शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

बिदरी कलाही इतिहास रूपातच उरणार का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 18:12 IST

शहरातील मोजक्याच बिदरी कारागिरांनी उपस्थित केला सवाल

- रूचिका पालोदकर औरंगाबाद : १९६० ते ९० हा काळ औरंगाबादमधल्या बिदरी कलेसाठी अत्यंत सुगीचा काळ होता; पण काळानुसार घटलेले पर्यटन, कलाप्रेमींचा, कलेची जाण आणि कदर असणाऱ्या व्यक्तींचा अभाव आणि शासनाची या कलेबाबतची तीव्र अनास्था याचा फटका अन्य उद्योगांप्रमाणे बिदरी कलेलाही बसला. आता औरंगाबादेतील बिदरी कलाही इतिहास रूपातच जिवंत राहणार का? असा प्रश्न कलाप्रेमी आणि शहरात मोजकेच राहिलेले बिदरी कारागीर उपस्थित करत आहेत. 

बिदरी कलेबाबत असे सांगितले जाते की, मोहम्मद तुघलकच्या काळात इराणहून बिदरी कलावंत भारतात आले आणि त्यानंतर त्यांनी येथे हा व्यवसाय सुरू केला. या कलेची पाळेमुळे खऱ्या अर्थाने रूजली ती कर्नाटकातील बीदर येथे. इतिहास अभ्यासकांच्या मते बिदरी कलेचे उगमस्थान हे इराण आहे. इराणहून इराक, अजमेर आणि त्यानंतर विजापूर येथे ही कला आली आणि तेथून मग भारतात पसरत गेली, असे इतिहास अभ्यासक दुलारी कुरेशी यांनी सांगितले. 

ही कला औरंगाबादला आली कशी याबाबत माहिती देताना बिदरी कारागीर युसूफ जाफरी म्हणाले की, १९६० साली आयटीआयतर्फे बिदरी कलावंतांना कर्नाटकातून औरंगाबादला बोलाविण्यात आले. येथे कलेला मिळणारा वाव आणि उत्तरोत्तर होणारी भरभराट पाहून इतर कारागीरही त्यांच्या मागोमाग येथे आले. १९७५ पर्यंत या कलेला शासनाकडून उभारी मिळाली, शेकडो कारागिरांचा उदरनिर्वाह या कलेवर होत होता; पण त्यानंतर शासनाने या कलाकारांना दिलेला आश्रय बंद केला आणि तेथूनच या व्यवसायाला उतरती कळा लागली.

बिदरी कला हा युसूफ जाफरी यांचा पारंपरिक व्यवसाय आहे. सध्या ते महात्मा गांधी मिशन येथे या कलेची निर्मिती करत असून, कला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते म्हणाले की, आज ही कला जाणणारे लोक कमी झाले असून, नव्या पिढीला तर याबाबतीत पूर्णच अनास्था आहे. पूर्वी परदेशातून या वस्तूंची मोठी मागणी असायची; पण आता स्थानिक लोकही या वस्तू फार घेत नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. 

सरकार दरबारी अनास्था : बिदरी कलेला उभारणी देण्यासाठी बिदरी क्लस्टर तयार करण्याची घोषणा २०१३ मध्ये करण्यात आली होती; पण अजूनही बिदरी क्लस्टर उभे राहिलेले नाही. पूर्वी हस्तकलेच्या कलाकारांना शासनाकडून ओळखपत्र मिळायचे. यातून त्यांना अनेक सुविधा तसेच विविध प्रदर्शनांना जाण्यासाठी कलावंतांना प्रवासी भत्ता, राहण्याची व्यवस्था या सोयी मिळायच्या. पण १९९० पासून या सोयीसुविधा बंद झाल्या. कर्नाटक सरकारने बिदरी कारागिरांसाठी खूप सोयीसुविधा उपलब्ध केल्या आहेत, अशा कोणत्याच योजना राज्यात राबविण्यात येत नसल्यामुळेही औरंगाबादेत या कलेचा इतिहासच उरतो की काय, अशी भीती कारागिरांनी व्यक्त केली.

कर्नाटकी मातीतच भाजतात कलाकृती अत्यंत नाजूक आणि मेहनतीने केलेले सुबक काम हे या कलेचे वैशिष्ट्य. बिदरी कलेमध्ये ९० टक्के झिंक आणि १० टक्के कॉपर असे प्रमाण असलेल्या विविध आकारांवर सोने-चांदी वापरून कलाकुसर केली जाते. १०० रुपयांपासून ते अगदी १ लाखापर्यंतच्या किमतीत या वस्तू मिळतात. कलाकुसर झाल्यावर तयार केलेली वस्तू कर्नाटक येथे मिळणाऱ्या मातीच्या भट्टीत तापवली जाते. दागदागिने, पेपर वेट, कफलिंग, फ्लॉवर पॉट, पेपर कटर, मेणबत्ती ठेवण्याचे स्टॅण्ड, लेटर बॉक्स आणि अनेक शोभेच्या वस्तू या कलेअंतर्गत बनविण्यात येतात. 

टॅग्स :artकलाcultureसांस्कृतिकAurangabadऔरंगाबाद