शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

शासनाच्या अनुदान योजनेसाठी नवलेखक उत्साह दाखवतील का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 17:14 IST

मराठी साहित्याची गौरवशाली परंपरा पुढे चालविण्यासाठी नवनवीन साहित्यिक लिहिते होणे गरजेचे आहे. ही गरज ओळखून मराठी भाषेबद्दल नेहमीच ‘शाब्दिक’ जिव्हाळा बाळगणारे राज्य शासनदेखील कार्यपरिहार्यतेतून का होईना, पण दरवर्षी नवलेखकांसाठी अनुदान देते; मात्र नवलेखक दरवेळीच या योजनेकडे पाठ फिरवताना दिसतात. 

ठळक मुद्देराज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे नवीन लेखकांच्या पहिल्या प्रकाशनासाठी उत्तेजनार्थ ‘नवलेखक अनुदान योजना’ राबवली जाते. या योजनेकरिता सन २०१८ वर्षासाठी १ ते ३१ जानेवारीदरम्यान अर्ज मागविण्यात येत आहेत;मात्र गेल्या दोन वर्षांत उणेपुरे शंभर अर्जदेखील आले नसल्याने या योजनेच्या यशस्वीतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

औरंगाबाद : मराठी साहित्याची गौरवशाली परंपरा पुढे चालविण्यासाठी नवनवीन साहित्यिक लिहिते होणे गरजेचे आहे. ही गरज ओळखून मराठी भाषेबद्दल नेहमीच ‘शाब्दिक’ जिव्हाळा बाळगणारे राज्य शासनदेखील कार्यपरिहार्यतेतून का होईना, पण दरवर्षी नवलेखकांसाठी अनुदान देते; मात्र नवलेखक दरवेळीच या योजनेकडे पाठ फिरवताना दिसतात. 

राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे नवीन लेखकांच्या पहिल्या प्रकाशनासाठी उत्तेजनार्थ ‘नवलेखक अनुदान योजना’ राबवली जाते. या योजनेकरिता सन २०१८ वर्षासाठी १ ते ३१ जानेवारीदरम्यान अर्ज मागविण्यात येत आहेत; मात्र गेल्या दोन वर्षांत उणेपुरे शंभर अर्जदेखील आले नसल्याने या योजनेच्या यशस्वीतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

योजनेला मिळणारा अत्यल्प प्रतिसाद नेहमीच चिंतेचा विषय राहिलेला आहे. २०१६ साली नवलेखक अनुदान योजनेकरिता केवळ ४८ अर्ज, तर २०१७ साली ७३ अर्ज आले होते. मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड यांनी पुढील वर्षी २०० अर्ज तरी यावेत, अशी इच्छा व्यक्त केली होती. यंदा तरी ती पूर्ण होईल का, हा खरा प्रश्न आहे. या योजनेंतर्गत एकही पुस्तक प्रकाशित न झालेल्या लेखकाच्या ललित व ललितेतर साहित्याचा विचार केला जातो. कवितासंग्रह, कथासंग्रह, नाटक/एकांकिका, कादंबरी, बालवाङ्मय, इतर वैचारिक, तसेच चरित्र आत्मचरित्र, प्रवासवर्णनात्मक  स्वरूपाचे लेखन अशा विविध साहित्य प्रकारातील प्रथम प्रकाशनासाठी अनुदान दिले जाते. विशेष म्हणजे केवळ ५०० प्रतींसाठी हे अनुदान असते. या ५०० प्रती छापण्यासाठी मंडळाकडून ठरवून दिलेल्या प्रकाशननिर्मिती खर्चाच्या

केवळ ७५ टक्के अनुदान देण्यात येते.अर्ज केलेल्या नवलेखकांच्या सहित्याची त्या-त्या साहित्य प्रकारातील तज्ज्ञांकडून तपासणी करून त्यांचा अभिप्राय घेतला जातो. त्यांची अनुकूलता मिळाल्यास किमान एका वर्षाच्या आत अनुदानविषयक निर्णय घेण्यात येतो. अनुदानास पात्र ठरलेल्या पुस्तकाच्या नवलेखकाला मंडळाने ठरवून दिल्याप्रमाणे प्रकाशकांकडून वाङ्मय प्रकारानुसार ७५० ते १५०० रुपये मानधन देण्यात येते.

यंदा २०० अर्जांची इच्छायोजनेला मिळणारा अत्यल्प प्रतिसाद नेहमीच चिंतेचा विषय राहिलेला आहे. २०१६ साली नवलेखक अनुदान योजनेकरिता केवळ ४८ अर्ज, तर २०१७ साली ७३ अर्ज आले होते. मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड यांनी पुढील वर्षी २०० अर्ज तरी यावेत, अशी इच्छा व्यक्त केली होती. यंदा तरी ती पूर्ण होईल का, हा खरा प्रश्न आहे.

भीमसेन जोशी युवा शिष्यवृत्तीसाठी अर्ज सुरूराज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे देण्यात येणाºया भारतरत्न पं. भीमसेन जोशी युवा शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. शास्त्रीय संगीतामध्ये वादन आणि गायन प्रकारात शिक्षण घेणाºया हुशार व गरजू विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी ही शिष्यवृत्ती देण्यात येते.योजनेंतर्गत दरवर्षी सहा गायक व सहा वादक अशा एकूण १२ विद्यार्थ्यांना दोन वर्षांकरिता प्रतिमाह पाच हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १६ जानेवारी असून, नियम व अटी शासनाच्या संकेतस्थळावर दिलेल्या आहेत, अशी माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

टॅग्स :literatureसाहित्यAurangabadऔरंगाबाद