शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

बीअर बारसमोर उभे लोक आमच्या तोंडाकडे का पाहतात? आठवीतील मुलीचा पोलीस आयुक्तांना सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 16:04 IST

शहरातील एका शाळेत इयत्ता आठवीमध्ये शिकत असलेली रोशी शेळके आईसह उपस्थित होती. पोलीस आयुक्तांसमोर मोठ्या हिमतीने तिने गंभीर प्रश्न उपस्थित केला.

ठळक मुद्देपुंडलिकनगर रोडवर ऋतुजा आणि हॉटेल शैलेश हे बीअर बार आहेत. तेथे उभे राहणारे लोक मुली व महिलांकडे टक लावून पाहतात.तक्रार घेऊन गेलेल्या महिलांना येथील पोलीस घरातील भांडण घरातच मिटवा, असा सल्ला देतात.

औरंगाबाद : साहेब, पुंडलिकनगर रोडवर दोन बीअर बार आहेत, या बार समोरुन येता जाता लोक आमच्या तोंडाकडे का पाहतात? असा गंभीर व संवेदनशील प्रश्न इयत्ता आठवीमध्ये शिकत असलेल्या रोशी शेळके या विद्यार्थिनीने पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांना केला आहे.

पोलीस प्रशासनाच्या वतीने पुंडलिकनगर येथील एका मंगल कार्यालयात स्नेहमिलन घेण्यात आले. व्यासपीठावर पोलीस आयुक्त डॉ. गुप्ता, उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहायक आयुक्त किशोर नवले उपस्थित होते. आयुक्तांच्या सूचनेनंतर नागरिकांनी त्यांचे प्रश्न, सूचना आणि मुद्दे मांडले. शहरातील एका शाळेत इयत्ता आठवीमध्ये शिकत असलेली रोशी शेळके आईसह उपस्थित होती. पोलीस आयुक्तांसमोर मोठ्या हिमतीने तिने गंभीर प्रश्न उपस्थित केला. ती म्हणाली साहेब, पुंडलिकनगर रोडवर ऋतुजा आणि हॉटेल शैलेश हे बीअर बार आहेत. तेथे उभे राहणारे लोक मुली व महिलांकडे टक लावून पाहतात. तर दुसरा मुद्दा मांडताना तिने पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन गेलेल्या महिलांना येथील पोलीस घरातील भांडण घरातच मिटवा, असा सल्ला देतात. वाद जर घरात मिटला असता तर महिलांना पोलीस ठाण्याची पायरी कशाला चढावी लागली असती, असा सवाल तिने उपस्थित केला. शाळकरी मुलीने उपस्थित केलेले मुद्दे आणि प्रश्नाने सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. माजी नगरसेविका मीना गायके, माजी नगरसेवक संतोष खेंडके, राजाराम मोरे, डॉ. उल्हास उढाण, ॲड. माधुरी अदवंत यांच्यासह ३३ नागरिकांनी सामाजिक प्रश्न मांडले. या उपक्रमासाठी सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी पुढाकार घेतला. उपनिरीक्षक मीरा चव्हाण, विकास खटके, दामिनी पथकाच्या फौजदार स्नेहा करेवाड आणि पोलिसांनी त्यांना मदत केली.

घनश्यामचे कौतुक थांबवा, सूचना द्यायावेळी प्रत्येक जण पोलीस आयुक्तांना पुंडलिकनगर ठाण्याचे प्रमुख सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे हे कसे चांगले अधिकारी आहेत, असे सागत आणि नंतर त्यांचा प्रश्न मांडत असत. हे पाहून पोलीस आयुक्तानी घनश्याम सोनवणे यांचे कौतुक थांबवा आणि सूचना सांगा, असे नागरिकांना सुनावले.

आठ दिवसांत प्रश्न मार्गी लावणारया संमेलनाचा समारोप करताना पोलीस आयुक्तांनी सर्व प्रश्नांचा अभ्यास करून आठ दिवसांत ते सोडविण्याची ग्वाही दिली. शिवाय महिनाभरानंतर पुन्हा बैठक घेण्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :Commissioner Of Police Aurangabadपोलीस आयुक्त औरंगाबादAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी