शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
3
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
4
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
5
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
6
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
7
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
8
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
9
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
10
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
11
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
12
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
13
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
14
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
15
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
16
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
17
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
18
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
19
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
20
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा

पंतप्रधान मोदींनी आपल्याला काय मंत्र दिला? भागवत कराडांनी एका वाक्यात सांगितलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 11:06 IST

मराठवाडा हा महाराष्ट्रातील सर्वात मागास भाग आहे. या भागाच्या विकासासाठी इंजिनिअरिंग, मेडिकल आणि मॅनेजमेंटचे उच्च शिक्षण अतिशय आवश्यक आहे. औरंगाबादेत आयआयटी सुरु झाले तर तेथे अनेक प्रकारचा औद्योगिक विकास होईल.

नितीन अग्रवाल -

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील चार नव्या नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. यात डॉ. भागवत कराड यांना अर्थमंत्रालयात राज्यमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रथमच भविष्यातील योजनांसह अनेक विषयांवर ‘लोकमत’चे विशेष प्रतिनिधी नितीन अग्रवाल यांच्याशी मनमोकळी चर्चा केली...

- मंत्री झाल्यानंतर आपली प्राथमिकता काय? मी महाराष्ट्राच्या मराठवाड्यातील आहे आणि केंद्रीय स्तरावर मला जबाबदारी मिळाली आहे. विकासाच्या बाबतीत मराठवाडा बराच मागे आहे. राज्यसभा सदस्य म्हणून मराठवाडा आणि औरंगाबादच्या समस्या व विकासाचे मुद्दे मी संसदेत मांडू इच्छितो. केंद्रीय मंत्री झाल्यानंतर मंत्रालयाच्या जबाबदाऱ्यांसोबत मराठवाड्याचा विकास ही माझी प्राथमिकता आहे. काही गोष्टी मी ठरविल्या आहेत ज्यामुळे मराठवाड्याचा विकास वेगाने होऊ शकेल. 

- पंतप्रधान मोदी यांनी आणखी काय मंत्र दिला आपल्याला? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दूरदर्शी व्यक्ती आहेत. सब का साथ, सब का विकास हाच त्यांचा मूलमंत्र आहे. नवी जबाबदारी देताना त्यांनी आम्हाला केवळ एकच मंत्र दिला की, कर्तव्यनिष्ठेसोबत आपली जबाबदारी पार पाडा. मागास आणि गरिबांच्या विकासासाठी काम करण्यास सांगितले आहे. शपथ घेण्यापूर्वी आणि पद स्वीकारल्यानंतरही त्यांनी केवळ आणि केवळ विकास आणि जनकल्याणावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. 

- महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय वातावरणाबाबत काय सांगाल? महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारमुळे लोक पूर्णपणे त्रस्त आहेत. भाजप- शिवसेना युतीसाठी मतदान झाले होते आणि लोकांना हे ठाऊक आहे की, शिवसेनेने कशाप्रकारे तो विश्वास तोडून हे सरकार स्थापन केले आहे. जनतेला या सरकारवर अजिबात विश्वास नाही. त्यामुळे या सरकारचे राजकीय भविष्य दीर्घकाळ आहे असे वाटत नाही. 

- लोकमतच्या वाचकांसाठी काही संदेश? लोकमत खऱ्या अर्थाने सर्वसामान्य आणि खास अशा दोन्ही प्रकारच्या लोकांचा आवाज आहे. माझा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे याची माहितीही मला सर्वात अगोदर लोकमतकडून मिळाली. जनकल्याणाचे मुद्दे उपस्थित करण्यासोबतच समाज कल्याणाची जबाबदारीही लोकमतने समर्थपणे सांभाळलेली आहे. असे काम क्वचितच पाहायला मिळते. अलीकडेच लोकमतने पूर्ण महाराष्ट्रात रक्तदान मोहीम चालविली. जनकल्याणाबाबत असा विचार ठेवणाऱ्या लोकमतला माझ्या शुभेच्छा. 

अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या मराठवाड्याच्या विकासासाठी आपण आवश्यक मानता? मराठवाडा हा महाराष्ट्रातील सर्वात मागास भाग आहे. या भागाच्या विकासासाठी इंजिनिअरिंग, मेडिकल आणि मॅनेजमेंटचे उच्च शिक्षण अतिशय आवश्यक आहे. औरंगाबादेत आयआयटी सुरु झाले तर तेथे अनेक प्रकारचा औद्योगिक विकास होईल. विशेष करुन ऑटोमोबाईल्स उद्योगाला बळ मिळेल. यामुळे मराठवाड्यात विकासाला वेग येईल. मी संसदेतही याबाबत मागणी केलेली आहे. दुसरी मोठी गरज आरोग्य सेवांची आहे. -    औरंगाबादेतील सरकारी रुग्णालयात १२ जिल्ह्यातून लोक उपचारासाठी येतात. जर तिथे एम्ससारखे मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल झाले तर उपचारासोबत या भागाचा विकासही होईल. -    देशात १२ एम्स उभारण्यासाठी पंतप्रधान स्वत: इच्छुक आहेत. नागपुरात एका एम्सची स्थापना यापूर्वीच झाली आहे. मी औरंगाबादसाठी आणखी एका एम्सची मागणी करेन.  

टॅग्स :Bhagwat Karadडॉ. भागवतNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाAurangabadऔरंगाबाद