शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

'ही' कसली टिंगलटवाळी चाललीय? अजित पवारांचा सरकारला संतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 14:17 IST

राज्यातील पूर परिस्थितीमुळे राष्ट्रवादीने नाशिक जिल्हयातील बागलाण येथे यात्रा स्थगित केली आली होती.

औरंगाबाद - शिवस्वराज्य यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरूवात आज पैठण येथे संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन झाली. त्यानंतर बाळानगर येथे झालेल्या पहिल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रसेचे विधिमंडळ पक्षनेते आ. अजित पवार यांनी सभेला संबोधित करताना फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. पूरस्थितीतही हे सरकार असंवेदनशील असून कसली टिंगलटवाळी चालली आहे, अशा शब्दात फडणवीस सरकारवर टीका केली. मंत्री गिरीश महाजन यांच्या सेल्फी वादावर बोलताना अजित पवार यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. 

महाराष्ट्रावर पूरस्थिती ओढावल्यानंतर अनेकांनी मदतीचा हात पुढे केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी तातडीने सांगली, सातारा, कोल्हापूरात काम सुरु केले. राष्ट्रवादीचे सर्वच नेते शक्यतोपरी मदत करत आहेत. पण, हे सरकार प्रचंड असंवेदनशील असल्याचे दिसून आले. पुरात माणसांचे प्राण गेले, आणि यांचे मंत्री फोटो काढत फिरले. ही कसली टिंगलटवाळी चालली आहे ? या सरकारला कसली मस्ती आहे ? असा प्रश्न पवार यांनी सरकारला विचारला. 

सरकार असमर्थ असल्यामुळे अजूनपर्यंत सरसकट कर्जमाफी मिळाली नाही. शिवसेना पीकविमा कंपन्यांविरोधात मुंबईत आंदोलन करते. पण, त्यांना रब्बी व खरीप हंगाम कळत नाही. सरकारच्या काळात एअर इंडिया, बीएसएनएल, एमटीएनएल, एअरसेल अशा असंख्य कंपन्या बंद पडण्याच्या मार्गावर आहे. उद्योगपती आत्महत्या करत आहेत. महाराष्ट्रासाठी अलमट्टी धरणाचे पाणी सोडण्यासाठी योग्यवेळी निर्णय घेता आला नाही. मग, हे सरकर करतयं तरी काय? असेही प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केले.

तत्पूर्वी राज्यातील पूर परिस्थितीमुळे राष्ट्रवादीने नाशिक जिल्हयातील बागलाण येथे यात्रा स्थगित केली आली होती. आता पूरस्थिती निवळत असल्याने पुन्हा यात्रा सुरू करण्यात आली आहे. त्यावेळी, पैठण मतदारसंघातून यात्रेला प्रारंभ होताच, खासदार अमोल कोल्हेंनी शिवसेनेवर प्रहार केला. जनआशीर्वाद यात्रा घेऊन ते आले का नाहीत अजून ? असे म्हणत आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं. तसेच, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंना तुम्ही प्रश्न विचारा असे आवाहनही अमोल कोल्हेंनी उपस्थित पैठणकरांना केले.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारfloodपूरKolhapur Floodकोल्हापूर पूरpaithan-acपैठण