शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
3
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
4
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
5
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
6
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
7
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
8
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
9
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
10
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती
11
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
12
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
13
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
14
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
15
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
16
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
17
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
18
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
19
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
20
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे

पंतप्रधान मोदींनी आपल्याला काय मंत्र दिला? भागवत कराडांनी एका वाक्यात सांगितलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 11:06 IST

मराठवाडा हा महाराष्ट्रातील सर्वात मागास भाग आहे. या भागाच्या विकासासाठी इंजिनिअरिंग, मेडिकल आणि मॅनेजमेंटचे उच्च शिक्षण अतिशय आवश्यक आहे. औरंगाबादेत आयआयटी सुरु झाले तर तेथे अनेक प्रकारचा औद्योगिक विकास होईल.

नितीन अग्रवाल -

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील चार नव्या नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. यात डॉ. भागवत कराड यांना अर्थमंत्रालयात राज्यमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रथमच भविष्यातील योजनांसह अनेक विषयांवर ‘लोकमत’चे विशेष प्रतिनिधी नितीन अग्रवाल यांच्याशी मनमोकळी चर्चा केली...

- मंत्री झाल्यानंतर आपली प्राथमिकता काय? मी महाराष्ट्राच्या मराठवाड्यातील आहे आणि केंद्रीय स्तरावर मला जबाबदारी मिळाली आहे. विकासाच्या बाबतीत मराठवाडा बराच मागे आहे. राज्यसभा सदस्य म्हणून मराठवाडा आणि औरंगाबादच्या समस्या व विकासाचे मुद्दे मी संसदेत मांडू इच्छितो. केंद्रीय मंत्री झाल्यानंतर मंत्रालयाच्या जबाबदाऱ्यांसोबत मराठवाड्याचा विकास ही माझी प्राथमिकता आहे. काही गोष्टी मी ठरविल्या आहेत ज्यामुळे मराठवाड्याचा विकास वेगाने होऊ शकेल. 

- पंतप्रधान मोदी यांनी आणखी काय मंत्र दिला आपल्याला? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दूरदर्शी व्यक्ती आहेत. सब का साथ, सब का विकास हाच त्यांचा मूलमंत्र आहे. नवी जबाबदारी देताना त्यांनी आम्हाला केवळ एकच मंत्र दिला की, कर्तव्यनिष्ठेसोबत आपली जबाबदारी पार पाडा. मागास आणि गरिबांच्या विकासासाठी काम करण्यास सांगितले आहे. शपथ घेण्यापूर्वी आणि पद स्वीकारल्यानंतरही त्यांनी केवळ आणि केवळ विकास आणि जनकल्याणावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. 

- महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय वातावरणाबाबत काय सांगाल? महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारमुळे लोक पूर्णपणे त्रस्त आहेत. भाजप- शिवसेना युतीसाठी मतदान झाले होते आणि लोकांना हे ठाऊक आहे की, शिवसेनेने कशाप्रकारे तो विश्वास तोडून हे सरकार स्थापन केले आहे. जनतेला या सरकारवर अजिबात विश्वास नाही. त्यामुळे या सरकारचे राजकीय भविष्य दीर्घकाळ आहे असे वाटत नाही. 

- लोकमतच्या वाचकांसाठी काही संदेश? लोकमत खऱ्या अर्थाने सर्वसामान्य आणि खास अशा दोन्ही प्रकारच्या लोकांचा आवाज आहे. माझा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे याची माहितीही मला सर्वात अगोदर लोकमतकडून मिळाली. जनकल्याणाचे मुद्दे उपस्थित करण्यासोबतच समाज कल्याणाची जबाबदारीही लोकमतने समर्थपणे सांभाळलेली आहे. असे काम क्वचितच पाहायला मिळते. अलीकडेच लोकमतने पूर्ण महाराष्ट्रात रक्तदान मोहीम चालविली. जनकल्याणाबाबत असा विचार ठेवणाऱ्या लोकमतला माझ्या शुभेच्छा. 

अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या मराठवाड्याच्या विकासासाठी आपण आवश्यक मानता? मराठवाडा हा महाराष्ट्रातील सर्वात मागास भाग आहे. या भागाच्या विकासासाठी इंजिनिअरिंग, मेडिकल आणि मॅनेजमेंटचे उच्च शिक्षण अतिशय आवश्यक आहे. औरंगाबादेत आयआयटी सुरु झाले तर तेथे अनेक प्रकारचा औद्योगिक विकास होईल. विशेष करुन ऑटोमोबाईल्स उद्योगाला बळ मिळेल. यामुळे मराठवाड्यात विकासाला वेग येईल. मी संसदेतही याबाबत मागणी केलेली आहे. दुसरी मोठी गरज आरोग्य सेवांची आहे. -    औरंगाबादेतील सरकारी रुग्णालयात १२ जिल्ह्यातून लोक उपचारासाठी येतात. जर तिथे एम्ससारखे मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल झाले तर उपचारासोबत या भागाचा विकासही होईल. -    देशात १२ एम्स उभारण्यासाठी पंतप्रधान स्वत: इच्छुक आहेत. नागपुरात एका एम्सची स्थापना यापूर्वीच झाली आहे. मी औरंगाबादसाठी आणखी एका एम्सची मागणी करेन.  

टॅग्स :Bhagwat Karadडॉ. भागवतNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाAurangabadऔरंगाबाद