शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

...तर मनपा कचऱ्याची ‘वर्षपूर्ती’ साजरी करील; खंडपीठाची सक्त नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 19:08 IST

कचऱ्याची विल्हेवाट लावली नाही तर महापालिका कचऱ्याची ‘वर्षपूर्ती’ साजरी करील, अशा शब्दात खंडपीठाने महापालिकेची कानउघाडणी केली.

औरंगाबाद : कचऱ्याची विल्हेवाट लावली नाही तर महापालिका कचऱ्याची ‘वर्षपूर्ती’ साजरी करील, अशा शब्दात खंडपीठाने महापालिकेची कानउघाडणी केली. गेल्या सहा महिन्यांपासून शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे डोंगर साचले असून, सर्वत्र मोठ्या प्रमाणात वायू आणि जलप्रदूषण वाढत असल्याची बाब याचिकाकर्त्यांनी सोमवारी न्या. प्रसन्ना वराळे आणि न्या. रवींद्र घुगे यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिली, त्यावर अशी नाराजी खंडपीठाने नोंदविली.

त्यासोबत ‘लोकमत’ने जालना रोडवरील दोन पंचतारांकित हॉटेलसमोर कचऱ्याचा ढीग टाकून महापालिकेने विदेशी पर्यटकांसमोर ओंगळवाणे प्रदर्शन मांडल्याबाबत प्रकाशित केलेल्या छायाचित्रांवरूनही खंडपीठाने सक्त नाराजी व्यक्त केली. जगभरातून आलेले बहुतांश पर्यटक याच हॉटेलमध्ये थांबतात. या पर्यटकांच्या शहरातील निवासाच्या ठिकाणापासून मकबरा व इतर प्रेक्षणीय स्थळांपर्यंत कचऱ्याचे असेच ढीग साचलेले त्यांना दिसतात, ही बाब निश्चितच खेदजनक असल्याचे खंडपीठाने म्हटले. इतकेच नव्हे तर न्यायमूर्तीद्वयांनी शहरातील अनेक भागांत फेरफटका मारला असता त्यांनाही ठिकठिकाणी असेच कचऱ्याचे ढीग आढळल्याचे सुनावणीदरम्यान स्पष्ट झाले. 

कित्येक महिन्यांपासून साचलेल्या कचऱ्यामुळे उद्भवणाऱ्या सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या समस्यांचा विचार महापालिकेने करणे जरूरी आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास नागरिकांना ‘आॅक्सिजन’ मिळविणे दुरापास्त होईल. भारतीय लोक उत्सवप्रिय आहेत.  कचऱ्यापासून खत, इंधन आदी निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असेही खंडपीठाने सुचविले. सुनावणीदरम्यान अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, हर्सूल परिसरात कचऱ्याचे ढीग साचले असून, सुमारे २५० ते ३०० झाडे तोडण्यात आली आहेत. या परिसरातून गेलेली ऐतिहासिक नहर-ए-अंबरी फोडल्यामुळे पिण्याचे पाणी दूषित झाले आहे. जवळपास दोन कि.मी. परिसरातील विहिरींमधील पाणी काळे झाले आहे. 

वैद्यकीय परीक्षणात हे पाणी पिण्यास योग्य नसल्याचे समजल्याचे त्यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. महापालिकासुद्धा कचऱ्याचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी प्रयत्नशील आहे. काही तांत्रिक अडचणी आहेत, त्या लवकरच दूर करण्यात येतील, असे अ‍ॅड. राजेंद्र देशमुख यांनी खंडपीठास सांगितले.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका