शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याला ‘सरकार’ कधी पावणार! ४५ हजार कोटींच्या पॅकेजच्या घोषणेला तीन महिने

By विकास राऊत | Updated: December 11, 2023 16:17 IST

कोणत्याही विभागाला शासकीय सूचना नाहीत

छत्रपती संभाजीनगर :मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विभागातील आठ जिल्ह्यांची झोळी ४५ हजार कोटींच्या द्वारे भरणार होते. या पॅकेजच्या घोषणेला तीन महिने झाले. सरकारकडून अद्याप कोणत्याही विभागाला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना आल्या नसल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. स्थानिक पातळीवरूनही काही हालचाली नसल्यामुळे या पॅकेजमधील कामांना मुहूर्त कधी लागणार, सरकार मराठवाड्याला कधी पावणार? असा प्रश्न आहे. ४५ हजार कोटी सर्व विभागांचे व १४ हजार ४० कोटी पश्चिम वाहिन्यांचे पाणी मराठवाड्याला मिळावे, यासाठी स्वतंत्र तरतुदीच्या घोषणेसह सुमारे ५९ हजार कोटींचे ते पॅकेज होते.

कोणत्या विभागासाठी काय केल्या घोषणाजलसंपदा – २१ हजार ५८० कोटी २४ लाख रुपये,सार्वजनिक बांधकाम - १२ हजार ९३८ कोटी ८५ लाखपशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्य व्यवसाय- ३ हजार ३१८ कोटी ५४ लाख,नियोजन – १ हजार ६०८ कोटी २८ लाख,परिवहन – १ हजार १२८ कोटी ६९ लाख,ग्रामविकास – १ हजार २९१ कोटी ४४ लाख,कृषी विभाग – ७०९ कोटी ४९ लाख,क्रीडा विभाग – ६९६ कोटी ३८ लाख,गृह – ६८४ कोटी ४५ लाख,वैद्यकीय शिक्षण – ४९८ कोटी ६ लाख,महिला व बालविकास – ३८६ कोटी ८८ लाख,शालेय शिक्षण – ४९० कोटी ७८ लाखसार्वजनिक आरोग्य -३५.३७ कोटी,सामान्य प्रशासन- २८७ कोटी,नगरविकास – २८१ कोटी ७१ लाख,सांस्कृतिक कार्य- २५३ कोटी ७० लाख,पर्यटन – ९५ कोटी २५ लाख,मदत पुनर्वसन – ८८ कोटी ७२ लाख,वन विभाग - ६५ कोटी ४२ लाख,महसूल विभाग- ६३ कोटी ६८ लाख,उद्योग विभाग- ३८ कोटी,वस्त्रोद्योग -२५ कोटी,कौशल्य विकास-१० कोटी,विधि व न्याय- ३ कोटी ८५ लाख

१४ हजार ४० कोटींची स्वतंत्र तरतूद..मराठवाड्यासाठी पश्चिमी वाहिन्यांतून पाण्यासाठी स्वतंत्र १४ हजार ४० कोटींची तरतूद केल्याची घोषणा करण्यात आली. सरलेल्या पावसाळ्यात कमी पाऊस झाला. अवकाळी पावसाने मराठवाड्याला तडाखा दिला. जायकवाडीवरील धरणातून पाणी सोडण्यासाठी निर्धारित वेळेपेक्षा एक महिना उशीर केला. या सगळ्या पार्श्वभूमीवर पश्चिमी वाहिन्यांतील पाणी मराठवाड्याला मिळावे, यावर २०१४ पासून सर्व सत्ताधाऱ्यांनी वारंवार घोषणा केल्या. त्यात १४ हजार ४० कोटींच्या स्वतंत्र घोषणेची भर पडली. याबाबत अद्याप काहीही हालचाल नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

अधिवेशनानंतर मिशन इलेक्शनहिवाळी अधिवेशनानंतर पुढील तीन महिन्यांत सरकार लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निर्णय घेऊ शकते. पुढे फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल. किमान दोन ते तीन लोकसभा महिने आचारसंहितेत जातील. तत्पूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशन घेतल्यास किंवा पुरवणी अर्थसंकल्पीय तरतुदींमध्ये सरकार काय निर्णय घेईल, ते पाहावे लागेल. जून ते ऑक्टोबर २०२४ या काळात विधानसभा निवडणुकीचे वातावरण पावसाळी अधिवेशन असेल. त्यामुळे या पॅकेजची घोषणा ही घोषणाच ठरते की काय, अशी चर्चा आहे.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाState Governmentराज्य सरकारRainपाऊस