शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

वन्यजीवही ठरले दुष्काळाचे शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 19:46 IST

वन्यप्राण्यांची पाणी, अन्नासाठी शहराकडे धाव

ठळक मुद्देआजार किंवा इतर प्राण्यांची शिकारबहुतांश प्राण्यांचा मृत्यू मानवी हल्ल्यांनी झाल्याची शक्यता

- साहेबराव हिवराळे  

औरंगाबाद : जंगल क्षेत्रात मानवी हस्तक्षेप वाढल्याने वन्यप्राण्यांना पाणी आणि अन्न मिळेनासे झाल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे. परिणामी अन्न व पाण्याच्या शोधात वन्यप्राणी शहराकडे धाव घेत आहेत. औरंगाबाद परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांत सहा महिन्यांत हरिण, काळवीट, रानडुक्कर, बिबट्या व नीलगाय आदी १९ वन्यप्राण्यांचा मृतदेह आढळून आला. वनविभाग या प्राण्याच्या मृत्यूचे कारण वेगवेगळे सांगत असले तरी बहुतांश प्राण्यांचा मृत्यू मानवी हल्ल्यांनी झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

औरंगाबाद वनविभागांर्तगत नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आदी जिल्ह्यांचा समावेश आहे. वनविभागात पाणवठे तयार करण्यात आलेले आहेत. असे असले तरी उन्हाळ्यात पाणीटंचाईचा फटका या प्राण्यांनाही बसला आहे. जंगलांमध्ये या प्राण्यांना अन्न व पाणी मिळत नसल्याने ते मानवी वस्त्यांकडे धाव घेत आहेत. यातूनच प्राणी आणि मानव यांच्यात संघर्ष होताना दिसून येत आहे. यातून मानवी हल्ल्यांमुळे वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात आल्याचे काही घटनांवरुन दिसून येत आहे. 

यंदा जानेवारी ते मे या कालावधीत वनक्षेत्रातील वन्यजीवांवर हल्ले किंवा अपघात झालेले तसेच नैसर्गिकरीत्या मृत झालेले वन्यजीव आढळून आले आहेत. या प्राण्याच्या मृत्यूचे पंचनामे करून स्थानिक पातळीवरून चौकशी सुरू असल्याचे वनविभागातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. या घटनांची चौकशी सुरू झाली; पण पुढे काही झाले नाही. रोजच्या धावपळीच्या दैनंदिनीतून विरंगुळा म्हणून काही क्षण निवांत घालविण्यासाठी तारांकित वसाहत व टेकड्यांवर घरे बांधण्याची जणू स्पर्धाच सुरु आहे. यातूनच निसर्गाचा समतोल ढसळण्याची भिती व्यक्त केली जात आहे. आगामी काळात वनक्षेत्र सुरक्षित ठेवण्यासह वन्यजीवांचे रक्षण करण्यावर भर देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.   

आजार किंवा इतर प्राण्यांची शिकारमुख्य वनसंरक्षक पी.के. महाजन म्हणाले की, विभागातील काही जिल्ह्यांत ज्या वन्यजीवांचे मृतदेह आढळून आले आहेत, त्यांची त्या स्तरावर चौकशी सुरू आहे. त्यात कोणी दोषी आढळल्यास वन कायद्याप्रमाणे कारवाई केली जाणार आहे.  नैसर्गिक मृत्यू हा आजार अथवा शरीरातील पाणी कमी झाल्यानेही होऊ शकतो. चौकशीअंती ते समजू शकणार आहे. 

टॅग्स :forestजंगलdroughtदुष्काळDeathमृत्यू