शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

नवाब मलिकांचा राजीनामा घेण्याचा 'ठाकरी बाणा' मुख्यमंत्री दाखवतील का? भाजपचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2022 18:10 IST

भाजपाचे प्रदेश सरचिटणिस आ. अतुल सावे यांचा सवाल

औरंगाबाद: ईडीच्या कोठडीत असलेल्या नवाब मलिक (Nawab Malik) यांना मंत्रीपदावर ठेवणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावापुढे न झुकता मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याचा ठाकरी बाणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhhav Thakarey ) दाखवणार का, असा सवाल भाजपचे प्रदेश सरचिटणिस आ. अतुल सावे ( Atul Save) आज पत्रकार परिषदेत केला. 

आ. सावे पुढे म्हणाले, नवाब मलिक यांनी दाऊदच्या दहशतवादी कारवायांकरिता पैसा जमा करण्याच्या कटास साह्य केल्याचा आरोप असून त्यासाठीचे सज्जड पुरावे 'ईडी'कडे असल्याचा दावा करण्यात आला आहे. दाऊदशी नवाब मलिक यांची हातमिळवणी असल्याचा गंभीर आरोप ईडीकडून करण्यात येत असतानाही मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विरोध आहे, याची मोठी किंमत महाराष्ट्राला मोजावी लागेल, असा इशाराही आ. सावे यांनी दिला. 

तसेच मुंबई महापालिकेसह अन्य निवडणुकांवर डोळा ठेवून मुस्लिम मतांसाठी सुरु असलेले हीन राजकारण ठाकरे सरकारच्या अधोगतीस कारणीभूत ठरेल, असा दावा आ. सावे यांनी केला. पत्रकार परिषदेस जिल्हा सरचिटणीस राजेश मेहता. राम बुधवंत आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 

दरम्यान, आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. भाजप आंदोलकांनी नवाब मलिक यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलकांनी केली. 

टॅग्स :Atul Saveअतुल सावेAurangabadऔरंगाबादUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाnawab malikनवाब मलिक