शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

'बाळासाहेब ठाकरे होते, तोपर्यंतच मातोश्रीला महत्व होतं'; संदीपान भुमरेंचा ठाकरे पिता-पुत्रांना टोला

By बापू सोळुंके | Updated: April 14, 2023 16:17 IST

''बाळासाहेब होते तेव्हा मातोश्रीला महत्त्व होते आता मातोश्रीला कोणीही जातं आणि कोणीबी येतं''

छत्रपती संभाजीनगर: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते, तोपर्यंतच मातोश्रीला महत्व होतं. आता मातोश्रीला महत्व राहिलं नाही, यामुळे तेथे आता कोणीबी येतं-जातं असा टोला, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी आदित्य ठाकरेंच्या हैदराबादच्या दौऱ्याची खिल्ली उडविली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भडकलगेट येथे डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर भुमरे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, जिल्ह्यात अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मी स्वतः पाहणी करून नुकसानीच्या पंचनामाचे करण्याचे आदेश दिले होते. पंचनामे देखील पूर्ण झालेले आहेत,  लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत मिळेल. मातोश्रीवर गेल्याने महाविकास आघाडी भक्कम होईल असे मला वाटत नाही असे नमूद करीत ते म्हणाले की, अडीच वर्ष महाविकास आघाडी  चे सरकार होते.  त्यांनी काय काम केले? एखादे तरी ठोस काम दाखवा, असा सवाल मंत्री भुमरे यांनी उपस्थित केलीा.

देशातील विरोधीपक्षांची एकजूठ करण्यासाठी महाविकास आघाडी ठाकरे गट युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे नुकतेच हैदराबादला जाऊन रेड्डीला भेटले आणि उत्तरप्रदेशात जाऊन अखिलेश यादवलाही भेटणार आहेत.याकडे लक्ष वेधले असता पालकमंत्री म्हणाले की, रेड्डीला भेटले काय आणि अखिलेश यादव ला भेटले काय? याने काहीच फरक पडणार नाही. शिवसेना-भाजप युती भक्कम आहे. महाविकास आघाडीने कितीही नाटक केली तरी काही फरक पडणार नाही. बाळासाहेब होते तेव्हा मातोश्रीला महत्त्व होते आता मातोश्रीला कोणीही जातं आणि कोणीबी येतं, असे नमूद करीत आदित्यच्या दौऱ्याची खिल्ली उडविली.

टॅग्स :Sandipan Bhumreसंदीपान भुमरेAurangabadऔरंगाबादUddhav Thackerayउद्धव ठाकरेAaditya Thackerayआदित्य ठाकरे