शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
3
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
4
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
5
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
6
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
8
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
9
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
10
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
11
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
12
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
13
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
14
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
15
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
16
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
17
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
18
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
19
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
20
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!

२३ लाख दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कधी देणार धान्य? मराठवाड्यात जुलैपासून बंद आहे पुरवठा 

By विकास राऊत | Updated: December 13, 2022 17:06 IST

याबाबत सरकार केव्हा घेणार निर्णय?

औरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आठ जिल्ह्यांतील ५ लाख २७ हजार ४०० कार्डांवरील २३ लाख ३१ हजार १०० शेतकऱ्यांना देण्यात येणारे गहू व तांदूळ धान्याचे वितरण जुलैपासून हळूहळू बंद करण्यात आले आहे. सहा वर्षांपासून विभागातील शेतकरी ओल्या व कोरड्या दुष्काळाचा सामना करीत असताना शेतकऱ्यांना धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. 

याबाबत सरकारने अद्याप काहीही निर्णय घेतलेला नाही. २०१३ मध्ये देशात अन्न सुरक्षा कायदा लागू झाला. २०१५ साली हा कायदा राज्यात लागू झाला. यातून अंत्योदय अन्न योजना आणि एपीएल शेतकरी गटाला धान्य देण्याची तरतूद करण्यात आली. शेतकरी कुटुंबातील प्रति व्यक्तीला ५ किलो धान्य वितरित केले जात होते. दोन रुपये किलो दराने गहू आणि तीन रुपये किलो दराने तांदूळ वाटप जुलै महिन्यापर्यंत केले गेले. परंतु जुलै महिन्यापासून गहू आणि पुढे सप्टेंबरपासून तांदूळ शेतकऱ्यांच्या पदरी पडला नाही. एकीकडे शेतकरी अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे हवालदिल झालेला आहे. त्यातच शासनानेदेखील धान्य देणे थांबविले आहे.

मराठवाड्यातील कार्डधारक शेतकरी व लाभार्थी असे.....जिल्हा...............कार्डसंख्या.................लाभार्थीऔरंगाबाद .........७४ हजार ४९-------३ लाख ४२ हजार ३९८बीड ................१ लाख ३५ हजार ३३ ----५ लाख ५० हजार १५४हिंगोली.............. ३७ हजार ७६३---- १ लाख ६८ हजार ४८१जालना ...............२९ हजार ४०३ ----१ लाख ३२ हजार ५९७लातूर ................५७ हजार २३२----- २ लाख ७४ हजार ५८६नांदेड .................८८ हजार ६८० ---- ३ लाख ६५ हजार ५९३उस्मानाबाद......... ५२ हजार ८४७ ----२ लाख ६४ हजार ४९८परभणी................ ५२ हजार ३९३-----२ लाख ३२ हजार ७९३एकूण.................. ५ लाख ३७ हजार ४०० ........२३ लाख ३१ हजार १००

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीMarathwadaमराठवाडा