शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटातील कारचा मालक सलमान पोलिसांच्या ताब्यात; गाडी दुसऱ्याला विकल्याचा दावा! पोलिसांची चौकशी सुरू
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
4
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
5
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
6
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
7
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
8
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
9
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
10
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
11
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
12
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
13
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
14
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
15
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
16
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
17
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
18
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
19
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
20
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन

बिदरी कलाही इतिहास रूपातच उरणार का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 18:12 IST

शहरातील मोजक्याच बिदरी कारागिरांनी उपस्थित केला सवाल

- रूचिका पालोदकर औरंगाबाद : १९६० ते ९० हा काळ औरंगाबादमधल्या बिदरी कलेसाठी अत्यंत सुगीचा काळ होता; पण काळानुसार घटलेले पर्यटन, कलाप्रेमींचा, कलेची जाण आणि कदर असणाऱ्या व्यक्तींचा अभाव आणि शासनाची या कलेबाबतची तीव्र अनास्था याचा फटका अन्य उद्योगांप्रमाणे बिदरी कलेलाही बसला. आता औरंगाबादेतील बिदरी कलाही इतिहास रूपातच जिवंत राहणार का? असा प्रश्न कलाप्रेमी आणि शहरात मोजकेच राहिलेले बिदरी कारागीर उपस्थित करत आहेत. 

बिदरी कलेबाबत असे सांगितले जाते की, मोहम्मद तुघलकच्या काळात इराणहून बिदरी कलावंत भारतात आले आणि त्यानंतर त्यांनी येथे हा व्यवसाय सुरू केला. या कलेची पाळेमुळे खऱ्या अर्थाने रूजली ती कर्नाटकातील बीदर येथे. इतिहास अभ्यासकांच्या मते बिदरी कलेचे उगमस्थान हे इराण आहे. इराणहून इराक, अजमेर आणि त्यानंतर विजापूर येथे ही कला आली आणि तेथून मग भारतात पसरत गेली, असे इतिहास अभ्यासक दुलारी कुरेशी यांनी सांगितले. 

ही कला औरंगाबादला आली कशी याबाबत माहिती देताना बिदरी कारागीर युसूफ जाफरी म्हणाले की, १९६० साली आयटीआयतर्फे बिदरी कलावंतांना कर्नाटकातून औरंगाबादला बोलाविण्यात आले. येथे कलेला मिळणारा वाव आणि उत्तरोत्तर होणारी भरभराट पाहून इतर कारागीरही त्यांच्या मागोमाग येथे आले. १९७५ पर्यंत या कलेला शासनाकडून उभारी मिळाली, शेकडो कारागिरांचा उदरनिर्वाह या कलेवर होत होता; पण त्यानंतर शासनाने या कलाकारांना दिलेला आश्रय बंद केला आणि तेथूनच या व्यवसायाला उतरती कळा लागली.

बिदरी कला हा युसूफ जाफरी यांचा पारंपरिक व्यवसाय आहे. सध्या ते महात्मा गांधी मिशन येथे या कलेची निर्मिती करत असून, कला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते म्हणाले की, आज ही कला जाणणारे लोक कमी झाले असून, नव्या पिढीला तर याबाबतीत पूर्णच अनास्था आहे. पूर्वी परदेशातून या वस्तूंची मोठी मागणी असायची; पण आता स्थानिक लोकही या वस्तू फार घेत नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. 

सरकार दरबारी अनास्था : बिदरी कलेला उभारणी देण्यासाठी बिदरी क्लस्टर तयार करण्याची घोषणा २०१३ मध्ये करण्यात आली होती; पण अजूनही बिदरी क्लस्टर उभे राहिलेले नाही. पूर्वी हस्तकलेच्या कलाकारांना शासनाकडून ओळखपत्र मिळायचे. यातून त्यांना अनेक सुविधा तसेच विविध प्रदर्शनांना जाण्यासाठी कलावंतांना प्रवासी भत्ता, राहण्याची व्यवस्था या सोयी मिळायच्या. पण १९९० पासून या सोयीसुविधा बंद झाल्या. कर्नाटक सरकारने बिदरी कारागिरांसाठी खूप सोयीसुविधा उपलब्ध केल्या आहेत, अशा कोणत्याच योजना राज्यात राबविण्यात येत नसल्यामुळेही औरंगाबादेत या कलेचा इतिहासच उरतो की काय, अशी भीती कारागिरांनी व्यक्त केली.

कर्नाटकी मातीतच भाजतात कलाकृती अत्यंत नाजूक आणि मेहनतीने केलेले सुबक काम हे या कलेचे वैशिष्ट्य. बिदरी कलेमध्ये ९० टक्के झिंक आणि १० टक्के कॉपर असे प्रमाण असलेल्या विविध आकारांवर सोने-चांदी वापरून कलाकुसर केली जाते. १०० रुपयांपासून ते अगदी १ लाखापर्यंतच्या किमतीत या वस्तू मिळतात. कलाकुसर झाल्यावर तयार केलेली वस्तू कर्नाटक येथे मिळणाऱ्या मातीच्या भट्टीत तापवली जाते. दागदागिने, पेपर वेट, कफलिंग, फ्लॉवर पॉट, पेपर कटर, मेणबत्ती ठेवण्याचे स्टॅण्ड, लेटर बॉक्स आणि अनेक शोभेच्या वस्तू या कलेअंतर्गत बनविण्यात येतात. 

टॅग्स :artकलाcultureसांस्कृतिकAurangabadऔरंगाबाद