शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

मराठवाड्याला ‘सरकार’ कधी पावणार! ४५ हजार कोटींच्या पॅकेजच्या घोषणेला तीन महिने

By विकास राऊत | Updated: December 11, 2023 16:17 IST

कोणत्याही विभागाला शासकीय सूचना नाहीत

छत्रपती संभाजीनगर :मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विभागातील आठ जिल्ह्यांची झोळी ४५ हजार कोटींच्या द्वारे भरणार होते. या पॅकेजच्या घोषणेला तीन महिने झाले. सरकारकडून अद्याप कोणत्याही विभागाला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना आल्या नसल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. स्थानिक पातळीवरूनही काही हालचाली नसल्यामुळे या पॅकेजमधील कामांना मुहूर्त कधी लागणार, सरकार मराठवाड्याला कधी पावणार? असा प्रश्न आहे. ४५ हजार कोटी सर्व विभागांचे व १४ हजार ४० कोटी पश्चिम वाहिन्यांचे पाणी मराठवाड्याला मिळावे, यासाठी स्वतंत्र तरतुदीच्या घोषणेसह सुमारे ५९ हजार कोटींचे ते पॅकेज होते.

कोणत्या विभागासाठी काय केल्या घोषणाजलसंपदा – २१ हजार ५८० कोटी २४ लाख रुपये,सार्वजनिक बांधकाम - १२ हजार ९३८ कोटी ८५ लाखपशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्य व्यवसाय- ३ हजार ३१८ कोटी ५४ लाख,नियोजन – १ हजार ६०८ कोटी २८ लाख,परिवहन – १ हजार १२८ कोटी ६९ लाख,ग्रामविकास – १ हजार २९१ कोटी ४४ लाख,कृषी विभाग – ७०९ कोटी ४९ लाख,क्रीडा विभाग – ६९६ कोटी ३८ लाख,गृह – ६८४ कोटी ४५ लाख,वैद्यकीय शिक्षण – ४९८ कोटी ६ लाख,महिला व बालविकास – ३८६ कोटी ८८ लाख,शालेय शिक्षण – ४९० कोटी ७८ लाखसार्वजनिक आरोग्य -३५.३७ कोटी,सामान्य प्रशासन- २८७ कोटी,नगरविकास – २८१ कोटी ७१ लाख,सांस्कृतिक कार्य- २५३ कोटी ७० लाख,पर्यटन – ९५ कोटी २५ लाख,मदत पुनर्वसन – ८८ कोटी ७२ लाख,वन विभाग - ६५ कोटी ४२ लाख,महसूल विभाग- ६३ कोटी ६८ लाख,उद्योग विभाग- ३८ कोटी,वस्त्रोद्योग -२५ कोटी,कौशल्य विकास-१० कोटी,विधि व न्याय- ३ कोटी ८५ लाख

१४ हजार ४० कोटींची स्वतंत्र तरतूद..मराठवाड्यासाठी पश्चिमी वाहिन्यांतून पाण्यासाठी स्वतंत्र १४ हजार ४० कोटींची तरतूद केल्याची घोषणा करण्यात आली. सरलेल्या पावसाळ्यात कमी पाऊस झाला. अवकाळी पावसाने मराठवाड्याला तडाखा दिला. जायकवाडीवरील धरणातून पाणी सोडण्यासाठी निर्धारित वेळेपेक्षा एक महिना उशीर केला. या सगळ्या पार्श्वभूमीवर पश्चिमी वाहिन्यांतील पाणी मराठवाड्याला मिळावे, यावर २०१४ पासून सर्व सत्ताधाऱ्यांनी वारंवार घोषणा केल्या. त्यात १४ हजार ४० कोटींच्या स्वतंत्र घोषणेची भर पडली. याबाबत अद्याप काहीही हालचाल नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

अधिवेशनानंतर मिशन इलेक्शनहिवाळी अधिवेशनानंतर पुढील तीन महिन्यांत सरकार लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निर्णय घेऊ शकते. पुढे फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल. किमान दोन ते तीन लोकसभा महिने आचारसंहितेत जातील. तत्पूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशन घेतल्यास किंवा पुरवणी अर्थसंकल्पीय तरतुदींमध्ये सरकार काय निर्णय घेईल, ते पाहावे लागेल. जून ते ऑक्टोबर २०२४ या काळात विधानसभा निवडणुकीचे वातावरण पावसाळी अधिवेशन असेल. त्यामुळे या पॅकेजची घोषणा ही घोषणाच ठरते की काय, अशी चर्चा आहे.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाState Governmentराज्य सरकारRainपाऊस