शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

...तर मनपा कचऱ्याची ‘वर्षपूर्ती’ साजरी करील; खंडपीठाची सक्त नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 19:08 IST

कचऱ्याची विल्हेवाट लावली नाही तर महापालिका कचऱ्याची ‘वर्षपूर्ती’ साजरी करील, अशा शब्दात खंडपीठाने महापालिकेची कानउघाडणी केली.

औरंगाबाद : कचऱ्याची विल्हेवाट लावली नाही तर महापालिका कचऱ्याची ‘वर्षपूर्ती’ साजरी करील, अशा शब्दात खंडपीठाने महापालिकेची कानउघाडणी केली. गेल्या सहा महिन्यांपासून शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे डोंगर साचले असून, सर्वत्र मोठ्या प्रमाणात वायू आणि जलप्रदूषण वाढत असल्याची बाब याचिकाकर्त्यांनी सोमवारी न्या. प्रसन्ना वराळे आणि न्या. रवींद्र घुगे यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिली, त्यावर अशी नाराजी खंडपीठाने नोंदविली.

त्यासोबत ‘लोकमत’ने जालना रोडवरील दोन पंचतारांकित हॉटेलसमोर कचऱ्याचा ढीग टाकून महापालिकेने विदेशी पर्यटकांसमोर ओंगळवाणे प्रदर्शन मांडल्याबाबत प्रकाशित केलेल्या छायाचित्रांवरूनही खंडपीठाने सक्त नाराजी व्यक्त केली. जगभरातून आलेले बहुतांश पर्यटक याच हॉटेलमध्ये थांबतात. या पर्यटकांच्या शहरातील निवासाच्या ठिकाणापासून मकबरा व इतर प्रेक्षणीय स्थळांपर्यंत कचऱ्याचे असेच ढीग साचलेले त्यांना दिसतात, ही बाब निश्चितच खेदजनक असल्याचे खंडपीठाने म्हटले. इतकेच नव्हे तर न्यायमूर्तीद्वयांनी शहरातील अनेक भागांत फेरफटका मारला असता त्यांनाही ठिकठिकाणी असेच कचऱ्याचे ढीग आढळल्याचे सुनावणीदरम्यान स्पष्ट झाले. 

कित्येक महिन्यांपासून साचलेल्या कचऱ्यामुळे उद्भवणाऱ्या सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या समस्यांचा विचार महापालिकेने करणे जरूरी आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास नागरिकांना ‘आॅक्सिजन’ मिळविणे दुरापास्त होईल. भारतीय लोक उत्सवप्रिय आहेत.  कचऱ्यापासून खत, इंधन आदी निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असेही खंडपीठाने सुचविले. सुनावणीदरम्यान अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, हर्सूल परिसरात कचऱ्याचे ढीग साचले असून, सुमारे २५० ते ३०० झाडे तोडण्यात आली आहेत. या परिसरातून गेलेली ऐतिहासिक नहर-ए-अंबरी फोडल्यामुळे पिण्याचे पाणी दूषित झाले आहे. जवळपास दोन कि.मी. परिसरातील विहिरींमधील पाणी काळे झाले आहे. 

वैद्यकीय परीक्षणात हे पाणी पिण्यास योग्य नसल्याचे समजल्याचे त्यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. महापालिकासुद्धा कचऱ्याचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी प्रयत्नशील आहे. काही तांत्रिक अडचणी आहेत, त्या लवकरच दूर करण्यात येतील, असे अ‍ॅड. राजेंद्र देशमुख यांनी खंडपीठास सांगितले.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका