शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण कधी? किती वर्षे प्रतीक्षा करावी लागणार?

By संतोष हिरेमठ | Published: February 07, 2024 8:14 PM

मराठवाड्यात मुळातच रेल्वेचे जाळे पुरेसे नाही. त्यात बहुतांश एकेरी मार्गच. त्यामुळे रेल्वेंची संख्याही कमी आहे.

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर-अंकाई (मनमाड) या ९८ कि.मी. रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण मार्गी लागले आहे. या दुहेरीकरणासाठी अर्थसंकल्पात २१४ कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला आहे. मात्र, छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण कधी होणार, याकडे रेल्वे प्रवाशांचे आता लक्ष लागले आहे.

अमृत चतुर्भुज कॉरिडॉर योजनेत छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वे मार्ग दुहेरीकरणाचा प्रस्ताव असल्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सामाजिक माध्यमांवर सुरू आहे. यासंदर्भात एक नकाशाही व्हायरल होत आहे. नवीन रेल्वे कॉरिडॉर निर्माण करण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केली. मालवाहतुकीसाठी बांधण्यात येत असलेल्या रेल्वे कॉरिडॉरशिवाय ऊर्जा, खनिज व सिमेंट कॉरिडॉर, पोर्ट कनेक्टिव्हिटी कॉरिडॉर आणि उच्च रहदारी घनता कॉरिडॉरची घोषणा केली.

मराठवाड्यात मुळातच रेल्वेचे जाळे पुरेसे नाही. त्यात बहुतांश एकेरी मार्गच. त्यामुळे रेल्वेंची संख्याही कमी आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मनमाड-परभणी या एकेरी मार्गाचे विद्युतीकरण मार्गी लागले. कॉरिडॉर योजनेत छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण असल्याबाबत दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून दुजोरा मिळाला नाही.

१९३ कि.मी. चा मार्गगेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या परभणी-मनमाड या २९१ किलोमीटर अंतराच्या लोहमार्गाचा पूर्ण क्षमतेने वापर होत नसल्याने दुहेरीकरणाची आवश्यकता नसल्याचे उत्तर यापूर्वी लोकसभेतील प्रश्नोत्तरात केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णव यांनी दिले होते, मात्र त्याचवेळी अंकाई (मनमाड) ते छत्रपती संभाजीनगर या ९८ कि.मी. मार्गाच्या दुहेरीकरणाला ‘ग्रीन सिग्नल’ देण्यात आला. आता परभणी-छत्रपती संभाजीनगर या १९३ कि.मी. रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण कधी होणार, असा प्रश्न आहे.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRailway Passengerरेल्वे प्रवासीtourismपर्यटन