शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

रेल्वेची चाके फिरली अन् दिवे प्रकाशले; औरंगाबादेतील अभियंत्याचा रेल्वेतून प्रदूषणमुक्त वीजनिर्मिती दावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 15:56 IST

कोट्यवधींचा इंधन व विजेवर होणारा खर्च टाळण्याचे यशस्वी संशोधन केल्याचा दावा औरंगाबादेतील एका मेकॅनिकल इंजिनिअरने केला.

ठळक मुद्दे रेल्वेची चाके फिरली अन् दिवे प्रकाशमान झाले पाणी, डिझेल, कोळसा जाळण्याची गरज नाही

- साहेबराव हिवराळे 

औरंगाबाद : कोट्यवधींचा इंधन व विजेवर होणारा खर्च टाळण्याचे यशस्वी संशोधन केल्याचा दावा औरंगाबादेतील एका मेकॅनिकल इंजिनिअरने केला. रेल्वेचे देशभर पसरलेले जाळे अन् रेल्वे रुळांवर धावताना त्यातून निर्माण झालेली वीज महावितरणला देण्याची ही त्याची कल्पना आहे.

मेकॅनिकल इंजिनिअर विजेंद्र रोजेकर व त्यांचा मित्र संजय मुथियान हे १० वर्षांपासून यावर प्रयोग करीत आहेत. या द्वयींनी दिलेल्या माहितीनुसार डिझेल, कोळसा, पाणी, तसेच विकत घेण्यात येणारी वीज, असा एकूण अब्जावधी रुपयांचा खर्च यातून वाचविणे शक्य आहे.  रेल्वेने आता सोलार सिस्टीम पॅनल बसवून, तसेच रेल्वे प्लॅटफार्मवर प्रवाशांच्या येण्या-जाण्यामुळे वीजनिर्मितीचा प्रयोग सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे. रेल्वेमार्गात असलेल्या भुयाराच्या तोंडावर पवन चक्की बसवून हवेच्या दाबातून पवनऊर्जा देऊ शकते, किती रेल्वे येणार आणि जाणार तेवढीच वीज मिळेल. सूर्यप्रकाशामुळे सौरऊर्जा तयार होईल; परंतु एक रेल्वे दिवसभरातून किमान २० तास धावत राहणार. त्यातून विशिष्ट पद्धतीने तयार झालेली वीज रेल्वेच्या स्वयंचालण्यासाठी अधिक फायद्याची ठरणार, तसेच उर्वरित वीज रेल्वे वीज केंद्राला परत देऊ शकते. 

लोडशेडिंगची झंझट दूर होणाररेल्वेच्या प्रत्येक डब्यातून वीज तयार होऊन त्यातून रेल्वे इंजिनला पुरवून ती प्रवाहित तारांच्या माध्यमातून परत वीज केंद्रात जमा होऊ शकते. खेड्यात तसेच निवासी वसाहतीत लोडशेडिंगची झंझटच यातून निकाली निघण्याची संकल्पना मुथियान व रोजेकर यांनी मांडली.

रेल्वेची चाके फिरली अन् दिवे प्रकाशमान झालेएमआयडीसी वाळूज येथे एका शेडवर दोघांनी आपली कल्पनाशक्ती वापरून मागील ८ ते १० वर्षांपासून विविध प्रकारची साधने वापरून वीजनिर्मितीचा प्रयोग केला. रेल्वेच्या प्रतिकृतीचे इंजिन, तसेच बोगी (डबा) तयार केला. त्याची रुळावर प्रायोगिकतत्त्वावर चाचणी घेतली. बॅटरी किंवा फ्युएलवर ही रेल्वे स्टार्ट केली की, काही क्षणांत जनरेटरच्या मदतीने वीजनिर्मिती होते. गतीनुसार तिच्या आकडेवारीचे टिपणदेखील पॅनल बोर्डवर दाखवले जाते. हे तंत्रज्ञान रेल्वे व वीज मंडळाने स्वीकारल्यास महसुलाची मोठी बचत होऊन त्याचा फायदाही होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला.

टॅग्स :electricityवीजrailwayरेल्वेscienceविज्ञानAurangabadऔरंगाबाद