शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

विद्यार्थिनीने विचारले अभ्यास करण्याची योग्य वेळ कोणती ? मोदी म्हणाले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 17:43 IST

परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात प्रधानमंत्री मोदींचा संवाद  

ठळक मुद्देकन्नड नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनीने विचारला नरेंद्र मोदी यांना प्रश्नपंतप्रधानांनीही दिले दिलखुलास उत्तर 

औरंगाबाद : देशभरातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या परीक्षेतील ताण हलका होण्यासाठी दिल्लीतील तालकटोरा मैदानावर सोमवारी ‘परीक्षा पे चर्चा’ केली. यात कन्नड येथील नवोदय विद्यालयातील १२ वीतील विद्यार्थिनी प्रेरणा मनवर हिने पंतप्रधानांना दिवसभरात अभ्यास करण्याची योग्य वेळ कोणती? असा प्रश्न विचारला. यावर पंतप्रधानांनीही तेवढ्याच दिलखुलासपणे उत्तर देत तिचे समाधान केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मागील तीन वर्षांपासून दहावी, बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. यावर्षीही देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा उपक्रम सोमवारी दिल्लीत आयोजित केला होता. यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ‘माय गव्ह’ या संकेतस्थळावर नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी लघु निबंध स्पर्धा आयोजित केली होती. यात निवडक विद्यार्थ्यांची कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी निवड करण्यात आली होती. यामध्ये कन्नड येथील नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनी प्रेरणा मनवर हिचा समावेश होता. 

याच  विद्यालयातील ११ वीचा विद्यार्थी अर्जुन थोरात याला दिल्लीतील कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. प्रेरणा मनवर हिने पंतप्रधानांना माझे आई-वडील पहाटे लवकर उठून अभ्यास करण्यासाठी सांगतात. मात्र मला सायंकाळी अभ्यास करण्यास आवडतो. त्यामुळे दिवसभरात अभ्यास करण्यासाठी योग्य वेळ कोणती? हे विचारले. यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, आपल्याला अभ्यासाची जबाबदारी स्वत:कडे घेऊन त्यानुसार अभ्यास करण्याच्या सवयींमध्ये बदल घडवावा लागेल. यासाठी परीक्षेचे दडपण येऊ न देता आत्मविश्वासाने सामोरे गेले पाहिजे.  विद्यार्थी बनून सतत नवनवीन गोष्टी शिकणे, हाच जीवन जगण्याचा योग्य मार्ग आहे. आयुष्यात काहीतरी होण्याऐवजी काहीतरी करण्याचे स्वप्न पाहा, असा सल्लाही पंतप्रधानांनी प्रेरणाला दिला. पंतप्रधानांनी दिलेल्या उत्तरामुळे प्रेरणासह तिचे कुटुंबीय आनंदी झाले होते. पंतप्रधान बोलले हा आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असल्याचेही तिने सांगितले.

औरंगाबादेतील पाच विद्यार्थी दिल्लीतपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या उपक्रमात सहभागी होण्यासाठी निबंध स्पर्धा आयोजित केली होती. या निबंध स्पर्धेत औरंगाबाद शहरासह जिल्ह्यातील पाच विद्यार्थी दिल्लीतील तालकटोरा मैदानात आयोजित कार्यक्रमाला उपस्थित होते. यामध्ये कन्नड येथील नवोदय विद्यालयाचा विद्यार्थी अर्जुन थोरात याच्यासह नचिकेत पाटील, जय जगदीश पारीख, श्रेयस मयूर पांडव, जयेश राजेंद्र खोमणे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीNarendra Modiनरेंद्र मोदीEducationशिक्षणAurangabadऔरंगाबादexamपरीक्षा