शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देण्याऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
7
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
8
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
9
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
10
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
11
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
12
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
13
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
14
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
15
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
16
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
17
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
18
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
19
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
20
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...

भाजपचे शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष बदलणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 18:09 IST

विद्यमान शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता धूसर बनली आहे.

ठळक मुद्देयेत्या काही महिन्यांतच शहरातील महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे भाजपमध्ये शहराध्यक्ष बनण्यासाठी स्पर्धा

औरंगाबाद : राज्यातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या नवीन कार्यकारिणीसाठी बैठकांवर बैठका घेण्यात येत आहेत. संघटनात्मक बांधणीसह नवीन कार्यकारिणी निवडण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी बैठक घेतल्यानंतर भाजपचा शहराध्यक्ष आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष कोण होणार या चर्चांना उधाण आले आहे. विद्यमान शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता धूसर बनली आहे.

भाजपच्या औरंगाबाद जिल्ह्यातील पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक, माजी विधानसभा अध्यक्ष आ. हरिभाऊ बागडे, महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकीला माजी राज्यमंत्री आ. अतुल सावे, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे, प्रवक्ते शिरीष बोराळकर, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा कार्यक्रम राबविण्याच्या सूचना केल्या. यामध्ये बुथ समिती, मंडळ नेमणुका केल्यानंतर शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांच्या निवडणुका घेण्यात याव्यात, यासाठी बुथ समितीचे गठन लवकर केले जावे, असे आदेशही दिले.

या बैठकीनंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नवीन शहराध्यक्ष आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष कोण होणार याविषयी चर्चांना उधाण आले आहे. येत्या काही महिन्यांतच शहरातील महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्यावेळी शहराध्यक्षाला प्रचंड महत्त्व असणार आहे. त्यामुळे भाजपमध्ये शहराध्यक्ष बनण्यासाठी स्पर्धा निर्माण झाली आहे. विद्यमान शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्यासह ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता धूसर बनली आहे. शहराध्यक्ष पद हे पक्षातील निष्ठावंत व्यक्तीला मिळणार असल्याचा दावा भाजपतील काही पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा निष्ठावंत आणि इतर पक्षातून भाजपात आलेल्यांमध्ये गटबाजी होण्याची शक्यता आहे.

अगोदर युती, आता कोणती आघाडी होणार?नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपने युतीच्या नावावर मते मागितली. मतदारांनाही शहारातील तिन्ही जागांवर युतीच्या उमेदवारांना भरघोस मतदान केले. मात्र आता शिवआघाडीऐवजी दुसरीच आघाडी शिवसेनेने केली असल्याचा टोला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला लगावला. तसेच येत्या महापालिकेच्या निवडणुकीत भाजप स्वबळावर लढणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाBJPभाजपाElectionनिवडणूक