शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

'बाळासाहेब ठाकरे होते, तोपर्यंतच मातोश्रीला महत्व होतं'; संदीपान भुमरेंचा ठाकरे पिता-पुत्रांना टोला

By बापू सोळुंके | Updated: April 14, 2023 16:17 IST

''बाळासाहेब होते तेव्हा मातोश्रीला महत्त्व होते आता मातोश्रीला कोणीही जातं आणि कोणीबी येतं''

छत्रपती संभाजीनगर: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते, तोपर्यंतच मातोश्रीला महत्व होतं. आता मातोश्रीला महत्व राहिलं नाही, यामुळे तेथे आता कोणीबी येतं-जातं असा टोला, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी आदित्य ठाकरेंच्या हैदराबादच्या दौऱ्याची खिल्ली उडविली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भडकलगेट येथे डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर भुमरे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, जिल्ह्यात अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मी स्वतः पाहणी करून नुकसानीच्या पंचनामाचे करण्याचे आदेश दिले होते. पंचनामे देखील पूर्ण झालेले आहेत,  लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत मिळेल. मातोश्रीवर गेल्याने महाविकास आघाडी भक्कम होईल असे मला वाटत नाही असे नमूद करीत ते म्हणाले की, अडीच वर्ष महाविकास आघाडी  चे सरकार होते.  त्यांनी काय काम केले? एखादे तरी ठोस काम दाखवा, असा सवाल मंत्री भुमरे यांनी उपस्थित केलीा.

देशातील विरोधीपक्षांची एकजूठ करण्यासाठी महाविकास आघाडी ठाकरे गट युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे नुकतेच हैदराबादला जाऊन रेड्डीला भेटले आणि उत्तरप्रदेशात जाऊन अखिलेश यादवलाही भेटणार आहेत.याकडे लक्ष वेधले असता पालकमंत्री म्हणाले की, रेड्डीला भेटले काय आणि अखिलेश यादव ला भेटले काय? याने काहीच फरक पडणार नाही. शिवसेना-भाजप युती भक्कम आहे. महाविकास आघाडीने कितीही नाटक केली तरी काही फरक पडणार नाही. बाळासाहेब होते तेव्हा मातोश्रीला महत्त्व होते आता मातोश्रीला कोणीही जातं आणि कोणीबी येतं, असे नमूद करीत आदित्यच्या दौऱ्याची खिल्ली उडविली.

टॅग्स :Sandipan Bhumreसंदीपान भुमरेAurangabadऔरंगाबादUddhav Thackerayउद्धव ठाकरेAaditya Thackerayआदित्य ठाकरे