कोणाचा दुष्काळ तर कोणाचा सुकाळ; छावण्यांसाठी ठेकेदारांची ‘लॉबी’ सक्रिय
By Admin | Updated: August 23, 2015 00:02 IST2015-08-22T23:38:20+5:302015-08-23T00:02:25+5:30
व्यंकटेश वैष्णव , बीड शासनाने छावणीचा आदेश काढताच ठेकेदार लॉबी छावणीचा ठेका मिळविण्यासाठी ठेकेदारांची लॉबी सरसावली आहे. दोन दिवसात ४० पेक्षा

कोणाचा दुष्काळ तर कोणाचा सुकाळ; छावण्यांसाठी ठेकेदारांची ‘लॉबी’ सक्रिय
व्यंकटेश वैष्णव , बीड
शासनाने छावणीचा आदेश काढताच ठेकेदार लॉबी छावणीचा ठेका मिळविण्यासाठी ठेकेदारांची लॉबी सरसावली आहे. दोन दिवसात ४० पेक्षा जास्त प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल झाले आहेत. यामध्ये सत्ताधारीसह मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या पदरी छावणीचा ठेका मिळण्याबाबत निराशाच येत असल्याचे चित्र आज तरी पहावयास मिळत आहे.
जिल्हयातील चारा टंचाईची स्थिती लक्षात घेता, दहा ते आकरा छावण्या तात्काळ उभारण्याचे धोरण आहे. यासाठी शनिवार पर्यंत ४० च्या वर प्रस्ताव प्राप्त आहेत. छावण्यांचा ठेका कोणाला मिळणार? यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांमधून प्रतिष्ठा पणाला लावली जात आहे.
जिल्हयात लहान मोठे मिळून नऊ लाखांच्या आसपास जनावरे आहेत. शासनाने दोन दिवसापूर्वी दुष्काळी जिल्हयांमध्ये चारा छावण्या उभारण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत शुक्रवारी जिल्हा प्रशासनाने बैठक देखील घेतली आहे. सोमवार पर्यंत काही तालुक्यातील छावण्या सुरू करण्याच्या हालचाली सुरू असून यामध्ये आष्टी तालुक्याला प्राधान्य देवून यासाठी शनिवार पर्यंत ४० च्या जवळपास प्रस्ताव आले आहेत. दाखल प्रस्तावात केवळ आष्टी तालुक्यातून २९ च्या जवळपास प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव आले आहेत. आता ठेका मिळविण्यासाठी प्रस्थापित ठेकेदारांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. असे, असले तरी काही तालुक्यात तर नेत्यानांच छावणीचा ठेका घ्यावयाचा असल्याने कार्यकर्ते व ठेकेदार यांच्या पदरी निराशाच पडण्याची शक्यता असल्याचे सूत्रानी सांगितले. ठेका मिळविण्यासाठी मात्र भाजप व त्यांच्या मित्र पक्षाचे कार्यकर्ते आपापल्या पध्दतीने ‘फिल्ंडीग’ लावत आहेत.