शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरचे 'लबाडांनो पाणी द्या' आंदोलन भाजपला का लागलं? अंबादास दानवेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 18:32 IST

छत्रपती संभाजीनगरातील पाणी प्रश्नांवर आम्ही महिनाभर आंदोलन केले. आमचे आंदोलन घराघरापर्यंत पोहचले आहे: अंबादास दानवे

छत्रपती संभाजीनगर: आमच्या आंदोलनाविरोधात पत्रकार परिषद घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाला लबाडांनो पाणी द्या असे आम्ही म्हणालोच नाही,  मात्र हे जर त्यांना लागलंं असेल तर आमच्या आंदोलनाच यश आहे, अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते आ.अंबादास दानवे यांनी भाजपवर टीका केली. लबाडांनो पाणी द्या हे आंदोलन  शहराच्या पाणी वाटप नियोजन कोलमडण्याविरोधात असल्याचे दानवे यांनी पत्रकार परिषदेत  स्पष्ट केले.

आ.दानवे म्हणाले की,शहर पाणी प्रश्नांवर आम्ही महिनाभर आंदोलन केले. आमचे आंदोलन घराघरापर्यंत पोहचले आहे, यामुळे ते केवळ एका पक्षाचे नव्हे तर जनतेचे आंदोलन झाले आहे. शहराला २४० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात रोज १४० एमएलडी पाणी पुरवठा होतो. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन केले तर शहरवासियांना एक,दोन दिवसाआड पाणी मिळू शकते, मात्र मनपा प्रशासक आयपीएल पाहण्यात दंग आहे. पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांवर कोणाचेही नियंत्रण नाही. आम्हाला लबाड म्हणारी पत्रके वाटप करणाऱ्या भाजपही मागील २५ ते ३० वर्ष आमच्यासोबत मनपात सत्तेत होते. विजया राहाटकर, डॉ. भागवत कराड हे महापौर होते. प्रत्येक टर्मला अनेकदा उपमहापौरही त्यांचा असायचा. एवढेच नव्हे तर स्थायी समिती सभापतीही त्यांचे होते. अतुल सावे हे जलसम्राट आहेत, तर मग भाजपला नैतिकदृष्ट्या आमच्यावर टीका करण्याचा अधिकार नसल्याचे दानवे म्हणाले.

१६८० कोटींची योजना २७४० कोटींची कशी झालीनवीन पाणी पुरवठा योजना १६८० कोटी रुपयांची होती. नंतर ती २७४०कोटी रुपयांची कशी झाली, असा सवाल आ. दानवे यांनी उपस्थित केला.  उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा  नंतर ही काम अत्यंत संथगतीने चालू आहे. या योजनेचे काम ३ फेब्रुवारी २०२४ रोजी पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र सत्ताधाऱ्याचा वचक नसल्याने योजनेचे काम दोन वर्ष पूर्ण होऊ शकत नसल्याचे आ.दानवे यांनी नमूद केले.

शुक्रवारी आदित्य ठाकरे यांचा मोर्चाशहर पाणी प्रश्नांवर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उद्या शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजता हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा पैठणगेट मार्गे गुलमंडीवर जाईल.तेथे आयोजित सभेतून समारोप होईल. रिकामे हंडे घेऊन महिला सहभागी होतील, असे आ.दानवे यांनी सांगितले.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरwater shortageपाणीकपात