शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

छत्रपती संभाजीनगरमधील कचरा जातोय तरी कुठे? महिनाभरात १ हजार मेट्रिक टन कचरा घटला

By मुजीब देवणीकर | Updated: August 18, 2023 19:38 IST

जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात १ हजार २४३ मेट्रिक टन कचरा घटल्याची धक्कादायक बाब समोर आली.

छत्रपती संभाजीनगर : मनपा प्रशासनाने १ ऑगस्टपासून ओला-सुका कचरा स्वीकारण्याचे धोरण पत्करले. ज्या भागातून मिक्स कचरा येईल, त्या भागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे कचरा वर्गीकरणाचे प्रमाण ९१ टक्क्यांपर्यंत गेले. मात्र, जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात १ हजार २४३ मेट्रिक टन कचरा घटल्याची धक्कादायक बाब समोर आली. नेमका हा कचरा जातोय कुठे याचा शोध महापालिकेकडून सुरू झाला आहे.

प्रशासक जी. श्रीकांत यांनी छत्रपती संभाजीनगर शहराला इन्दूरपेक्षाही सुंदर करण्याचा मानस व्यक्त केला. त्यासाठी ठोस पाऊल उचलण्यास सुरूवात झाली. ओला-सुका कचरा वेगळाच करून घेतल्या जातोय. त्यामुळे घंटागाडीतून येणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण देखील घटल्याचे समोर आले आहे. महिनाभरात १ हजार २४३ मेट्रिक टन कचरा कमी आल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सोमनाथ जाधव यांनी सांगितले. ज्या भागात वर्गीकरण न करता कचरा दिला जातो, त्या भागात नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. कचऱ्यापासून खत कसे तयार होते. सुका कचरा कुठे पाठवला जातो, हे सांगितले जात आहे. कचरा वर्गीकरण आता ९१ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचे जी. श्रीकांत यांनी सांगितले. कचऱ्याचे प्रमाणही कमी झाल्याचे जाधव यांनी सांगितले. जून महिन्यात १५ हजार १० मे. टन कचरा आला. जुलै महिन्यात १३ हजार ७७५ मेट्रिक टन कचरा आल्याचे त्यांनी नमूद केले.

दुष्परिणाम आता समोर येत आहेतकचऱ्याचे प्रमाण कमी झाले असले तरी अनेक भागात भीतीपोटी किंवा वर्गीकरण केलेला कचरा रस्त्यावर फेकला जाण्याची भीती आहे. त्यामुळे रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर देखील दंडात्मक कारवाया केल्या जाणार असल्याचे जी. श्रीकांत यांनी सांगितले. कचऱ्यात पूर्वी दगड, माती असू शकते. वजन वाढविण्यासाठी काहीही केले जाऊ शकते. त्यामुळे मूळ कारणांचा शोध घेतोय, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादGarbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका