शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

आव्हाने विराट असताना प्रतिसाद का नाही? : अभय बंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 18:49 IST

केळकर समितीचा अहवाल लागू करा 

ठळक मुद्देसहा वर्षांपासून हा अहवाल थंडबस्त्यात आहे.

औरंगाबाद : आज संपूर्ण जगासमोर ग्लोबल वॉर्मिंगपासून ते जातीयता, सांप्रदायिकता यासारखी विराट आव्हाने आ वासून उभी असताना त्याला प्रतिसाद का मिळत नाही, प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अनेक सभ्यता लोप पावत आहेत, महात्मा नाही तर नायक, वैश्विकदृष्टी असलेले  नवे नेतृत्व का उभे राहत नाही, राजकीय आंदोलने का उभी राहत नाहीत, असे अनेक मूलभूत प्रश्न आज येथे प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी उपस्थित केले.

ते यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात न्या. नरेंद्र चपळगावकरलिखित ‘अनंत भालेराव : काळ आणि कर्तृत्व’ या ग्रंथ प्रकाशनाप्रसंगी बोलत होते. अनंत भालेराव यांच्यावरील या ग्रंथातून प्रतिसादाची आणि नवे नायक निर्माण होण्याची प्रेरणा मिळो, अशी अपेक्षाही त्यांनी शेवटी व्यक्त केली.लेखकीय मनोगत व्यक्त करताना न्या. चळगावकर हे भावुक झाले. अनंतरावांच्या अनेक आठवणींमध्ये ते रममाण झाले. प्रारंभी, अभंग प्रकाशनचे संजीव कुलकर्णी यांनी प्रास्ताविक  केले. विश्वाधार देशमुख यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. सविता पानट यांनी आभार मानले. निशिकांत भालेराव, श्याम देशपांडे, नीमा कुलकर्णी आदींनी पाहुण्यांचे स्वागत केले. शंभर कोरे कागद व पेन, असे या स्वागताचे स्वरूप होते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पं. विद्यासागर, विजय कुवळेकर, सुरेश द्वादशीवार व दिलीप माजगावकर यांनी शुभेच्छा संदेश पाठवले होते. यावेळी निळू दामले, गोपाळ साक्रीकर, राधाकृष्ण मुळी, भास्कर ढवळे, गोविंद जोशी यांचा सत्कार करण्यात आला. चपळगावकर पती-पत्नीचा विशेष सत्कार डॉ. बंग यांच्या हस्ते करण्यात आला. अनंत भालेराव यांच्या चाहत्यांची या कार्यक्रमास मोठी गर्दी उसळली होती.

केळकर समितीचा अहवाल लागू करा स्वप्नांचा अभाव हे एक मोठे आव्हान हल्ली निर्माण झालेय. मराठवाडा तर कायम पाणीटंचाई, कायम दुष्काळ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या यामुळे ग्रासला गेलेला आहे. केळकर समितीने मराठवाड्यासाठी सव्वादोन कोटी लाख रुपयांच्या तरतुदींची शिफारस केलेली आहे.या समितीचा एक सदस्य म्हणून मी काम केलेले आहे.सहा वर्षांपासून हा अहवाल थंडबस्त्यात आहे. त्यावर ना मराठवाड्यातून आवाज उठतो, ना विदर्भातून? हा अहवाल नाकारला, तर काय गमावू याचा कुणी विचार केलाय का? या अहवालातून मराठवाडा व विदर्भ ही उपराज्ये सुचवलेली आहेत; पण त्याबद्दल कुणी काहीच बोलत नाही, याबद्दलची खंत बंग यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Abhay Bangअभय बंगSocialसामाजिकAurangabadऔरंगाबाद