शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

बीअर बारसमोर उभे लोक आमच्या तोंडाकडे का पाहतात? आठवीतील मुलीचा पोलीस आयुक्तांना सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 16:04 IST

शहरातील एका शाळेत इयत्ता आठवीमध्ये शिकत असलेली रोशी शेळके आईसह उपस्थित होती. पोलीस आयुक्तांसमोर मोठ्या हिमतीने तिने गंभीर प्रश्न उपस्थित केला.

ठळक मुद्देपुंडलिकनगर रोडवर ऋतुजा आणि हॉटेल शैलेश हे बीअर बार आहेत. तेथे उभे राहणारे लोक मुली व महिलांकडे टक लावून पाहतात.तक्रार घेऊन गेलेल्या महिलांना येथील पोलीस घरातील भांडण घरातच मिटवा, असा सल्ला देतात.

औरंगाबाद : साहेब, पुंडलिकनगर रोडवर दोन बीअर बार आहेत, या बार समोरुन येता जाता लोक आमच्या तोंडाकडे का पाहतात? असा गंभीर व संवेदनशील प्रश्न इयत्ता आठवीमध्ये शिकत असलेल्या रोशी शेळके या विद्यार्थिनीने पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांना केला आहे.

पोलीस प्रशासनाच्या वतीने पुंडलिकनगर येथील एका मंगल कार्यालयात स्नेहमिलन घेण्यात आले. व्यासपीठावर पोलीस आयुक्त डॉ. गुप्ता, उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहायक आयुक्त किशोर नवले उपस्थित होते. आयुक्तांच्या सूचनेनंतर नागरिकांनी त्यांचे प्रश्न, सूचना आणि मुद्दे मांडले. शहरातील एका शाळेत इयत्ता आठवीमध्ये शिकत असलेली रोशी शेळके आईसह उपस्थित होती. पोलीस आयुक्तांसमोर मोठ्या हिमतीने तिने गंभीर प्रश्न उपस्थित केला. ती म्हणाली साहेब, पुंडलिकनगर रोडवर ऋतुजा आणि हॉटेल शैलेश हे बीअर बार आहेत. तेथे उभे राहणारे लोक मुली व महिलांकडे टक लावून पाहतात. तर दुसरा मुद्दा मांडताना तिने पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन गेलेल्या महिलांना येथील पोलीस घरातील भांडण घरातच मिटवा, असा सल्ला देतात. वाद जर घरात मिटला असता तर महिलांना पोलीस ठाण्याची पायरी कशाला चढावी लागली असती, असा सवाल तिने उपस्थित केला. शाळकरी मुलीने उपस्थित केलेले मुद्दे आणि प्रश्नाने सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. माजी नगरसेविका मीना गायके, माजी नगरसेवक संतोष खेंडके, राजाराम मोरे, डॉ. उल्हास उढाण, ॲड. माधुरी अदवंत यांच्यासह ३३ नागरिकांनी सामाजिक प्रश्न मांडले. या उपक्रमासाठी सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी पुढाकार घेतला. उपनिरीक्षक मीरा चव्हाण, विकास खटके, दामिनी पथकाच्या फौजदार स्नेहा करेवाड आणि पोलिसांनी त्यांना मदत केली.

घनश्यामचे कौतुक थांबवा, सूचना द्यायावेळी प्रत्येक जण पोलीस आयुक्तांना पुंडलिकनगर ठाण्याचे प्रमुख सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे हे कसे चांगले अधिकारी आहेत, असे सागत आणि नंतर त्यांचा प्रश्न मांडत असत. हे पाहून पोलीस आयुक्तानी घनश्याम सोनवणे यांचे कौतुक थांबवा आणि सूचना सांगा, असे नागरिकांना सुनावले.

आठ दिवसांत प्रश्न मार्गी लावणारया संमेलनाचा समारोप करताना पोलीस आयुक्तांनी सर्व प्रश्नांचा अभ्यास करून आठ दिवसांत ते सोडविण्याची ग्वाही दिली. शिवाय महिनाभरानंतर पुन्हा बैठक घेण्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :Commissioner Of Police Aurangabadपोलीस आयुक्त औरंगाबादAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी