शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

नवाब मलिकांचा राजीनामा घेण्याचा 'ठाकरी बाणा' मुख्यमंत्री दाखवतील का? भाजपचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2022 18:10 IST

भाजपाचे प्रदेश सरचिटणिस आ. अतुल सावे यांचा सवाल

औरंगाबाद: ईडीच्या कोठडीत असलेल्या नवाब मलिक (Nawab Malik) यांना मंत्रीपदावर ठेवणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावापुढे न झुकता मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याचा ठाकरी बाणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhhav Thakarey ) दाखवणार का, असा सवाल भाजपचे प्रदेश सरचिटणिस आ. अतुल सावे ( Atul Save) आज पत्रकार परिषदेत केला. 

आ. सावे पुढे म्हणाले, नवाब मलिक यांनी दाऊदच्या दहशतवादी कारवायांकरिता पैसा जमा करण्याच्या कटास साह्य केल्याचा आरोप असून त्यासाठीचे सज्जड पुरावे 'ईडी'कडे असल्याचा दावा करण्यात आला आहे. दाऊदशी नवाब मलिक यांची हातमिळवणी असल्याचा गंभीर आरोप ईडीकडून करण्यात येत असतानाही मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विरोध आहे, याची मोठी किंमत महाराष्ट्राला मोजावी लागेल, असा इशाराही आ. सावे यांनी दिला. 

तसेच मुंबई महापालिकेसह अन्य निवडणुकांवर डोळा ठेवून मुस्लिम मतांसाठी सुरु असलेले हीन राजकारण ठाकरे सरकारच्या अधोगतीस कारणीभूत ठरेल, असा दावा आ. सावे यांनी केला. पत्रकार परिषदेस जिल्हा सरचिटणीस राजेश मेहता. राम बुधवंत आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 

दरम्यान, आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. भाजप आंदोलकांनी नवाब मलिक यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलकांनी केली. 

टॅग्स :Atul Saveअतुल सावेAurangabadऔरंगाबादUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाnawab malikनवाब मलिक