शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

'बाळासाहेब ठाकरे होते, तोपर्यंतच मातोश्रीला महत्व होतं'; संदीपान भुमरेंचा ठाकरे पिता-पुत्रांना टोला

By बापू सोळुंके | Updated: April 14, 2023 16:17 IST

''बाळासाहेब होते तेव्हा मातोश्रीला महत्त्व होते आता मातोश्रीला कोणीही जातं आणि कोणीबी येतं''

छत्रपती संभाजीनगर: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते, तोपर्यंतच मातोश्रीला महत्व होतं. आता मातोश्रीला महत्व राहिलं नाही, यामुळे तेथे आता कोणीबी येतं-जातं असा टोला, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी आदित्य ठाकरेंच्या हैदराबादच्या दौऱ्याची खिल्ली उडविली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भडकलगेट येथे डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर भुमरे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, जिल्ह्यात अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मी स्वतः पाहणी करून नुकसानीच्या पंचनामाचे करण्याचे आदेश दिले होते. पंचनामे देखील पूर्ण झालेले आहेत,  लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत मिळेल. मातोश्रीवर गेल्याने महाविकास आघाडी भक्कम होईल असे मला वाटत नाही असे नमूद करीत ते म्हणाले की, अडीच वर्ष महाविकास आघाडी  चे सरकार होते.  त्यांनी काय काम केले? एखादे तरी ठोस काम दाखवा, असा सवाल मंत्री भुमरे यांनी उपस्थित केलीा.

देशातील विरोधीपक्षांची एकजूठ करण्यासाठी महाविकास आघाडी ठाकरे गट युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे नुकतेच हैदराबादला जाऊन रेड्डीला भेटले आणि उत्तरप्रदेशात जाऊन अखिलेश यादवलाही भेटणार आहेत.याकडे लक्ष वेधले असता पालकमंत्री म्हणाले की, रेड्डीला भेटले काय आणि अखिलेश यादव ला भेटले काय? याने काहीच फरक पडणार नाही. शिवसेना-भाजप युती भक्कम आहे. महाविकास आघाडीने कितीही नाटक केली तरी काही फरक पडणार नाही. बाळासाहेब होते तेव्हा मातोश्रीला महत्त्व होते आता मातोश्रीला कोणीही जातं आणि कोणीबी येतं, असे नमूद करीत आदित्यच्या दौऱ्याची खिल्ली उडविली.

टॅग्स :Sandipan Bhumreसंदीपान भुमरेAurangabadऔरंगाबादUddhav Thackerayउद्धव ठाकरेAaditya Thackerayआदित्य ठाकरे