पीएम- केअर्सचा पैसा कोठे गेला : ममता बॅनर्जी यांचा सवाल

By | Updated: December 3, 2020 04:08 IST2020-12-03T04:08:43+5:302020-12-03T04:08:43+5:30

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी सांगितले की, पीएम केअर्स फंडाचा पैसा कोठे गेला? या निधीच्या भविष्याबाबत कोणाला माहिती आहे का? ...

Where did PM-Care's money go: Mamata Banerjee's question | पीएम- केअर्सचा पैसा कोठे गेला : ममता बॅनर्जी यांचा सवाल

पीएम- केअर्सचा पैसा कोठे गेला : ममता बॅनर्जी यांचा सवाल

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी सांगितले की, पीएम केअर्स फंडाचा पैसा कोठे गेला? या निधीच्या भविष्याबाबत कोणाला माहिती आहे का? लाखो, करोडो रुपये कोठे गेले? याचे ऑडिट का? करण्यात आले नाही? केंद्र सरकार आम्हाला केवळ उपदेश करीता आहे. या सरकारने कोरोना महामारीशी लढण्यासाठी आम्हाला काय दिले, असे अनेक सवाल उपस्थित केले आहेत.

राज्यातील विधानसभा निवडणुका जवळ आल्यामुळे राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यातील २९४ जागांसाठी पुढील वर्षीच्या एप्रिल-मे महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षांनी दावा केला आहे की, राज्यातील कायदा-व्यवस्थेची स्थिती देशातील इतर राज्यांपेक्षा खूपच चांगली आहे.

उत्तर भारतात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत त्या म्हणाल्या की, कृषी विधेयकांच्या मुद्द्यांवर भाजपला दुसरा कोणताही पक्ष साथ देत नाही. तरीही हा पक्ष अडून बसला आहे.

.................................

तृणमूल सरकारने सुरू केली द्वारे सरकार मोहीम

२०२१ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील तृणमूल सरकारने द्वारे सरकार मोहीम सुरू केली आहे. राज्याच्या ११ सरकारी कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी ही मोहीम सुरू केली आहे. ती २० जानेवारीपर्यंत चालणार आहे.

लोकांनी योजनांचा लाभ घेण्यासाठी राज्यातील सर्व पंचायती व नगरपालिकेच्या वॉर्डांमध्ये स्थापित २०,००० शिबिरांमध्ये रांगा लावल्या होत्या. दोन महिन्यांतील चार टप्प्यांत हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

ममतांनी ट्वीटद्वारे म्हटले आहे की, राज्य सरकारच्या द्वारे सरकार पुढाकाराद्वारे लोकांना त्यांच्या दारापर्यंत सरकारी सेवा पोहोचवली जाईल. विविध शिबिरांमध्ये जोरात काम सुरू झाले आहे. लोकांनी याचा लाभ घ्यावा.

दरम्यान, लोकांच्या पैशावर तृणमूलने निवडणूक प्रचार मोहीम सुरू केली आहे, असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला आहे. १० वर्षे राज्यावर सत्ता गाजवल्यानंतरही या सरकारला अशा प्रकारची मोहीम राबवावी लागत आहे, यातच सर्व काही आले, असा टोलाही त्यांनी लगावला.

Web Title: Where did PM-Care's money go: Mamata Banerjee's question