शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
2
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
3
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
4
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
5
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
6
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
7
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
8
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
9
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
12
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
13
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
14
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
15
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
16
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
17
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
18
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
19
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
20
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य

पाणी प्रश्न पेटला असताना महानगरपालिका आयुक्त रजेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 19:17 IST

आयुक्त सुटीवर गेल्याने आणीबाणीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे सहा महिन्यांपूर्वी १८ ते २८ आॅक्टोबरदरम्यान दहा दिवसांची सुटीजिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे.

औरंगाबाद : शहरात पाणीप्रश्न पेटलेला असताना महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक हे आठ दिवसांच्या रजेवर चालले आहेत. डॉ. विनायक नांदेड येथून लॉ अभ्यासक्रमाची परीक्षा देत आहेत. मागील वर्षीप्रमाणे यंदाही ते आठ दिवसांच्या दीर्घ सुटीवर मंगळवारपासून रवाना होणार आहेत. २४ एप्रिल ते २ मेदरम्यान आयुक्त सुटीवर असल्याने अतिरिक्त पदभार जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आला. शहरात पाणी प्रश्न गंभीर बनला असताना आयुक्त सुटीवर गेल्याने आणीबाणीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

शहरात पाणीटंचाईचा प्रश्न आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने प्रशासकीय पातळीवरील निणर्य घेण्याचे अधिकार आयुक्तांकडे आहेत. आयुक्त डॉ. निपुण हे सुटीवर जात असल्याने प्रशासकीय कामाची घडी पुन्हा विस्कटण्याच्या मार्गावर आहे. यापूर्वीही आयुक्तांनीलॉ अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी सहा महिन्यांपूर्वी १८ ते २८ आॅक्टोबरदरम्यान दहा दिवसांची सुटी घेतली होती. त्यावेळी प्रभारी म्हणून जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडेच कार्यभार सोपविला होता. या काळात एकदाही चौधरी पालिकेत आले नाहीत.तसेच धोरणात्मक व वादग्रस्त निर्णयाच्या संचिकाही त्यांनी बाजूला ठेवल्या होत्या. त्यामुळे पालिकेतील कचरा प्रक्रिया प्रकल्पांसह आवश्यक कामेही खोळंबली होती.आता पुन्हा आयुक्त सुटीवर जात असल्याने या काळात जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हाधिकारी व्यस्त आहेत. 

निवडणुकीनंतर बदली?आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना यापूर्वीच शासनाने सचिवपदाचा दर्जा बहाल केला आहे. तेव्हापासून ते औरंगाबाद पालिकेतून बदलीसाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. येथील कचरा व पाणी प्रश्न सोडविण्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने त्यांनी नगरविकास विभागाकडे बदलीची मागणी केल्याचे बोलले जात आहे. सुटीवरून आयुक्त परत येतील किंवा नाही यावर साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. आयुक्तांच्या बदलीसाठी सेना-भाजप युतीचे दोन आमदार अलीकडेच सरसावले होते. मतदान होताच त्यांची बदली होईल, असाही कयास लावण्यात येत आहे. 

रोम शहर जळत असताना...महापालिकेत महापौर म्हणजे अर्जुन आहेत. त्याचे सारथी म्हणून आयुक्त काम पाहतात. शहरात पाणीटंचाईमुळे गंभीर परिस्थिती आहे. संकटाचा सामना करण्याऐवजी आयुक्त सुटीवर निघून जातात...कृष्णाने युद्धात अर्जुनाला सोडून देण्यासारखा हा प्रकार आहे. रोम शहर जळत असताना राजा निनो बासरी वाजवत होता...असा हा प्रकार आहे. आयुक्त नेहमीच जबाबदारी झटकून पळून जातात. मोबाईल डायव्हर्ट करून ठेवणे, फोन न उचलणे हे कशाचे लक्षण आहे.- दामूअण्णा शिंदे, माजी नगरसेवक

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater scarcityपाणी टंचाईWaterपाणी