शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
3
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
4
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
5
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
6
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
8
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
9
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
10
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
11
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?
12
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
13
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
14
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
15
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
16
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
17
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
18
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
19
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
20
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द

पाणी प्रश्न पेटला असताना महानगरपालिका आयुक्त रजेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 19:17 IST

आयुक्त सुटीवर गेल्याने आणीबाणीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे सहा महिन्यांपूर्वी १८ ते २८ आॅक्टोबरदरम्यान दहा दिवसांची सुटीजिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे.

औरंगाबाद : शहरात पाणीप्रश्न पेटलेला असताना महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक हे आठ दिवसांच्या रजेवर चालले आहेत. डॉ. विनायक नांदेड येथून लॉ अभ्यासक्रमाची परीक्षा देत आहेत. मागील वर्षीप्रमाणे यंदाही ते आठ दिवसांच्या दीर्घ सुटीवर मंगळवारपासून रवाना होणार आहेत. २४ एप्रिल ते २ मेदरम्यान आयुक्त सुटीवर असल्याने अतिरिक्त पदभार जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आला. शहरात पाणी प्रश्न गंभीर बनला असताना आयुक्त सुटीवर गेल्याने आणीबाणीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

शहरात पाणीटंचाईचा प्रश्न आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने प्रशासकीय पातळीवरील निणर्य घेण्याचे अधिकार आयुक्तांकडे आहेत. आयुक्त डॉ. निपुण हे सुटीवर जात असल्याने प्रशासकीय कामाची घडी पुन्हा विस्कटण्याच्या मार्गावर आहे. यापूर्वीही आयुक्तांनीलॉ अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी सहा महिन्यांपूर्वी १८ ते २८ आॅक्टोबरदरम्यान दहा दिवसांची सुटी घेतली होती. त्यावेळी प्रभारी म्हणून जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडेच कार्यभार सोपविला होता. या काळात एकदाही चौधरी पालिकेत आले नाहीत.तसेच धोरणात्मक व वादग्रस्त निर्णयाच्या संचिकाही त्यांनी बाजूला ठेवल्या होत्या. त्यामुळे पालिकेतील कचरा प्रक्रिया प्रकल्पांसह आवश्यक कामेही खोळंबली होती.आता पुन्हा आयुक्त सुटीवर जात असल्याने या काळात जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हाधिकारी व्यस्त आहेत. 

निवडणुकीनंतर बदली?आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना यापूर्वीच शासनाने सचिवपदाचा दर्जा बहाल केला आहे. तेव्हापासून ते औरंगाबाद पालिकेतून बदलीसाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. येथील कचरा व पाणी प्रश्न सोडविण्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने त्यांनी नगरविकास विभागाकडे बदलीची मागणी केल्याचे बोलले जात आहे. सुटीवरून आयुक्त परत येतील किंवा नाही यावर साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. आयुक्तांच्या बदलीसाठी सेना-भाजप युतीचे दोन आमदार अलीकडेच सरसावले होते. मतदान होताच त्यांची बदली होईल, असाही कयास लावण्यात येत आहे. 

रोम शहर जळत असताना...महापालिकेत महापौर म्हणजे अर्जुन आहेत. त्याचे सारथी म्हणून आयुक्त काम पाहतात. शहरात पाणीटंचाईमुळे गंभीर परिस्थिती आहे. संकटाचा सामना करण्याऐवजी आयुक्त सुटीवर निघून जातात...कृष्णाने युद्धात अर्जुनाला सोडून देण्यासारखा हा प्रकार आहे. रोम शहर जळत असताना राजा निनो बासरी वाजवत होता...असा हा प्रकार आहे. आयुक्त नेहमीच जबाबदारी झटकून पळून जातात. मोबाईल डायव्हर्ट करून ठेवणे, फोन न उचलणे हे कशाचे लक्षण आहे.- दामूअण्णा शिंदे, माजी नगरसेवक

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater scarcityपाणी टंचाईWaterपाणी