शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

शासनाच्या अनुदान योजनेसाठी नवलेखक उत्साह दाखवतील का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 17:14 IST

मराठी साहित्याची गौरवशाली परंपरा पुढे चालविण्यासाठी नवनवीन साहित्यिक लिहिते होणे गरजेचे आहे. ही गरज ओळखून मराठी भाषेबद्दल नेहमीच ‘शाब्दिक’ जिव्हाळा बाळगणारे राज्य शासनदेखील कार्यपरिहार्यतेतून का होईना, पण दरवर्षी नवलेखकांसाठी अनुदान देते; मात्र नवलेखक दरवेळीच या योजनेकडे पाठ फिरवताना दिसतात. 

ठळक मुद्देराज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे नवीन लेखकांच्या पहिल्या प्रकाशनासाठी उत्तेजनार्थ ‘नवलेखक अनुदान योजना’ राबवली जाते. या योजनेकरिता सन २०१८ वर्षासाठी १ ते ३१ जानेवारीदरम्यान अर्ज मागविण्यात येत आहेत;मात्र गेल्या दोन वर्षांत उणेपुरे शंभर अर्जदेखील आले नसल्याने या योजनेच्या यशस्वीतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

औरंगाबाद : मराठी साहित्याची गौरवशाली परंपरा पुढे चालविण्यासाठी नवनवीन साहित्यिक लिहिते होणे गरजेचे आहे. ही गरज ओळखून मराठी भाषेबद्दल नेहमीच ‘शाब्दिक’ जिव्हाळा बाळगणारे राज्य शासनदेखील कार्यपरिहार्यतेतून का होईना, पण दरवर्षी नवलेखकांसाठी अनुदान देते; मात्र नवलेखक दरवेळीच या योजनेकडे पाठ फिरवताना दिसतात. 

राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे नवीन लेखकांच्या पहिल्या प्रकाशनासाठी उत्तेजनार्थ ‘नवलेखक अनुदान योजना’ राबवली जाते. या योजनेकरिता सन २०१८ वर्षासाठी १ ते ३१ जानेवारीदरम्यान अर्ज मागविण्यात येत आहेत; मात्र गेल्या दोन वर्षांत उणेपुरे शंभर अर्जदेखील आले नसल्याने या योजनेच्या यशस्वीतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

योजनेला मिळणारा अत्यल्प प्रतिसाद नेहमीच चिंतेचा विषय राहिलेला आहे. २०१६ साली नवलेखक अनुदान योजनेकरिता केवळ ४८ अर्ज, तर २०१७ साली ७३ अर्ज आले होते. मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड यांनी पुढील वर्षी २०० अर्ज तरी यावेत, अशी इच्छा व्यक्त केली होती. यंदा तरी ती पूर्ण होईल का, हा खरा प्रश्न आहे. या योजनेंतर्गत एकही पुस्तक प्रकाशित न झालेल्या लेखकाच्या ललित व ललितेतर साहित्याचा विचार केला जातो. कवितासंग्रह, कथासंग्रह, नाटक/एकांकिका, कादंबरी, बालवाङ्मय, इतर वैचारिक, तसेच चरित्र आत्मचरित्र, प्रवासवर्णनात्मक  स्वरूपाचे लेखन अशा विविध साहित्य प्रकारातील प्रथम प्रकाशनासाठी अनुदान दिले जाते. विशेष म्हणजे केवळ ५०० प्रतींसाठी हे अनुदान असते. या ५०० प्रती छापण्यासाठी मंडळाकडून ठरवून दिलेल्या प्रकाशननिर्मिती खर्चाच्या

केवळ ७५ टक्के अनुदान देण्यात येते.अर्ज केलेल्या नवलेखकांच्या सहित्याची त्या-त्या साहित्य प्रकारातील तज्ज्ञांकडून तपासणी करून त्यांचा अभिप्राय घेतला जातो. त्यांची अनुकूलता मिळाल्यास किमान एका वर्षाच्या आत अनुदानविषयक निर्णय घेण्यात येतो. अनुदानास पात्र ठरलेल्या पुस्तकाच्या नवलेखकाला मंडळाने ठरवून दिल्याप्रमाणे प्रकाशकांकडून वाङ्मय प्रकारानुसार ७५० ते १५०० रुपये मानधन देण्यात येते.

यंदा २०० अर्जांची इच्छायोजनेला मिळणारा अत्यल्प प्रतिसाद नेहमीच चिंतेचा विषय राहिलेला आहे. २०१६ साली नवलेखक अनुदान योजनेकरिता केवळ ४८ अर्ज, तर २०१७ साली ७३ अर्ज आले होते. मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड यांनी पुढील वर्षी २०० अर्ज तरी यावेत, अशी इच्छा व्यक्त केली होती. यंदा तरी ती पूर्ण होईल का, हा खरा प्रश्न आहे.

भीमसेन जोशी युवा शिष्यवृत्तीसाठी अर्ज सुरूराज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे देण्यात येणाºया भारतरत्न पं. भीमसेन जोशी युवा शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. शास्त्रीय संगीतामध्ये वादन आणि गायन प्रकारात शिक्षण घेणाºया हुशार व गरजू विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी ही शिष्यवृत्ती देण्यात येते.योजनेंतर्गत दरवर्षी सहा गायक व सहा वादक अशा एकूण १२ विद्यार्थ्यांना दोन वर्षांकरिता प्रतिमाह पाच हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १६ जानेवारी असून, नियम व अटी शासनाच्या संकेतस्थळावर दिलेल्या आहेत, अशी माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

टॅग्स :literatureसाहित्यAurangabadऔरंगाबाद