आधुनिक मालधक्का, उड्डाणपूल होणार कधी?

By Admin | Updated: December 7, 2015 01:05 IST2015-12-07T01:01:55+5:302015-12-07T01:05:31+5:30

जालना: व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मालधक्क्याचे आधुनिकीकरण व रेल्वेस्थानक परिसरातून पुढील वसाहतींकडे जाण्यासाठी उड्डाणपूल कधी होणार

When will modern flyovers, flyover? | आधुनिक मालधक्का, उड्डाणपूल होणार कधी?

आधुनिक मालधक्का, उड्डाणपूल होणार कधी?


जालना: व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मालधक्क्याचे आधुनिकीकरण व रेल्वेस्थानक परिसरातून पुढील वसाहतींकडे जाण्यासाठी उड्डाणपूल कधी होणार , याची प्रतीक्षा सर्वांनाच आहे. गत अनेक वर्षांपासून रेल्वे प्रशासन केवळ आश्वासनांवरच बोळवण करीत आहे. दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रवींद्र गुप्ता जालना स्थानकाची तपासणी करणार आहेत. त्यांनी हे दोन्ही मु्द्दे निकाली काढावेत यासाठी प्रवासी संघटना तसेच रहिवासी सरसावले आहेत.
रेल्वे डब्याने धान्यासह येथे विविध प्रकराचा माल येतो. मात्र सुसज्ज व आधुनिक माल धक्क्याअभावी मालाची माती होते. धान्याचे रॅक लागल्यास धान्याची अतोनात नासाडी होते. धान्यासाठी असणारे गोदामही अपुरे पडते. यामुळे उघड्यावरच सर्व माल ठेवावा लागतो. मालधक्का परिसरात जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था वाईट झालेली आहे. मालधक्का परिसरात सोयीसुविधा नाहीत. या मालधक्क्याचे आधुनिकीकरण झाल्यास व्यापार वाढीस चालना मिळेल, असा दावा व्यापाऱ्यांनी केला. रेल्वेतून माल वाहतूक तुलनेने स्वस्त तुलनेने स्वस्त आहे. रेल्वेच्या विस्तीर्ण अशा जागेवर सुसज्ज असा मालधक्का उभारावा, अशी मागणी होत आहे. रेल्वेस्थानकात पिण्याच्या पाण्याची सोय नाही. टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागते. मोठे रेल्वेस्थानक पाहता सुरक्षा व्यवस्थाही तोकडी आहे. पोलीस ठाणे औरंगाबाद येथे हालविण्यात आल्याने सुरक्षा व्यवस्था ढेपाळल्याचे चित्र दिसून येते. या सर्व बाबींचा विचार महाव्यवस्थापक गुप्ता यांनी करावा, अशी मागणी होत आहे.

Web Title: When will modern flyovers, flyover?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.