शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

पाणी प्रश्न पेटला असताना महानगरपालिका आयुक्त रजेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 19:17 IST

आयुक्त सुटीवर गेल्याने आणीबाणीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे सहा महिन्यांपूर्वी १८ ते २८ आॅक्टोबरदरम्यान दहा दिवसांची सुटीजिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे.

औरंगाबाद : शहरात पाणीप्रश्न पेटलेला असताना महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक हे आठ दिवसांच्या रजेवर चालले आहेत. डॉ. विनायक नांदेड येथून लॉ अभ्यासक्रमाची परीक्षा देत आहेत. मागील वर्षीप्रमाणे यंदाही ते आठ दिवसांच्या दीर्घ सुटीवर मंगळवारपासून रवाना होणार आहेत. २४ एप्रिल ते २ मेदरम्यान आयुक्त सुटीवर असल्याने अतिरिक्त पदभार जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आला. शहरात पाणी प्रश्न गंभीर बनला असताना आयुक्त सुटीवर गेल्याने आणीबाणीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

शहरात पाणीटंचाईचा प्रश्न आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने प्रशासकीय पातळीवरील निणर्य घेण्याचे अधिकार आयुक्तांकडे आहेत. आयुक्त डॉ. निपुण हे सुटीवर जात असल्याने प्रशासकीय कामाची घडी पुन्हा विस्कटण्याच्या मार्गावर आहे. यापूर्वीही आयुक्तांनीलॉ अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी सहा महिन्यांपूर्वी १८ ते २८ आॅक्टोबरदरम्यान दहा दिवसांची सुटी घेतली होती. त्यावेळी प्रभारी म्हणून जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडेच कार्यभार सोपविला होता. या काळात एकदाही चौधरी पालिकेत आले नाहीत.तसेच धोरणात्मक व वादग्रस्त निर्णयाच्या संचिकाही त्यांनी बाजूला ठेवल्या होत्या. त्यामुळे पालिकेतील कचरा प्रक्रिया प्रकल्पांसह आवश्यक कामेही खोळंबली होती.आता पुन्हा आयुक्त सुटीवर जात असल्याने या काळात जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हाधिकारी व्यस्त आहेत. 

निवडणुकीनंतर बदली?आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना यापूर्वीच शासनाने सचिवपदाचा दर्जा बहाल केला आहे. तेव्हापासून ते औरंगाबाद पालिकेतून बदलीसाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. येथील कचरा व पाणी प्रश्न सोडविण्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने त्यांनी नगरविकास विभागाकडे बदलीची मागणी केल्याचे बोलले जात आहे. सुटीवरून आयुक्त परत येतील किंवा नाही यावर साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. आयुक्तांच्या बदलीसाठी सेना-भाजप युतीचे दोन आमदार अलीकडेच सरसावले होते. मतदान होताच त्यांची बदली होईल, असाही कयास लावण्यात येत आहे. 

रोम शहर जळत असताना...महापालिकेत महापौर म्हणजे अर्जुन आहेत. त्याचे सारथी म्हणून आयुक्त काम पाहतात. शहरात पाणीटंचाईमुळे गंभीर परिस्थिती आहे. संकटाचा सामना करण्याऐवजी आयुक्त सुटीवर निघून जातात...कृष्णाने युद्धात अर्जुनाला सोडून देण्यासारखा हा प्रकार आहे. रोम शहर जळत असताना राजा निनो बासरी वाजवत होता...असा हा प्रकार आहे. आयुक्त नेहमीच जबाबदारी झटकून पळून जातात. मोबाईल डायव्हर्ट करून ठेवणे, फोन न उचलणे हे कशाचे लक्षण आहे.- दामूअण्णा शिंदे, माजी नगरसेवक

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater scarcityपाणी टंचाईWaterपाणी