठ फिरवताना दिसतात. 

ठळक मुद्देराज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे नवीन लेखकांच्या पहिल्या प्रकाशनासाठी उत्तेजनार्थ ‘नवलेखक अनुदान योजना’ राबवली जाते. या योजनेकरिता सन २०१८ वर्षासाठी १ ते ३१ जानेवारीदरम्यान अर्ज मागविण्यात येत आहेत;मात्र गेल्या दोन वर्षांत उणेपुरे शंभर अर्जदेखील आले नसल्याने या योजनेच्या यशस्वीतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

औरंगाबाद : मराठी साहित्याची गौरवशाली परंपरा पुढे चालविण्यासाठी नवनवीन साहित्यिक लिहिते होणे गरजेचे आहे. ही गरज ओळखून मराठी भाषेबद्दल नेहमीच ‘शाब्दिक’ जिव्हाळा बाळगणारे राज्य शासनदेखील कार्यपरिहार्यतेतून का होईना, पण दरवर्षी नवलेखकांसाठी अनुदान देते; मात्र नवलेखक दरवेळीच या योजनेकडे पाठ फिरवताना दिसतात. 

राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे नवीन लेखकांच्या पहिल्या प्रकाशनासाठी उत्तेजनार्थ ‘नवलेखक अनुदान योजना’ राबवली जाते. या योजनेकरिता सन २०१८ वर्षासाठी १ ते ३१ जानेवारीदरम्यान अर्ज मागविण्यात येत आहेत; मात्र गेल्या दोन वर्षांत उणेपुरे शंभर अर्जदेखील आले नसल्याने या योजनेच्या यशस्वीतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

योजनेला मिळणारा अत्यल्प प्रतिसाद नेहमीच चिंतेचा विषय राहिलेला आहे. २०१६ साली नवलेखक अनुदान योजनेकरिता केवळ ४८ अर्ज, तर २०१७ साली ७३ अर्ज आले होते. मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड यांनी पुढील वर्षी २०० अर्ज तरी यावेत, अशी इच्छा व्यक्त केली होती. यंदा तरी ती पूर्ण होईल का, हा खरा प्रश्न आहे. या योजनेंतर्गत एकही पुस्तक प्रकाशित न झालेल्या लेखकाच्या ललित व ललितेतर साहित्याचा विचार केला जातो. कवितासंग्रह, कथासंग्रह, नाटक/एकांकिका, कादंबरी, बालवाङ्मय, इतर वैचारिक, तसेच चरित्र आत्मचरित्र, प्रवासवर्णनात्मक  स्वरूपाचे लेखन अशा विविध साहित्य प्रकारातील प्रथम प्रकाशनासाठी अनुदान दिले जाते. विशेष म्हणजे केवळ ५०० प्रतींसाठी हे अनुदान असते. या ५०० प्रती छापण्यासाठी मंडळाकडून ठरवून दिलेल्या प्रकाशननिर्मिती खर्चाच्या

केवळ ७५ टक्के अनुदान देण्यात येते.अर्ज केलेल्या नवलेखकांच्या सहित्याची त्या-त्या साहित्य प्रकारातील तज्ज्ञांकडून तपासणी करून त्यांचा अभिप्राय घेतला जातो. त्यांची अनुकूलता मिळाल्यास किमान एका वर्षाच्या आत अनुदानविषयक निर्णय घेण्यात येतो. अनुदानास पात्र ठरलेल्या पुस्तकाच्या नवलेखकाला मंडळाने ठरवून दिल्याप्रमाणे प्रकाशकांकडून वाङ्मय प्रकारानुसार ७५० ते १५०० रुपये मानधन देण्यात येते.

यंदा २०० अर्जांची इच्छायोजनेला मिळणारा अत्यल्प प्रतिसाद नेहमीच चिंतेचा विषय राहिलेला आहे. २०१६ साली नवलेखक अनुदान योजनेकरिता केवळ ४८ अर्ज, तर २०१७ साली ७३ अर्ज आले होते. मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड यांनी पुढील वर्षी २०० अर्ज तरी यावेत, अशी इच्छा व्यक्त केली होती. यंदा तरी ती पूर्ण होईल का, हा खरा प्रश्न आहे.

भीमसेन जोशी युवा शिष्यवृत्तीसाठी अर्ज सुरूराज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे देण्यात येणाºया भारतरत्न पं. भीमसेन जोशी युवा शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. शास्त्रीय संगीतामध्ये वादन आणि गायन प्रकारात शिक्षण घेणाºया हुशार व गरजू विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी ही शिष्यवृत्ती देण्यात येते.योजनेंतर्गत दरवर्षी सहा गायक व सहा वादक अशा एकूण १२ विद्यार्थ्यांना दोन वर्षांकरिता प्रतिमाह पाच हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १६ जानेवारी असून, नियम व अटी शासनाच्या संकेतस्थळावर दिलेल्या आहेत, अशी माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

टॅग्स :literatureसाहित्यAurangabadऔरंगाबाद