शहरं
Join us  
Trending Stories
1
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
2
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
3
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
4
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
5
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
6
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
7
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
8
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
9
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
10
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
11
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
12
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
13
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
14
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
15
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
16
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
17
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
18
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
19
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
20
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले

वन्यजीवही ठरले दुष्काळाचे शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 19:46 IST

वन्यप्राण्यांची पाणी, अन्नासाठी शहराकडे धाव

ठळक मुद्देआजार किंवा इतर प्राण्यांची शिकारबहुतांश प्राण्यांचा मृत्यू मानवी हल्ल्यांनी झाल्याची शक्यता

- साहेबराव हिवराळे  

औरंगाबाद : जंगल क्षेत्रात मानवी हस्तक्षेप वाढल्याने वन्यप्राण्यांना पाणी आणि अन्न मिळेनासे झाल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे. परिणामी अन्न व पाण्याच्या शोधात वन्यप्राणी शहराकडे धाव घेत आहेत. औरंगाबाद परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांत सहा महिन्यांत हरिण, काळवीट, रानडुक्कर, बिबट्या व नीलगाय आदी १९ वन्यप्राण्यांचा मृतदेह आढळून आला. वनविभाग या प्राण्याच्या मृत्यूचे कारण वेगवेगळे सांगत असले तरी बहुतांश प्राण्यांचा मृत्यू मानवी हल्ल्यांनी झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

औरंगाबाद वनविभागांर्तगत नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आदी जिल्ह्यांचा समावेश आहे. वनविभागात पाणवठे तयार करण्यात आलेले आहेत. असे असले तरी उन्हाळ्यात पाणीटंचाईचा फटका या प्राण्यांनाही बसला आहे. जंगलांमध्ये या प्राण्यांना अन्न व पाणी मिळत नसल्याने ते मानवी वस्त्यांकडे धाव घेत आहेत. यातूनच प्राणी आणि मानव यांच्यात संघर्ष होताना दिसून येत आहे. यातून मानवी हल्ल्यांमुळे वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात आल्याचे काही घटनांवरुन दिसून येत आहे. 

यंदा जानेवारी ते मे या कालावधीत वनक्षेत्रातील वन्यजीवांवर हल्ले किंवा अपघात झालेले तसेच नैसर्गिकरीत्या मृत झालेले वन्यजीव आढळून आले आहेत. या प्राण्याच्या मृत्यूचे पंचनामे करून स्थानिक पातळीवरून चौकशी सुरू असल्याचे वनविभागातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. या घटनांची चौकशी सुरू झाली; पण पुढे काही झाले नाही. रोजच्या धावपळीच्या दैनंदिनीतून विरंगुळा म्हणून काही क्षण निवांत घालविण्यासाठी तारांकित वसाहत व टेकड्यांवर घरे बांधण्याची जणू स्पर्धाच सुरु आहे. यातूनच निसर्गाचा समतोल ढसळण्याची भिती व्यक्त केली जात आहे. आगामी काळात वनक्षेत्र सुरक्षित ठेवण्यासह वन्यजीवांचे रक्षण करण्यावर भर देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.   

आजार किंवा इतर प्राण्यांची शिकारमुख्य वनसंरक्षक पी.के. महाजन म्हणाले की, विभागातील काही जिल्ह्यांत ज्या वन्यजीवांचे मृतदेह आढळून आले आहेत, त्यांची त्या स्तरावर चौकशी सुरू आहे. त्यात कोणी दोषी आढळल्यास वन कायद्याप्रमाणे कारवाई केली जाणार आहे.  नैसर्गिक मृत्यू हा आजार अथवा शरीरातील पाणी कमी झाल्यानेही होऊ शकतो. चौकशीअंती ते समजू शकणार आहे. 

टॅग्स :forestजंगलdroughtदुष्काळDeathमृत्यू