शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

नवाब मलिकांचा राजीनामा घेण्याचा 'ठाकरी बाणा' मुख्यमंत्री दाखवतील का? भाजपचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2022 18:10 IST

भाजपाचे प्रदेश सरचिटणिस आ. अतुल सावे यांचा सवाल

औरंगाबाद: ईडीच्या कोठडीत असलेल्या नवाब मलिक (Nawab Malik) यांना मंत्रीपदावर ठेवणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावापुढे न झुकता मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याचा ठाकरी बाणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhhav Thakarey ) दाखवणार का, असा सवाल भाजपचे प्रदेश सरचिटणिस आ. अतुल सावे ( Atul Save) आज पत्रकार परिषदेत केला. 

आ. सावे पुढे म्हणाले, नवाब मलिक यांनी दाऊदच्या दहशतवादी कारवायांकरिता पैसा जमा करण्याच्या कटास साह्य केल्याचा आरोप असून त्यासाठीचे सज्जड पुरावे 'ईडी'कडे असल्याचा दावा करण्यात आला आहे. दाऊदशी नवाब मलिक यांची हातमिळवणी असल्याचा गंभीर आरोप ईडीकडून करण्यात येत असतानाही मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विरोध आहे, याची मोठी किंमत महाराष्ट्राला मोजावी लागेल, असा इशाराही आ. सावे यांनी दिला. 

तसेच मुंबई महापालिकेसह अन्य निवडणुकांवर डोळा ठेवून मुस्लिम मतांसाठी सुरु असलेले हीन राजकारण ठाकरे सरकारच्या अधोगतीस कारणीभूत ठरेल, असा दावा आ. सावे यांनी केला. पत्रकार परिषदेस जिल्हा सरचिटणीस राजेश मेहता. राम बुधवंत आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 

दरम्यान, आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. भाजप आंदोलकांनी नवाब मलिक यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलकांनी केली. 

टॅग्स :Atul Saveअतुल सावेAurangabadऔरंगाबादUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाnawab malikनवाब मलिक