शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

भाजपचे शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष बदलणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 18:09 IST

विद्यमान शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता धूसर बनली आहे.

ठळक मुद्देयेत्या काही महिन्यांतच शहरातील महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे भाजपमध्ये शहराध्यक्ष बनण्यासाठी स्पर्धा

औरंगाबाद : राज्यातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या नवीन कार्यकारिणीसाठी बैठकांवर बैठका घेण्यात येत आहेत. संघटनात्मक बांधणीसह नवीन कार्यकारिणी निवडण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी बैठक घेतल्यानंतर भाजपचा शहराध्यक्ष आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष कोण होणार या चर्चांना उधाण आले आहे. विद्यमान शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता धूसर बनली आहे.

भाजपच्या औरंगाबाद जिल्ह्यातील पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक, माजी विधानसभा अध्यक्ष आ. हरिभाऊ बागडे, महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकीला माजी राज्यमंत्री आ. अतुल सावे, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे, प्रवक्ते शिरीष बोराळकर, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा कार्यक्रम राबविण्याच्या सूचना केल्या. यामध्ये बुथ समिती, मंडळ नेमणुका केल्यानंतर शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांच्या निवडणुका घेण्यात याव्यात, यासाठी बुथ समितीचे गठन लवकर केले जावे, असे आदेशही दिले.

या बैठकीनंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नवीन शहराध्यक्ष आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष कोण होणार याविषयी चर्चांना उधाण आले आहे. येत्या काही महिन्यांतच शहरातील महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्यावेळी शहराध्यक्षाला प्रचंड महत्त्व असणार आहे. त्यामुळे भाजपमध्ये शहराध्यक्ष बनण्यासाठी स्पर्धा निर्माण झाली आहे. विद्यमान शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्यासह ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता धूसर बनली आहे. शहराध्यक्ष पद हे पक्षातील निष्ठावंत व्यक्तीला मिळणार असल्याचा दावा भाजपतील काही पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा निष्ठावंत आणि इतर पक्षातून भाजपात आलेल्यांमध्ये गटबाजी होण्याची शक्यता आहे.

अगोदर युती, आता कोणती आघाडी होणार?नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपने युतीच्या नावावर मते मागितली. मतदारांनाही शहारातील तिन्ही जागांवर युतीच्या उमेदवारांना भरघोस मतदान केले. मात्र आता शिवआघाडीऐवजी दुसरीच आघाडी शिवसेनेने केली असल्याचा टोला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला लगावला. तसेच येत्या महापालिकेच्या निवडणुकीत भाजप स्वबळावर लढणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाBJPभाजपाElectionनिवडणूक