शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

पाणीवापरावर निर्बंध, तलावातील पाणी राखीव ठेवणे म्हणजे काय?

By बापू सोळुंके | Updated: September 8, 2023 20:04 IST

या वर्षीसारख्या दुष्काळसदृश अपवादात्मक परिस्थितीत १५ ऑक्टोबरपूर्वीही पाणीवापरावर निर्बंध आणण्याचा निर्णय घेतला जातो.

छत्रपती संभाजीनगर : अत्यल्प आणि रिमझिम पावसामुळे मराठवाडा दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा आहे. धरणे तळ गाठू लागल्याने ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे संकट उभे राहू शकते. ही बाब लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर तहसीलदार उपलब्ध जलसाठ्यातील पाणीवापरावर निर्बंध टाकून पाणी राखीव ठेवत आहेत.

पाणी राखीव ठेवणे म्हणजे काय?कोणत्याही लहान-मोठ्या धरणात १५ ऑक्टोबर रोजी धरणात उपलब्ध पाणीसाठा किती आहे आणि वर्षभर पिण्यासाठी किती पाण्याची आवश्यकता आहे, याचा अभ्यास करून पाणी राखीव ठेवण्याचा निर्णय पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील आणि जिल्हाधिकारी यांचा समावेश असलेली समिती घेत असते. या वर्षीसारख्या दुष्काळसदृश अपवादात्मक परिस्थितीत १५ ऑक्टोबरपूर्वीही पाणीवापरावर निर्बंध आणण्याचा निर्णय घेतला जातो. हा निर्णय गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना कळविला जातो. यानंतर कार्यकारी संचालक त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना धरणातील पाणी राखीव ठेवण्याचे निर्देश देतात.

धरण परिसराचा वीजपुरवठा खंडित केला जातोदुष्काळी परिस्थिती उद्भवल्यास अवैध आणि चोरट्या मार्गाने पाणीउपसा करण्याचा प्रकार वाढतो. अशा वेळी अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी जलसंपदा विभागाचे अधिकारी, तहसीलदार आणि महावितरण कंपनीचे अधिकारी संयुक्तपणे कारवाई करून धरणक्षेत्रातील वीजपुरवठा खंडित करतात. बऱ्याचदा पाणी उपसा करणारे मोटारपंप जप्त केले जातात.

चोरट्या मार्गाने कोणी पाणी उपसा करू नयेपाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन प्रशासन उपशावर निर्बंध आणते. हे पाणी केवळ पिण्यासाठीच वापरावे, यास प्राधान्य दिले जाते. अशा वेळी चोरट्या मार्गाने कोणी पाणी उपसा करू नये, यासाठी धरण परिसरातील वीजपुरवठा खंडित केला जातो. बऱ्याचदा विद्युत मोटारपंप जप्त करण्यात येतात.- एस. के. सब्बीनवार, अधीक्षक अभियंता, कडा.

जायकवाडीत ३३ टक्के, तर मध्यम प्रकल्पात १७ टक्के जलसाठाधरणाचे नाव --- पाणीसाठा (टक्क्यांत)जायकवाडी - ३३.१८ टक्केसुखना - ११ टक्केलहुकी - ०० टक्केटेंभापुरी - ३५ टक्केढेकू - १७.९७ टक्केनारंगी - १९ टक्केबोरदहेगाव - ०० टक्केवाकोद - २५ टक्केगिरजा - २७ टक्केअंबाडी - ००टक्के

टॅग्स :DamधरणAurangabadऔरंगाबादRainपाऊसJayakwadi Damजायकवाडी धरण