शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कोरोना लसीचे औरंगाबादकरांना वावडे का? पंतप्रधान जाणून घेणार मागे राहण्याची कारणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2021 13:36 IST

PM Narendra Modi will Know reason of low Corona vaccination: लसीकरणात जिल्हा मागे राहण्याची विविध गैरसमज, अफवांसारखी काही कारणे आहेत.

औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधक लसीकरणात औरंगाबाद जिल्हा राज्यात पिछाडीवर पडला आहे. ५५ टक्क्यांवरच जिल्ह्याची गाडी थांबली आहे. देशभरात काही जिल्ह्यांची अवस्था औरंगाबादसारखीच आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (PM Narendra Modi will Know reason of low Corona vaccination:) पिछाडीवर असलेल्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत.

मागे राहण्याची कारणमीमांसा स्पष्ट करण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये सहभागी होणार आहेत. तसेच राज्यातील काही प्रमुख अधिकारी देखील सहभागी होणार आहेत. जिल्ह्यात लसीकरणाचे एकूण प्रमाण सध्या ५५ टक्के आहे. त्यात पहिला डोस घेणारे ५५, तर दुसरा डोस घेणारे २२ टक्के नागरिक आहेत. ३२ लाख २४ हजार ७७६ नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. १७ लाख ७४ हजार २७२ नागरिकांनी लसीचा पहिला डोस, तर ७ लाख २६ हजार ६३७ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. महापालिका हद्दीत १० लाख ५५ हजार ६५४ पैकी ६ लाख ३ हजार १८९ नागरिकांनी पहिला डोस, तर ग्रामीण भागात २१ लाख ६९ हजार २३ पैकी ११ लाख ७१ हजार ८३ नागरिकांनी पहिला डोस घेतला. ग्रामीण भागात ३ लाख ६ हजार १२३ जणांनी, तर ३ लाख ६५ हजार ५७४ शहरातील नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

काय आहेत पिछाडीची कारणे ?लसीकरणात जिल्हा मागे राहण्याची विविध गैरसमज, अफवांसारखी काही कारणे आहेत. विशिष्ट धर्मांच्या लोकांमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. ज्यांना परदेशात जायचे आहेत, तेच लस घेत आहेत. इतर लोक लसीकरणासाठी पुढे येत नसल्यामुळे लसीकरणाचा टक्का वाढत नसल्याचे दिसत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादNarendra Modiनरेंद्र मोदीCorona vaccineकोरोनाची लस