शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Drought In Marathwada : पांढऱ्या सोन्याला माहेरातच सासरवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 13:21 IST

दुष्काळवाडा : पावसानेच दगा दिल्याने आता आशा तरी कुणाकडून करायची, या चिंतेत शेतकरी आहेत. हे भयावह चित्र आहे वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावचे. 

- मोबीन खान, खंडाळा, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद 

यंदा दुष्काळाने संकटांचा डोंगर उभा केल्याने याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पिकांची झालेली हानी, बेताची आर्थिक परिस्थिती, चाराटंचाई, पाणीटंचाई यामुळे दुष्काळाशी दोन हात करताना बळीराजा कोलमडून गेला आहे. पावसानेच दगा दिल्याने आता आशा तरी कुणाकडून करायची, या चिंतेत शेतकरी आहेत. हे भयावह चित्र आहे वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावचे. 

पांढऱ्या सोन्याचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या वैजापूर तालुक्यावर यंदा दुष्काळाची गडद  छाया आहे. संपूर्ण पावसाळा संपला तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही. आणेवारी जाहीर झाल्यानंतर खंडाळा गावाची पाहणी केली तेव्हा अतिशय विदारक स्थिती समोर आली. ज्या गावातून दरवर्षी पांढऱ्या सोन्यावर कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते, त्याच गावचे शेतकरी यंदा आर्थिक संकटात आहेत. सुमारे १८ हजार लोकवस्तीच्या गावात मतदारांची संख्या ८ हजार असून, परिसरातील शेतजमीन ३ हजार ७८७ हेक्टर आहे. येथील शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. येथील शेतकरी प्रामुख्याने दरवर्षी कांदे व कापसावरच सर्वाधिक सट्टा खेळतात. मात्र, यंदा सगळ्याच पिकांची वाट लागली. 

यावर्षी खंडाळ्यात २४० मि.मी. पाऊस झाला. सरासरीच्या तुलनेत तो ४५ टक्के बरसला. यावर्षी खरीप हंगामात कापूस, तूर, मूग, बाजरी, मक्याची पेरणी केली. मात्र, पावसाअभावी हातातोंडाशी येणारा थोडाफार घासही निसर्गाने हिरावला आहे. तलाव व विहिरींनी तळ गाठला असून, पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे. पावसाअभावी हिरव्या चाऱ्याची उपलब्धता कमी आहे, तसेच खरीप हंगामातील बाजरी, मका, चाऱ्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

जून, जुलै महिन्यात १,००० ते १,५०० रुपये शेकडा मिळणाऱ्या पेंढीची किंमत ३,००० ते ३,३०० रुपये शेकडा झाली आहे. हा चारादेखील जवळपासच्या परिसरात विक्रीसाठी उपलब्ध नसल्यामुळे, भुसकट व उपलब्ध कडब्यावर जनावरे जगवण्याची वेळ येथील शेतकऱ्यांवर आली आहे. या परिसरात खरीप हंगामातील बाजरी, मक्याचे उत्पन्न कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी आतापासूनच चाऱ्याची जमवाजमव सुरू केली आहे. चाऱ्यासाठी बाजरी, मका या पिकांची सोंगणी मोफत करून शेतमालकाला एकरी हजार रुपये द्यावे लागत आहेत. 

तिन्ही प्रकल्प कोरडेठाकयेथे पाणी साठवण करण्यासाठी बिलोनी, कोल्ही आणि पानगव्हाण लघु प्रकल्प आहे. मात्र, हे तिन्ही प्रकल्प यंदा भर पावसाळ्यात कोरडे आहेत. ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती बघून गावातील वाड्या-वस्त्यांवर पंचायत समितीने ३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला होता. मात्र, टँकरचे पाणी ग्रामस्थांपर्यंत न पोहोचता गावपुढाऱ्यांच्या विहिरीत शेतीसाठी वापरले जात असल्याचे समोर आल्याने हे टँकर बंद झाले. या प्रकरणाची गटविकास अधिकारी चौकशी करीत आहेत. 

जनावरांच्या विक्रीशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नाहीयंदा पावसाळ्यात दुष्काळी परिस्थितीने कहर केला आहे. त्यामुळे शेतकरी जनावरे बाजारात घेऊन जात आहेत. त्यांचे दर मात्र निम्म्यावर आले आहेत. विशेष म्हणजे या जनावरांना शेतकरी ग्राहक नाहीत, तर बाहेरचे व्यापारी आहेत, ते येथून स्वस्तात जनावरांची खरेदी करून ती इतर राज्यांमध्ये चढ्या दराने विकत आहेत. शेतकऱ्यांनाही जनावरांची विक्री करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

पावसाची मागील ५ वर्षाची सरासरी :

२०१३ - ४१४ मिमी 

२०१४ - ६५८ मिमी 

२०१५ - ५६५ मिमी

२०१६ - ५२३ मिमी 

२०१७  - ६२७ मिमी 

२०१८ - २६९ मिमी 

१० पैकी ७ मंडळातील ७० टक्के पिके गेलीतालुक्यात दहा महसूल मंडळे असून त्यापैकी ७ मंडळातील जवळपास ७० टक्के खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. त्यामुळे या आठवड्यात तातडीने उपाययोजना कराव्या लागणार आहेत.- अनिल कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी, वैजापूर

बळीराजा काय म्हणतो?- कधी दुष्काळ, कधी लाल्या रोगाचा फेरा तर कधी बोंडअळीचा प्रादुर्भाव अशा संकटांनी शेतकरी खचला आहे. हाती कोणतेच पीक लागत नसल्याने नैराश्य आले आहे. - कचरू जेजूरकर 

- दुष्काळाच्या या दुष्टचक्रामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. हे वास्तव आताचे नाही, तर मागील दोन वर्षांपासूनचे आहे. सतत दोन वर्षे खरीप पिकांना दुष्काळाचा फटका बसला आहे. पावसाचा खंड पडल्याने पिके सुकली असून बळीराजा डोळ्यांत अश्रू घेऊन परतीच्या पावसाची आस लावून बसला आहे. - आजम खान 

- शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करावा व जनावरांच्या छावण्या सुरू कराव्यात, अन्नधान्याचा पुरवठा करावा व सरसकट दुष्काळी अनुदान द्यावे. -सूरज पवार 

- पिण्यासाठी, जनावरांसाठी, फळबागा जगविण्यासाठी जवळपास हजारो रुपयांचे पाणी विकत घ्यावे लागले. नव्या फळबागाही जळाल्या. - साजीद खान 

- पावसाची आशा धूसर झाली असून शेतकऱ्याला चार पैसे मिळवून देणारा तसेच वर्षभर पुरेल एवढे धान्य, कडधान्य देणारा हा खरीपाचा संपूर्ण हंगाम वाया गेला आहे. चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे - संजय सूर्यवंशी

टॅग्स :droughtदुष्काळagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीMarathwadaमराठवाडा