शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या विकासासाठी रस्ते, रेल्वे अन् विमानसेवा महत्त्वाची कधी वाटणार?

By संतोष हिरेमठ | Updated: April 25, 2024 17:17 IST

पीपल्स मॅनिफेस्टो: किती वर्षे कागदावरच विकास? राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, जिल्हावासीयांचा प्रवास खडतरच

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ‘महाराष्ट्राची पर्यटन राजधानी’ आहे. ही राजधानी कोणाच्या मेहेरबानीवर नव्हे तर या जिल्ह्याला निसर्गदत्त पर्यटनाचे लेणे लाभल्यामुळे झाली आहे. ‘पर्यटन जिल्हा’ अशी बिरूदावलीही मिळालेली आहे. रस्ते, बससेवा, रेल्वे, विमानसेवा या दळणवळण आणि वाहतूक सुविधा परिपूर्ण असल्यावर कोणत्याही जिल्ह्याचा विकास सर्वच पातळीवर फास्ट ट्रॅकवर येतो. मात्र, वर्षानुवर्षे कागदावर अन् चर्चेतच राहणाऱ्या प्रकल्पांची स्थिती पाहता जिल्ह्याच्या विकासासाठी रस्ते, रेल्वे, विमानसेवा सरकारला महत्त्वाच्या वाटत नसल्याची ओरड जनतेतून होत आहे.

जिल्ह्यातील वाहतूक क्षेत्रासाठी अनेक नव्या गोष्टींची घोषणा करण्यात आली. मात्र, काही गोष्टी झाल्या, तर काही गोष्टी अर्धवट राहिल्या, तर काही अनेक वर्षांपासून कागदावरच. त्यामुळे वाहतूक क्षेत्राच्या विकासाला खीळ बसली आहे. रेल्वे विकासाच्या बाबतीत गेल्या दोन तीन वर्षात विद्युतीकरण, पीटलाइनचा प्रश्न मार्गी लागला. रेल्वे स्टेशनही आंतरराष्ट्रीय दर्जाचे केले जाणार आहे. परंतु रेल्वेचा विकास झाला असे नाही. अद्यापही नव्या रेल्वेंपासून अनेक प्रश्न कधी सुटणार, असा प्रश्न प्रवाशांना भेडसावत आहे. अशीच काहीशी स्थिती विमानसेवा, रस्ते मार्गांबाबत आहे.

रेल्वे विकासासाठी हे गरजेचे...- अंकई (मनमाड) ते छत्रपती संभाजीनगर या ९८ कि.मी. मार्गाच्या दुहेरीकरण गतीने पूर्ण करण्याची गरज.- छत्रपती संभाजीनगर-परभणी दुहेरीकरणासाठी निधी खेचून आणावा.- रोटेगाव- पुणतांबा हा २७ कि. मी.चा प्रस्तावित कागदावरच.- छत्रपती संभाजीनगर - दौलताबाद-कन्नड-चाळीसगाव हा लोहमार्ग मार्गी लागणे.- औद्योगिक दृष्टीने आवश्यक असलेल्या छत्रपती संभाजीनगर-अहमदनगर या नवीन मार्गासाठी प्राधान्याने लक्ष घालून या मार्गाचे काम सुरू करून घ्यावे.- छत्रपती संभाजीगरच्या पीटलाइनचा २४ बोगींसाठी विस्तार व दक्षिणेकडील मालधक्का हलवून त्याजागी नवीन प्लॅटफाॅर्म करणे गरजेचे.- छत्रपती संभाजीनगरहून देशाच्या महत्त्वाच्या शहरांसाठी थेट रेल्वे सुरू करणे गरजेचे.- छत्रपती संभाजीनगर-बीड-धाराशिव मार्गाला मान्यता मिळवून द्यावी.

राजकीय नेत्यांनी कधी बसस्थानक पाहिले का? पर्यटन राजधानी असलेल्या सिडको बसस्थानकाच्या जागी उभारण्यात येणाऱ्या बसपोर्ट आणि मध्यवर्ती बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे २८ ऑगस्ट २०१९ रोजी भूमिपूजन झाले. परंतु, अद्यापही हे काम सुरू झालेले नाही. मध्यवर्ती बसस्थानकाची पार दुरवस्था झालेली आहे. राजकीय नेत्यांनी कधी हे बसस्थानक जाऊन पाहिले का, असा सवाल प्रवाशांमधून उपस्थित होतो.

इतर जिल्ह्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालये, इथे का नाही? राज्यातील लातूर, जळगाव याठिकाणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची प्रतीक्षाच करावी लागत आहे. त्यातून ग्रामीण भागातील वाहनधारकांना थेट छत्रपती संभाजीनगरच गाठावे लागते.

विमानसेवा वाढीसाठी हे आवश्यक- शहराचा ‘उडान’ योजनेमध्ये समावेश.- विमानतळाचे विस्तारीकरण गतीने पूर्ण करणे.-विमानाच्या इंधनवरील व्हॅट एक टक्का केल्यास विमानसेवा वाढीस हातभार लागेल.- एअर बेस, विमानांसह हेलिकाॅप्टर सेवा.- आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणे.- देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कार्गोसेवा. -औद्योगिक, पर्यटन शहरे, बुद्धिस्ट सर्किटला हवाई ‘कनेक्टिव्हिटी’. 

घोषणा, पण पुढे काय? शेंद्रा ते चिकलठाणा व पुढे वाळूजपर्यंत डबलडेकर उड्डाणपूल आणि मेट्रोची घोषणा झाली. यासह औट्रम बोगदा, छत्रपती संभाजीनगर ते पुणे हा विद्यमान रस्ता एक्स्प्रेस-वेमध्ये करणे यासह रस्ते मार्गाचा विकास जिल्ह्यासाठी गरजेचे आहे. मात्र, राजकीय इच्छाशक्तीअभावी रस्ते मार्गाच्या विकासाला ‘स्पीड’ मिळत नसल्याची परिस्थिती आहे.

प्रकल्पासाठी लक्ष देणे आवश्यकछत्रपती संभाजीनगरमध्ये येऊ घातलेले नवीन प्रकल्प आणि सर्वांगीण विकासासाठी येणाऱ्या नवीन खासदारांनी शहर व जिल्ह्याच्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या रेल्वे प्रकल्पासाठी लक्ष देणे आवश्यक आहे. छत्रपती संभाजीनगरची पीटलाइन सुरू झाल्यावर छत्रपती संभाजीनगर-मनमाड-दौंड-सोलापूर-विजापूर- गदग-हुबळी अशी एक्स्प्रेस सुरू करता येईल. कमी वेळात लांबचा फेरा न घेता चौदा-सोळा तासांत हुबळी गाठता येईल.- स्वानंद सोळंके, रेल्वे अभ्यासक

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४