शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

निवडणुकीच्या तोंडावर मराठवाड्याच्या पदरात काय पडणार ? अर्थमंत्री पवारांकडे लक्ष

By विकास राऊत | Updated: January 10, 2024 15:24 IST

सरत्या आर्थिक वर्षाचा खर्च ३० टक्क्यांवर

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता फेब्रुवारी- मार्चमध्ये लागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर लगबग सुरू झाली असून १० जानेवारी रोजी विभागाचे २०२४-२५ साठी अर्थमंत्री अजित पवार ऑनलाइन बैठक घेणार आहेत. यात आठ जिल्ह्यांची नवीन मागणी व आजवरचा खर्च यावर चर्चा होऊन नवीन आराखड्यात आर्थिक तरतुदीचा निर्णय होईल.

यंदाचे वर्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जाणार आहे, त्यामुळे सामान्यांना खुश करणाऱ्या याेजनांचा अंतर्भाव विभागीय वित्त व नियेाजनात असावा, यासाठी सत्ताधारी आमदार-खासदारांचा प्रयत्न असणार आहे.दरम्यान पुढे अफाट, मागे सपाट अशी परिस्थिती असून गेल्या वर्षी केलेल्या २,९४५ कोटी रुपयांच्या तरतुदीतून महसूल व भांडवली मिळून फक्त ३० टक्के म्हणजेच ८४५ कोटींचा खर्च विभागातील आठही जिल्ह्यांत झाला आहे. असे असताना नवीन आराखड्यासाठी विभागीय नियोजन बैठक होत आहे.

जानेवारी २०२३ च्या शेवटच्या आठवड्यात तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्तालयात आठ जिल्ह्यांनी त्यांच्या कामांचे प्रस्ताव सादर केले होते. तब्बल चार हजार ४०० कोटी रुपयांच्या प्रस्तावांचा यात समावेश होता. मागणीपैकी एक हजार ४५५ कोटींची कामे रद्द करीत दाेन हजार ९४५ कोटींची वार्षिक योजना विभागासाठी मंजूर केली होती. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये हा निधी आठ जिल्ह्यातील विकासकामांवर खर्च करणे गरजेचे आहे.

मागील आराखड्यांचा आकडा....वर्ष २०२१-२२ साठी २,६०५ कोटींचा आराखडा होता.वर्ष २०२२-२३ साठी २९४५ कोटींचा आराखडा होता.वर्ष २०२३-२४ साठी ३५०० कोटींचा आराखडा असू शकतो.

जिल्हानिहाय मंजुरी व सरासरी खर्चजिल्हा...........मंजूर निधी.........खर्चछत्रपती संभाजीनगर- ५६०......१२५ कोटीजालना - ३२५...........५० कोटीपरभणी - २९०..........४० कोटीहिंगोली - २३५...........५० कोटीबीड- ४१०..............७० कोटीधाराशिव- ३४०..........१५० कोटीलातूर- ३४०.............१५० कोटीनांदेड- ४४५............२१० कोटीएकूण २,९४५.............८४५ कोटी

लोकसभा आचारसंहिता मार्चमध्येलोकसभा निवडणुकीसाठी निर्धारित वेळेत आचारसंहिता लागेल, असे बोलले जात आहे. तत्पूर्वी होणाऱ्या नियोजन बैठकांमध्ये मतदार समोर ठेवून निर्णय हाेतील, असे बोलले जात आहे.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाAjit Pawarअजित पवारAurangabadऔरंगाबाद