शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

आभाळ कोसळलं तरी ई-पीक पाहणी का नाही? अंतिम तारीख उलटली; तलाठ्यांकडे चकरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 16:15 IST

नोंदणी करण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंतची मुदत होती. ही मुदत नुकतीच संपली.

छत्रपती संभाजीनगर : ई-पीक पाहणी करण्याची जबाबदारी शेतकऱ्यांची आहे. मात्र शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामातील पिकांचा ई-पीक पेरा नोंद करण्याबाबत शासनाच्या वतीने जनजागृती करण्यात आली. मुदतवाढही देण्यात आली. मात्र, जिल्ह्याच्या ई-पीक पाहणी पेऱ्याचे प्रमाण केवळ ५६ टक्क्यांपर्यंत वाढल्याचे दिसून आले.

अंतिम तारीख उलटली; तलाठ्यांकडे चकरानोंदणी करण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंतची मुदत होती. ही मुदत नुकतीच संपली. यामुळे आता सातबाऱ्यावर पिकाची नोंद करण्यासाठी तलाठ्याकडे चकरा माराव्या लागतील.

४ वर्षांपासून ई-पीक पाहणी बंधनकारकचार वर्षांपासून राज्यात ई-पीक पाहणी ॲप्लिकेशन आणण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी शेतात जाऊन पिकाचे छायाचित्र घेऊन ॲप्लिकेशनमध्ये अपलोड करावे लागते. यासोबत पीक पेऱ्याची नोंद करणे बंधनकारक आहे. नोंदणी न करणाऱ्या शेतकऱ्यांना पुढे अनुदान, विमा मिळण्यास अडचणी येऊ शकतात.

कोणत्या तालुक्यात किती ई-पीक पाहणी ? (तक्ता)तालुका ----टक्केवारी

कन्नड - ५१.३९खुलताबाद-- ५४.२१गंगापूर--- - ५५.६३छत्रपती संभाजीनगर - ४५.६४पैठण-- ५६.४४फुलंब्री--- ५०.३८वैजापूर--- ६४सिल्लोड-- ५६.८८सोयगाव-- ७१.६५

सोयगाव एक नंबर; छत्रपती संभाजीनगर सर्वात मागेई-पीक पाहणी नोंदणी करण्यात जिल्ह्यात सोयगाव तालुका प्रथम स्थानी आहे. ७१.६५ टक्के पीक पाहणी झाली. छत्रपती संभाजीनगर तालुका सर्वात मागे आहे. केवळ ४५.६४ टक्के शेतकऱ्यांनी पीक पाहणी केली.

अनेकांकडे फोनच नाही; इंटरनेटही ‘स्लो’ॲड्राॅइड मोबाइल असणारे शेतकरी स्वत: ई-पीक पेरा नोंद करू शकतात. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे असे मोबाइल नाहीत, त्यांना इतरांच्या मोबाइलवरून नोंद करता येते. परंतु बऱ्याचदा हे ॲप्लिकेशन ‘हँग’ होते. ग्रामीण भागात इंटरनेट सुविधांचा अभावही यास कारणीभूत आहे.

४४ टक्के शेतकऱ्यांचे काय होणार?ई-पीक पाहणी करू न शकलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या ४४ टक्के असल्याचे महसूल विभागाकडून प्राप्त माहितीवरून दिसते. आता या शेतकऱ्यांचे काय होणार, असा प्रश्न आहे.

ई-पीक पाहणी ही महसूल विभागाच्या वतीने करण्यात येते. शेतकऱ्यांना ॲप्लिकेशनवर ही नोंदणी करावी लागते. नैसर्गिक संकटात पिकाचे नुकसान झाल्यास ही नोंद उपयोगी पडते. अन्यथा अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याचा प्रसंग येऊ शकतो. यामुळे दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी पीक पाहणी मुदतीत करावी.- प्रकाश देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर