छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यांत सप्टेंबर महिन्यात पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणात मागील काही वर्षांपासून वाढ झाल्याचे नोंदविण्यात आले आहे. अनेक ठिकाणी तर महिन्याच्या सरासरीच्या दुप्पट पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा बदललेला ट्रेंड हा खरीप हंगामासाठी घातक ठरतो आहे. हवामान खात्याच्या मते ३० सप्टेंबर हा पावसाळ्याचा शेवटचा दिवस असल्याचे जाहीर केले. यंदाच्या पावसाळ्यात जून, जुलै, ऑगस्टऐवजी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला.
जिल्ह्यात किती?जिल्ह्यात १४१ टक्के अतिरिक्त पावसाची नोंद सप्टेंबर अखेरपर्यंत झाली.
सप्टेंबरमधली नोंदसप्टेंबरमध्ये ३९३ मि.मी. पावसाची नोंद झाली. २३३ मि.मी. अधिक हा पाऊस आहे.
जोर‘धार’चा पॅटर्नमागील पाच वर्षांत दोन वर्षे वगळले तर तीन वर्षांत सप्टेंबरमध्ये जोरदार पाऊस झाला.
परतीचा पाऊसपरतीचा पाऊस खरीप हंगामातील पिकांची नासाडी करतो आहे. २ लाख ३७ हजार हेक्टरचे नुकसान जिल्ह्यात झाले.
कारणे काय?बंगालच्या उपसागरात सलग कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यासह मराठवाड्यात जास्त पाऊस झाला.
जागतिक हवामान बदलाचा फटका?जागतिक हवामान बदलाचा फटका पूर्णत: मान्सूनच्या पॅटर्नवर बसला आहे. त्यामुळे पावसाचे चक्र बदलल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.
३० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात झालेला पाऊसतालुका...................झालेला पाऊस .......टक्केछत्रपती संभाजीनगर... ७६७ मि.मी....... ११६ टक्केपैठण... ९३७ मि.मी............ १६६ टक्केगंगापूर...७२७ मि.मी............... १३६ टक्केवैजापूर... ७३३ मि.मी............... १६६ टक्केकन्नड... ९७० मि.मी............... १७१ टक्केखुलताबाद...९१५ मि.मी.................. १३४ टक्केसिल्लोड... ८४६ मि.मी................ १४९ टक्केसोयगाव... ९४० मि.मी............. १३४ टक्केफुलंब्री... ७२३ मि.मी...............१३२ टक्केएकूण... ८२४ मि.मी.................. १४१ टक्के
चक्रीवादळाचा परिणामचक्रीवादळाचा परिणाम आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा यांमुळे मराठवाड्यात पाऊस जास्त झाला.- श्रीनिवास औंधकर, हवामानतज्ज्ञ
पॅटर्न बदललामान्सूनचा पॅटर्न बदलल्यामुळे सप्टेंबरमध्ये पाऊस झाला आहे. तापमानवाढीमुळे हा सगळा प्रकार होतो आहे. यापुढे आणखी पाऊस पडेल.- प्रा. किरणकुमार जोहरे, हवामानतज्ज्ञ
Web Summary : Marathwada's September rainfall surged, damaging crops. Excess rain, 141% above average, hit the region due to Bay of Bengal low-pressure areas and global climate change, impacting farmers significantly, especially in September.
Web Summary : मराठवाड़ा में सितंबर में अत्यधिक वर्षा से फसलें बर्बाद हो गईं। बंगाल की खाड़ी में निम्न दबाव और जलवायु परिवर्तन के कारण 141% अधिक बारिश हुई, जिससे किसानों को भारी नुकसान हुआ।