शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

कुठे गेला माझा तो ‘शहाणा’ महाराष्ट्र ? मधु मंगेश कर्णिक यांचा खडा सवाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 16:42 IST

महाराष्ट्राची संवेदनशीलता संपलीय का? 

ठळक मुद्दे महाराष्ट्र ‘वेडा’ होता कामा नये, अशी आग्रही भूमिका कर्णिक यांनी मांडली.नरेंद्र चपळगावकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान 

औरंगाबाद : शंभर वर्षांची वैचारिक व शहाणपणाची परंपरा असलेला हा महाराष्ट्र.... मराठवाड्याने तर रत्नासारखी माणसे दिली.अनेक साधू-संत दिले; पण आज हा शहाणपणा व विवेकवाद उरलाय का? कु ठे गेला तो माझा ‘शहाणा’ महाराष्ट्र ? असा खडा सवाल आज येथे प्रख्यात साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी विचारला. व त्याचवेळी महाराष्ट्र ‘वेडा’ होता कामा नये, अशी आग्रही भूमिका मांडली. मसापचा जीवन गौरव पुरस्कार न्या. नरेंद्र चपळगावकर यांना देताना ते बोलत होते. मसापच्या डॉ. ना. गो. नांदापूरकर सभागृहात मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, मधुकरअण्णा मुळे आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला.

नरेंद्र चपळगावकर विचारांची दिशा देतात. न्यायबुद्धी तर त्यांच्याकडे आहेच. त्यांचं लेखन शहाणपण देऊन जाते. गेल्या १०-१५ वर्षांपासून ते जे  लिहिताहेत ते फार मोलाचं आहे. हे समाजाचं मोठं धन होय. मोठं वैभव होय,या पुरस्कारामागे मसापचं निर्मळ मन त्यांच्यामागे आहे. रक्कम किती, शाली किती याला महत्त्व नाही, असे गौरवोद्गार कर्णिक यांनी काढले. कर्णिक म्हणाले, आज पाच-सहा रुपये देऊन विकत घेतलेल्या वर्तमानपत्रात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार अशा बातम्या वाचल्यानंतर मन विषण्ण होतं. मी कुठल्या पक्षाचा नाही. एक संवेदनशील नागरिक आहे; पण राजकारणानं विवेकवाद संपवलाय. रस्त्यानं चालणाऱ्या दाभोलकरांना सहज मारलं जातं. महाराष्ट्राची संवेदनशीलता संपलीय का? 

नरेंद्र चपळगावकर मातृसंस्था मसापतर्फे हा सत्कार होतोय. मसापच्या उभारणीत राबलेल्या, निरपेक्षपणे कष्ट घेतलेल्या त्या साऱ्यांचा हा सत्कार आहे, असे मी मानतो. मसापच्या शाखांची स्थापना करणाऱ्या शिक्षकांचं आज स्मरण होतंय. मराठीच्या प्रसारासाठी मायबोली पथकाची स्थापना करणाऱ्या तुळजापूरच्या क.भ. प्रयागसारख्या कार्यकर्त्याच्या निरलस प्रेमातून साहित्य परिषद उभी राहत असते, असे सांगत नरेंद्र चपळगावकर यांनी सत्काराला उत्तर दिले. न.शे.पोहनेरकर, तु.शं. कुलकर्णी, सुधीर रसाळ, अनंत भालेराव, रा.रं. बोराडे, बाबा भांड,  कौतिकराव ठाले आदींचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला. मसापच्या कामाचा, मैत्रीचा व प्रेमाचा आनंद दिला, असे चपळगावकर यांनी कृतज्ञतेने नमूद केले. 

ज्येष्ठ समीक्षक व विचारवंत प्रा. डॉ. ऋषिकेश काबंळे यांनी नरेंद्र चपळगावकर: व्यक्ती, लेखन व कर्तृत्व यावर सविस्तर भाष्य केले. चपळगावकर यांनी आपले १८ ग्रंथ कुणाला अर्पण केले, याकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. ग्रंथ कुणाला अर्पण केले, हे फार महत्त्वाचे असते असे ते म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दलितोद्धारक या कोंदणात दलितही ठेवू इच्छितात आणि दलितेतरही. ही भूमिका चपळगावकर यांना मान्य नाही. चपळगावकर यांचं ललित लेखनही विचारलोलुप दृष्टी देणारे आहे, असे डॉ. कांबळे म्हणाले. प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी प्रास्ताविक केले, तर रंिसका देशमुख यांनी मानपत्राचे वाचन केले. डॉ. कैलास इंगळे यांनी सूत्रसंचालन केले, तर के. एस. अतकरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास कविवर्य फ. मुं. शिंदे, प्राचार्य प्रतापराव बोराडे, रा. रं. बोराडे, डॉ. सुधीर रसाळ, बाबा भांड यांच्यासह मोठ्या संख्येने रसिक-श्रोत्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :literatureसाहित्यAurangabadऔरंगाबादMaharashtraमहाराष्ट्रSocialसामाजिक