शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

बस का भावा! कारच नाही, टायरसाठीही घे कर्ज! एकदम पैसे देण्याचे टाळण्यासाठी चालकांचीही पसंती

By संतोष हिरेमठ | Updated: January 31, 2024 09:22 IST

आजकाल अनेक कर्ज सुविधा उपलब्ध आहेत. कर्ज घेतले की दुचाकी, चारचाकी वाहन दारात येते.  वाहन घेण्यासाठीच नव्हेतर, आता फक्त टायर घेण्यासाठीही कर्ज दिले जाते आहे.   

- संतोष हिरेमठ छत्रपती संभाजीनगर : आजकाल अनेक कर्ज सुविधा उपलब्ध आहेत. कर्ज घेतले की दुचाकी, चारचाकी वाहन दारात येते.  वाहन घेण्यासाठीच नव्हेतर, आता फक्त टायर घेण्यासाठीही कर्ज दिले जाते आहे.   

पूर्वी कर्ज घ्यायचे म्हटले की, अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागत असे. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही कर्ज मिळेलच, याची शाश्वती नसे. मात्र, गेल्या काही वर्षांत कर्ज घेणे अगदी सोपे झाले आहे. घर, वाहन अगदी मोबाइल घेण्यासाठीही कर्जाची सुविधा अनेक कंपन्यांकडून दिली जात आहे. त्यातच आता वाहनासाठी नवे टायर घ्यायचे असतील तरीही कर्जाची सुविधा अनेक मोठ्या कंपन्यांनी उपलब्ध करून दिली आहे. अनेक टायर विक्रेत्यांकडे मोठमोठ्या फलकांवर ‘लोन पे टायर..’ लिहिलेले पाहायला मिळत आहे. 

किती आहेत किमती ?- दुचाकी - १,५०० ते २,००० रुपये- तीन, चारचाकी - २,५०० ते ३,००० रुपये- चारचाकी - ३,००० ते १०,००० रुपये 

अनेक जण कर्जावर टायर घेतात. चार ते पाच महिन्यांत हप्ते संपतात. महिन्याला  १० जण तरी कर्जावर टायर घेतात.- अमरदीप सिंंग, व्यावसायिक 

सुलभ परतफेड कर्जावर टायर खरेदी केल्यानंतर ग्राहकाला सुलभ हप्त्यांत परतफेड करण्याची सोय आहे. त्यामुळे एकाच वेळी पैसे देण्याची वेळ टळते. 

कधी बदलावेत?- सरासरी ३०  हजार ते ५० हजार कि.मी.नंतर वाहनाचे टायर बदलावेत. - टायरमध्ये दिलेल्या इंडिकेटरद्वारे अचूक वेळदेखील शोधता येते.- जेव्हा रस्त्याच्या संपर्कात असलेला भाग संपतो  तेव्हा टायर बदलण्याची वेळ आल्याचे समजावे.- टायर जीर्ण झाला असेल तर अशा परिस्थितीत टायर बदलावेत.  - टायरमध्ये अर्धा सेंटिमीटरपेक्षा जास्त छिद्र असेल तर टायर बदलावेत. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद