शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
2
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
3
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
4
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
5
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी निस्तब्ध पडून राहिली नवी नवरी
6
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
7
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
8
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
9
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
10
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
11
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
12
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
13
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
14
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
15
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
16
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
17
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
18
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
19
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
20
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."

औरंगाबाद जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण होणार? महाविकास आघाडीत चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 12:00 IST

सिल्लोड, वैजापूर, कन्नड आणि पैठण तालुक्यांतील सदस्यांमध्ये चुरस

ठळक मुद्देइच्छुकांच्या मोर्चेबांधणीला सुरुवात काँग्रेसलाही अध्यक्षपदाची अपेक्षा

- राम शिनगारे  

औरंगाबाद : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षाच्या निवडणुकीला १५ दिवसांचा अवधी उरला आहे. त्यामुळे इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. राज्यात सत्तास्थानी आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमधील पक्षच जि. प. मध्ये सत्तेत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा अध्यक्ष होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अ‍ॅड. देवयानी डोणगावकर यांचा कार्यकाळ २१ सप्टेंबर रोजी संपणार होता. मात्र, विधानसभा निवडणुकीमुळे राज्य शासनाने विद्यमान पदाधिकाऱ्यांना तीन महिन्यांचा कार्यकाळ वाढवून दिला होता. हा वाढविलेला कार्यकाळ २१ डिसेंबर रोजी पूर्ण होत आहे. त्यापूर्वीच जि.प. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेत एकूण ६२ सदस्य आहेत. त्यापैकी प्रा. रमेश बोरनारे हे विधानसभा निवडणूक जिंकल्यामुळे त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यामुळे जि.प.मध्ये ६१ सदस्य असणार आहेत. यात शिवसेना १८, काँग्रेस १६, भाजप २३, राष्ट्रवादी काँग्रेस २, मनसे व रिपाइं (डेमोक्रॅटिक) पक्षाचा प्रत्येकी एक सदस्य आहे. महाविकास आघाडीचे संख्याबळ हे ३६ पर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे भाजपची सत्ता येण्याची शक्यता मावळली आहे. 

जि.प.चे अध्यक्षपद सर्वसाधारण गटातील महिलांसाठी राखीव असल्यामुळे इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विद्यमान अध्यक्षा अ‍ॅड. देवयानी डोणगावकर या पुन्हा अध्यक्षपद मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांचे पती कृष्णा पाटील डोणगावकर हे पुन्हा अध्यक्षपद मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या वेळी पक्षांतराच्या चर्चा त्यांना अडचणीच्या ठरणार आहेत. याशिवाय  सदस्या स्वाती निरफळ, शुभांगी काजे, मोनाली राठोड, पार्वताताई जाधव, वैशाली पाटील, सविता चव्हाण यांचीही नावे चर्चेत आली आहेत.

राज्य शासनामध्ये पैठण तालुक्याला मंत्रीपद मिळाल्यास अध्यक्ष हा सिल्लोड तालुक्यातील आणि सिल्लोड तालुक्याला मंत्रीपद मिळाल्यास पैठण तालुक्यातील जि.प. अध्यक्ष होण्याची शक्यता आहे. याशिवाय माजी खा. चंद्रकांत खैरे यांचे समर्थक मानले जाणारे केतन काजे यांच्या पत्नी शुभांगी काजे यांचेही पारडे तुल्यबळ असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे शुभांगी काजे यांनी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नीचा पराभव केला होता, तेव्हापासून खैरे आणि जाधव यांच्यात वितुष्ट आले होते. त्यानंतर घडलेल्या राजकारणात केतन काजे यांनी खैरे यांना सक्षमपणे साथ दिलेली आहे.

काँग्रेसलाही अध्यक्षपदाची अपेक्षाजि.प.मध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी शिवसेनेला काँग्रेस पक्षाने साथ दिली होती. शिवसेनेचे १८ सदस्य निवडून आलेले आहेत. काँग्रेसचे १६ सदस्य निवडून आलेले आहेत. त्यामुळे काँग्रेसही उर्वरित सव्वा दोन वर्षांच्या अध्यक्षपदावर दावा करण्याची शक्यता आहे. यासाठी विद्यमान सभापती मीनाताई शेळके यांचे नाव आघाडीवर आहे. मीनाताई शेळके यांचे पती काँग्रेसचे फुलंब्री तालुकाध्यक्ष असून, कल्याण काळे यांचे समर्थक आहेत. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आलेली असल्यामुळे काँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. शिवसेना अध्यक्षपद सोडण्याची शक्यता कमीच आहे. भाजपकडून अध्यक्षपदासाठी अद्यापही मोर्चेबांधणीला सुरुवात झालेली नसल्याचे समजते. मात्र, भाजपकडून अनुराधा चव्हाण यांचे नाव आघाडीवर राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस