शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लसीचे औरंगाबादकरांना वावडे का? पंतप्रधान जाणून घेणार मागे राहण्याची कारणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2021 13:36 IST

PM Narendra Modi will Know reason of low Corona vaccination: लसीकरणात जिल्हा मागे राहण्याची विविध गैरसमज, अफवांसारखी काही कारणे आहेत.

औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधक लसीकरणात औरंगाबाद जिल्हा राज्यात पिछाडीवर पडला आहे. ५५ टक्क्यांवरच जिल्ह्याची गाडी थांबली आहे. देशभरात काही जिल्ह्यांची अवस्था औरंगाबादसारखीच आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (PM Narendra Modi will Know reason of low Corona vaccination:) पिछाडीवर असलेल्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत.

मागे राहण्याची कारणमीमांसा स्पष्ट करण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये सहभागी होणार आहेत. तसेच राज्यातील काही प्रमुख अधिकारी देखील सहभागी होणार आहेत. जिल्ह्यात लसीकरणाचे एकूण प्रमाण सध्या ५५ टक्के आहे. त्यात पहिला डोस घेणारे ५५, तर दुसरा डोस घेणारे २२ टक्के नागरिक आहेत. ३२ लाख २४ हजार ७७६ नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. १७ लाख ७४ हजार २७२ नागरिकांनी लसीचा पहिला डोस, तर ७ लाख २६ हजार ६३७ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. महापालिका हद्दीत १० लाख ५५ हजार ६५४ पैकी ६ लाख ३ हजार १८९ नागरिकांनी पहिला डोस, तर ग्रामीण भागात २१ लाख ६९ हजार २३ पैकी ११ लाख ७१ हजार ८३ नागरिकांनी पहिला डोस घेतला. ग्रामीण भागात ३ लाख ६ हजार १२३ जणांनी, तर ३ लाख ६५ हजार ५७४ शहरातील नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

काय आहेत पिछाडीची कारणे ?लसीकरणात जिल्हा मागे राहण्याची विविध गैरसमज, अफवांसारखी काही कारणे आहेत. विशिष्ट धर्मांच्या लोकांमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. ज्यांना परदेशात जायचे आहेत, तेच लस घेत आहेत. इतर लोक लसीकरणासाठी पुढे येत नसल्यामुळे लसीकरणाचा टक्का वाढत नसल्याचे दिसत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादNarendra Modiनरेंद्र मोदीCorona vaccineकोरोनाची लस