शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
2
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
3
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
4
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
5
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
6
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
7
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
8
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
9
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
10
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
11
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
12
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
13
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
14
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
15
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
16
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
17
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
18
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
19
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
20
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स

मराठी भाषेसाठी वेळ कुणाकडे आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 11:57 PM

मयूर देवकर । लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : मराठी भाषेविषयी केवळ कागदी प्रेम बाळगणाºया शासनदरबारी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा ...

ठळक मुद्देउदासीनता : शासन आदेशालाही किंमत नाही; भाषेविषयी केवळ कागदी प्रेम

मयूर देवकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठी भाषेविषयी केवळ कागदी प्रेम बाळगणाºया शासनदरबारी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यासाठी वेळ नसल्याचे दिसून येते. संपूर्ण राज्यात १ ते १५ जानेवारीदरम्यान ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्याचा आदेश राज्य शासनाकडून काढण्यात आलेला आहे. पंधरवडा उलटून चालला तरी अनेक शासकीय कार्यालयांमध्ये पंधरवड्यानिमित्त कोणतेही कार्यक्रम घेण्यात आलेले नाहीत.शासनाने मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी व भाषेच्या संवर्धनासाठी राज्यभर १ ते १५ जानेवारी या कालावधीमध्ये ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय २२ जुलै २०१५ रोजी घेतला.त्याप्रमाणे राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, महामंडळे, राज्यातील केंद्र शासनाच्या अखत्यारीतील सर्व कार्यालये, मंडळे, सार्वजनिक उपक्रम, सर्व खाजगी व व्यापारी बँका, सर्व शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये या सर्व संस्थांना पंधरवड्यादरम्यान परिसंवाद, शिबिरे, कार्यशाळा, व्याख्याने यांसह विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करणे अपेक्षित आहे. मात्र, तसे काही होताना दिसत नाही.मराठी भाषेविषयी पोटतिडकीने बोलणाºया शासनाच्या कार्यालयांमध्येच मराठीबद्दल एवढी अनास्था असेल, तर भाषेचा कसा विकास होणार? प्रशासकीय स्तरावरून अधिकाधिक मराठीचा वापर व्हावा, मराठी ज्ञानभाषा व्हावी, तिला अभिजात दर्जा मिळाला अशी मोठी स्वप्ने कधी पूर्ण होणार? असे प्रश्न भाषाप्रेमींकडून विचारले जात आहेत.शहरातील विविध कार्यालयांशी संपर्क साधला असता शासनाच्या या निर्णयाविषयी अधिकाºयांना माहिती नसल्याचे,‘असा काही निर्णय झाला आहे का?’ या त्यांच्या प्रतिप्रश्नांवरून दिसले. पंधरवडा संपायला केवळ चार दिवस उरले असून किमान त्या काळात तरी काही कार्यक्रम होतील का, हा खरा प्रश्न आहे.शहरातील काही शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ आणि निवडक शासकीय कार्यालये वगळता राज्य शासनाच्या अनेक विभागांमध्ये पंधरवड्यामध्ये कार्यक्रम घेण्यात आलेले नाही.निवासी उपजिल्हाधिकाºयांना निर्णय माहितीच नाही४पंधरवड्यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात काही कार्यक्रम घेण्यात आले का? असे विचारले असता, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांचे उत्तर अचंबित करणारे होते. ‘असा काही निर्णय झाला का?’ असे ते म्हणाले.४विशेष म्हणजे २३ नोव्हेंबर २०१७ रोजी शासनाने यासंबंधी काढलेले परिपत्रक राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना पाठविण्यात आलेले आहे. अशीच स्थिती प्रादेशिक वाहन कार्यालय, न्यायालय, समाजकल्याण कार्यालय, मनपा या कार्यालयांची आहे.