शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष कोण होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 17:35 IST

नावांची शोधाशोध सुरू असून दिग्गजांच्या नकारांमुळे मराठवाड्याची संधी हुकणार

- राम शिनगारे

औरंगाबाद : वर्षभरापासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा शेवट वादानेच नाशिक येथे झाला. याच संमेलनात ९५ वे संमेलन उदगीर (जि. लातूर) येथे होणार असल्याची घोषणा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी केली. त्यानंतर मराठवाड्याच्या साहित्य वर्तुळात संमेलनाचे अध्यक्षपद मराठवाड्यातील लेखकाला मिळणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यात दिग्गज लेखकांच्या नकारामुळे मराठवाड्याची संधी हुकणार असल्याची शक्यता महामंडळाच्या एका पदाधिकाऱ्याने व्यक्त केली.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्षपद मराठवाडा साहित्य परिषदेकडे आहे. हा कार्यकाळ मार्च २०२२ मध्ये संपणार आहे. त्यापूर्वी ९५वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याचा प्रयत्न आहे. त्याची तयारी ९४वे साहित्य संमेलन होण्यापूर्वीच सुरू झालेली आहे. महामंडळाच्या स्थळ निवड समितीने उदगीर येथील उदयगिरी महाविद्यालयाची पाहणी करून त्याचा अहवाल नाशिक येथे महामंडळाच्या बैठकीत सादर केला. ९५वे साहित्य संमेलन घेण्यासाठी केवळ उदगीर येथूनच निमंत्रण मिळाले होते. शेवटच्या टप्प्यात रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथील एका संस्थेनेही संमेलन घेण्यासाठी उत्सुकता दाखवली. मात्र, त्यापूर्वीच उदगीरच्या नावाची घोषणा झाल्यामुळे ते नाव मागे पडले. 

उदगीर येथील मराठवाडा साहित्य परिषदेची स्थानिक शाखा आणि उदयगिरी महाविद्यालयाने संयुक्तपणे संमेलनाचा प्रस्ताव दिलेला आहे. या दोन्ही संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या राजकीय पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे कोणत्या एका पक्षाला संमेलन दिले हा आरोप होऊ नये, याची काळजीही महामंडळाने घेतली. आता महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी नावांचा शोध सुरू केला आहे. 

आगामी आठ दिवसात त्यावर बैठक होणार आहे. मराठवाड्यातील लेखकांमध्ये प्रामुख्याने रा.रं. बोराडे, ना.धों. महानोर, सुधीर रसाळ, नरेंद्र चपळगावकर, दत्ता भगत आदींच्या नावाचा समावेश होतो. यातील चार जणांनी अध्यक्ष होण्यास नकार दिलेला आहे. तसेच, मागील वेळी चर्चेतील भारत सासणे यांचे नाव आता मागे पडले आहे. त्याशिवाय इंद्रजित भालेराव, श्रीकांत देशमुख, दासू वैद्य, पी. विठ्ठल आदी दुसऱ्या फळीतील साहित्यिक मराठवाड्यात आहेत. मात्र, त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ साहित्यिक उर्वरित महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे दुसऱ्या फळीतील लेखकांचे नाव पुढे करण्याचा धोका महामंडळ पत्करणार नाही, असे एका पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

आधी मराठवाडा, नंतर अखिल भारतीयची संधीउदगीर येथील मसाप शाखेने ४०वे मराठवाडा साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. त्यांच्या आयोजनावर ठाले पाटील समाधानी असल्यामुळेच त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाची संधी मिळाल्याची चर्चा आहे. त्यानुसार ४१व्या मराठवाडा साहित्य संमेलनाची संधी औरंगाबाद येथील लोकसंवाद फाउंडेशन संस्थेला दिली होती. आता त्या संस्थेलाही आगामी काळात ठाले पाटील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाची संधी देतील, अशीही चर्चा करण्यात येत आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादakhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळmarathiमराठी