पावसाळा लांबला तरच रेल्वेने पाणी
By Admin | Updated: March 30, 2016 00:48 IST2016-03-30T00:31:55+5:302016-03-30T00:48:42+5:30
लातूर : लातूर शहरात तीव्र पाणीटंचाई असून, या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी स्थानिक स्त्रोत उपलब्ध आहेत़ भंडारवाडी, निम्न तेरणा, डोंगरगाव व धनेगाव बॅरेजेसमधून सध्या पाणी घेतले जात आहे़ प्

पावसाळा लांबला तरच रेल्वेने पाणी
लातूर : लातूर शहरात तीव्र पाणीटंचाई असून, या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी स्थानिक स्त्रोत उपलब्ध आहेत़ भंडारवाडी, निम्न तेरणा, डोंगरगाव व धनेगाव बॅरेजेसमधून सध्या पाणी घेतले जात आहे़ प्रकल्प क्षेत्रातील स्थानिकांची गरज लक्षात घेऊन लातूर शहरासाठी जून अखेरपर्यंत पाणी पुरू शकते़ पाऊस लांबला तर उजनी प्रकल्पातील पाणी रेल्वेने आणण्याचा पर्याय असून त्यानुसार राज्यशासनाकडे प्रस्ताव पाठविला असल्याचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी सांगितले़
लातूर शहरासह जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई आहे़ या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी १ हजार पेक्षा अधिक अधिग्रहण करण्यात आले आहेत़ शिवाय, २६५ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ जिल्ह्यात असलेल्या पाणी साठ्यावर लातूर जिल्ह्याची तहान भागविण्याचा प्रयत्न केला जात आहे़ सद्य स्थितीत भंडारवाडी, निम्न तेरणा, डोंगरगाव व धनेगाव बॅरेजेसमध्ये पाणी उपलब्ध आहे़ या साठ्यांत उपलब्ध पाणी बऱ्यापैकी आहे़ तेथील स्थानिक लोकांची गरज, प्रकल्पातील गाळ, बाष्पीभवनामुळे होणारी पाण्याची घट हे सर्व मुद्दे लक्षात घेतल्यासही जून अखेरपर्यंत लातूर शहराला पाणी पुरु शकते़ त्यानुसार पाणी वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे़ पाणीटंचाईचा तीव्र काळ फेबु्रवारी, मार्च होता़ उपाययोजना केल्यानंतर त्याची तीव्रता कमी झाली आहे़ सद्या भंडारवाडी, निम्न तेरणा, डोंगरगाव व धनेगाव बॅरेजेसमधील पाणी पिण्यासाठी आरक्षीत केले आहे़ तेथील लोकांची गरज आणि लातूर शहराची गरज लक्षात घेऊन या पाण्याचे सुक्ष्म नियोजन केले आहे़ तांत्रिक बाबीची तपासणी व नियोजनामुळे जून अखेरपर्यंत पाणी पुरेल़ पावसाळा लांबला तर उजनी प्रकल्पातील पाणी रेल्वेने आणण्याचा पर्याय आहे़ त्यानुसार राज्यशासनाकडे यापुर्वीच प्रस्ताव गेला आहे़ शासनाच्या विचाराधीन हा प्रस्ताव असून, शासनस्तरावर त्याची पडताळणी होत असल्याचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)