शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

...तर मनपा कचऱ्याची ‘वर्षपूर्ती’ साजरी करील; खंडपीठाची सक्त नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 19:08 IST

कचऱ्याची विल्हेवाट लावली नाही तर महापालिका कचऱ्याची ‘वर्षपूर्ती’ साजरी करील, अशा शब्दात खंडपीठाने महापालिकेची कानउघाडणी केली.

औरंगाबाद : कचऱ्याची विल्हेवाट लावली नाही तर महापालिका कचऱ्याची ‘वर्षपूर्ती’ साजरी करील, अशा शब्दात खंडपीठाने महापालिकेची कानउघाडणी केली. गेल्या सहा महिन्यांपासून शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे डोंगर साचले असून, सर्वत्र मोठ्या प्रमाणात वायू आणि जलप्रदूषण वाढत असल्याची बाब याचिकाकर्त्यांनी सोमवारी न्या. प्रसन्ना वराळे आणि न्या. रवींद्र घुगे यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिली, त्यावर अशी नाराजी खंडपीठाने नोंदविली.

त्यासोबत ‘लोकमत’ने जालना रोडवरील दोन पंचतारांकित हॉटेलसमोर कचऱ्याचा ढीग टाकून महापालिकेने विदेशी पर्यटकांसमोर ओंगळवाणे प्रदर्शन मांडल्याबाबत प्रकाशित केलेल्या छायाचित्रांवरूनही खंडपीठाने सक्त नाराजी व्यक्त केली. जगभरातून आलेले बहुतांश पर्यटक याच हॉटेलमध्ये थांबतात. या पर्यटकांच्या शहरातील निवासाच्या ठिकाणापासून मकबरा व इतर प्रेक्षणीय स्थळांपर्यंत कचऱ्याचे असेच ढीग साचलेले त्यांना दिसतात, ही बाब निश्चितच खेदजनक असल्याचे खंडपीठाने म्हटले. इतकेच नव्हे तर न्यायमूर्तीद्वयांनी शहरातील अनेक भागांत फेरफटका मारला असता त्यांनाही ठिकठिकाणी असेच कचऱ्याचे ढीग आढळल्याचे सुनावणीदरम्यान स्पष्ट झाले. 

कित्येक महिन्यांपासून साचलेल्या कचऱ्यामुळे उद्भवणाऱ्या सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या समस्यांचा विचार महापालिकेने करणे जरूरी आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास नागरिकांना ‘आॅक्सिजन’ मिळविणे दुरापास्त होईल. भारतीय लोक उत्सवप्रिय आहेत.  कचऱ्यापासून खत, इंधन आदी निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असेही खंडपीठाने सुचविले. सुनावणीदरम्यान अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, हर्सूल परिसरात कचऱ्याचे ढीग साचले असून, सुमारे २५० ते ३०० झाडे तोडण्यात आली आहेत. या परिसरातून गेलेली ऐतिहासिक नहर-ए-अंबरी फोडल्यामुळे पिण्याचे पाणी दूषित झाले आहे. जवळपास दोन कि.मी. परिसरातील विहिरींमधील पाणी काळे झाले आहे. 

वैद्यकीय परीक्षणात हे पाणी पिण्यास योग्य नसल्याचे समजल्याचे त्यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. महापालिकासुद्धा कचऱ्याचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी प्रयत्नशील आहे. काही तांत्रिक अडचणी आहेत, त्या लवकरच दूर करण्यात येतील, असे अ‍ॅड. राजेंद्र देशमुख यांनी खंडपीठास सांगितले.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका