शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

जिल्ह्यातील वाळूचोरीबाबत आता आपण काय करणार?; औरंगाबादच्या  जिल्हाधिकाऱ्यांचे हताश आणि हतबल उद्गार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 18:45 IST

जिल्ह्यातील सरत्या हंगामात ३२ पैकी फक्त २ वाळूपट्ट्यांचे लिलाव झाले. असे असताना सर्वत्र वाळूचे साठे दिसत आहेत.

औरंगाबाद : जिल्ह्यातील सरत्या हंगामात ३२ पैकी फक्त २ वाळूपट्ट्यांचे लिलाव झाले. असे असताना सर्वत्र वाळूचे साठे दिसत आहेत. शहरात येणारी वाळू कुठून येत आहे. वाळूची तस्करी जोरदार सुरू असून, शासनाचा महसूल बुडाला आहे. २०१५ ते २०१८ वाळूचोरीबाबत प्रशासन काही करणार की नाही. वाळूचोरीबाबत आता आपण काय करणार, आता डोक्याने काम करावे लागणार, थेट समोर जाऊन कारवाई कशी करणार, असे हतबल आणि हताश उद्गार जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना काढले. 

२०१५ पासून आजवर वाळूचोरीचा कांगावा होतो; परंतु त्यावर जिल्हा प्रशासनाने काहीही कृती का केली नाही, शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडालाच, शिवाय वाळूपट्टेदेखील रिकामे होत गेले. याचा अर्थ सर्रासपणे वाळूचोरी सुरू असल्याचे स्पष्ट होते. जिल्हाधिकारी म्हणाले, वाळूचोरी दिवाळीनंतर बंद होईल. ठेकेदारांनी रिंग करून वाळूपट्टे घेतले, तर प्रशासनाची अडचण होईल. मागच्या वेळी वाळूपट्ट्यांचा लिलाव झाला नाही. काय करावे, ते कळत नाही. वाळूचोरीची वाहने जप्ती करणे, वाहनचालकाचे लायसन्स जप्त करण्याच्या कारवाईचे परिपत्रक काढले आहे. त्यानुसार कारवाई केली जाईल. खदानीतील उपसा आणि वाळूचोरी वर्षभरात बंद होईल. त्यानंतर १० वर्षे त्याचा परिणाम राहील. तात्पुरत्या दगड खदानी बंद केल्या आहेत. यापुढे सरकारी जागेवरील खदानींसाठी ५ वर्षे करार करावा लागेल. नॅशनल हायवेसाठीच खदानीचा परवाना दिला जाईल. खदानींबाबत शासनाचे धोरण जेव्हा स्पष्ट होईल तेव्हा परवानगींचा विचार केला जाईल. यावेळी दिवाळीपूर्वी वाळूपट्ट्यांचा लिलाव होईल, शासनाला महसूल मिळेल, असा दावा चौधरी यांनी केला. 

जिल्हाधिकारी कोण, मी का तुम्हीकिमान एकतरी कारवाई अशी करावी, जेणेकरून वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्यांना चाप बसेल. एमपीडीएसारखी कारवाई झाल्यास शासनाचा महसूल बुडविणाऱ्यांना धाक बसू शकेल, असे पत्रकारांनी जिल्हाधिकाऱ्यांना विचारले असता, जिल्हाधिकारी पत्रकारांवर घसरले. ते म्हणाले, जिल्हाधिकारी कोण, मी का तुम्ही. सिस्टिममध्ये परिवर्तन आणावे लागेल. सात ते आठ महिन्यांनी वाळूचोरीबाबत विचारा, निश्चितपणे बदल झालेला दिसेल. वाळूचोरीबाबत कारवाईने प्रश्न सुटेल काय, असा प्रश्न त्यांनी पत्रकारांना केला.

एमआरसॅककडे नकाशाचे कामखदानींचा नकाशा तयार करण्याचे काम एमआरसॅककडे (महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अ‍ॅप्लिकेशन) देण्यात आले आहे. त्याचा मसुदा तयार झाला असून, एक महिन्यात नकाशे अंतिम होतील. एमआरसॅक जिओलॉजिकल नकाशा तयार करते. त्याआधारे जिल्ह्यातील खदानींची माहिती उपलब्ध होईल. कोणत्या खदानीतून किती दगड (गौण खनिज) उपसा व्हावा, खदानीत दगड आहे की नाही, याची माहिती त्या मॅपमुळे समजेल.

२०११ पासून काय केलेजिओलॉजिकल मॅप करून घेण्याबाबत २०११ साली शासनाने सूचना केल्या आहेत. त्याबाबत आजवर काहीही निर्णय झाला नसल्याचे सांगून जिल्हाधिकारी चौधरी यांनी आजवरच्या जिल्हाधिकाऱ्यांना लक्ष्य केले.एमआरसॅककडून नकाशाचे काम पूर्ण झाल्यानंतर दर तीन महिन्यांनी खदानींची मोजणी होईल. त्यामध्ये सर्व्हे नं., गावनिहाय गौण खनिजाची माहिती समोर येईल. सर्व झोन एकत्रित करण्यात येतील.गौण खनिज उपसा करण्याची मागणी आल्यास नकाशाच्या आधारे कुठे किती खनिज आहे, किती परवानगी द्यायची, याचा निर्णय दहा मिनिटांत होईल, असा दावा जिल्हाधिकाऱ्यांनी केला. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादsandवाळूAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद