शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अन्ननलिकेचा कॅन्सर कशामुळे वाढतोय? लक्षणे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 20:12 IST

आजार कोणत्या ‘स्टेज’मध्ये आहे, याचे निदान करण्यासाठी छाती, पोटाचे सिटी स्कॅन, पेट स्कॅन आदी तपासण्या कराव्या लागतात.

छत्रपती संभाजीनगर : अन्ननलिकेच्या कर्करोगाचे प्रमाण वाढल्याचे दिसते. अन्ननलिकेचा कर्करोग हा सर्व कर्करोगांमध्ये आठव्या क्रमांकावर आहे, तर भारतात मृत्यू होणाऱ्या सर्व कॅन्सरमध्ये याचा चौथा क्रमांक लागतो. पुरुषांमध्ये या कर्करोगाचे प्रमाण महिलांपेक्षा काहीसे अधिक आहे. पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमधील रुग्ण या कर्करोगातून बरे होण्याचे प्रमाण खूप आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.

लक्षणे काय?९० टक्के रुग्णांना गिळण्याचा त्रास होतो. सुरुवातीला अन्न गिळण्यास त्रास व्हायला लागतो. नंतर पाणी पिण्यासही अडचण येते. आवाजात बदल होणे, सतत छातीत जळजळ होणे, वजन कमी होणे, भूक कमी होणे, श्वास घ्यायला त्रास होणे, कधी कधी सततचा खोकला लागणे ही काही लक्षणे आहेत. ही लक्षणे असणे म्हणजे अन्ननलिकेचा कर्करोग आहेच असे नाही.

कारणे काय?तंबाखूचे सेवन, मद्याचे सेवन, अति प्रमाणात शिळे अन्न खाणे, जेवणामध्ये व्हिटॅमिन, तंतूमय, प्रथिनयुक्त पदार्थांचे प्रमाण कमी असणे, वर्षानुवर्षे जळजळीचा त्रास असणे, ‘बरेट्स इसोफागस’ किंवा ‘एकाजीआ’ हा आजार असणे, स्थूलपणा आदींमुळे अन्ननलिकेचा कर्करोग होऊ शकतो.

निदान कसे करता येते?निदान करण्यासाठी अन्ननलिका, पोटाची एंडोस्कोपी व बायोप्सी करणे गरजेचे असते. आजार कोणत्या ‘स्टेज’मध्ये आहे, याचे निदान करण्यासाठी छाती, पोटाचे सिटी स्कॅन, पेट स्कॅन आदी तपासण्या कराव्या लागतात.

काळजी काय घ्याल?निर्व्यसनी राहणे, ताजे व्हिटॅमिनयुक्त, तंतूमय, व प्रथिनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. नियमितपणे व्यायाम करणे, वजन नियंत्रणात ठेवणे आदी काळजी घ्यावी. काही लक्षणे असल्यास न घाबरता तज्ज्ञांचा सल्ला घेणे, ते सांगतील त्या तपासण्या करून घेणे महत्त्वाचे ठरते.

वर्षाला २० ते २२ शस्त्रक्रियाअन्ननलिकेच्या कर्करोगाच्या उपचारात बऱ्याच वेळा शस्त्रक्रिया, किरणोपचार व किमो-औषधी या तिन्ही उपचारपद्धती लागतात. साधारणपणे वर्षाला २० ते २२ शस्त्रक्रिया शासकीय कर्करोग रुग्णालयात होतात. या शस्त्रक्रिया आता कमी त्रासाच्या लेप्रोस्कोपी किंवा रोबोटिक पद्धतीनेदेखील होऊ शकतात. तिसऱ्या पायरीतील रुग्णदेखील संपूर्ण उपचार केल्यास बरे होऊ शकतात. कधीही हिम्मत आणि बरे होण्याची आशा सोडू नये.- डाॅ. अजय बोराळकर, शासकीय कर्करोग रुग्णालय

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्यcancerकर्करोग