शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

भीजपावसाने पिकांना जीवदान, मात्र जलसाठे रिकामेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 12:27 IST

Rain Shortage in Aurangabad : मागील ८ दिवसात पडलेल्या भिजपावसाने करमाड पंचक्रोशीतील खरीप पिकांना पुन्हा जीवदान मिळाले आहे.

ठळक मुद्देआगामी दीड महिन्यातही पावसाची स्थिती अशीच राहिली तर गंभीर स्थिती उन्हाळ्यात हे तलाव कोरडेठाक पडून तीव्र पाणीटंचाई निर्माण होऊ शकते

करमाड ( औरंगाबाद ) : पावसाळ्याचा अर्धाअधिक कालावधी होत आला तरी औरंगाबाद तालुक्यातील बहुतांश भागात आजपर्यंत मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. तब्बल महिन्याभराच्या विश्रांतीनंतर जवळपास आठवडाभर झालेल्या भिजपावसानेे खरीप पिकांना जीवदान मिळाले असले तरी तालुक्यातील जलसाठे कोरडे असल्याने तालुक्यातील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. सुखनासह इतर धरणांची जलसाठ्यात अपेक्षित जलसाठा नसल्याने तालुक्यातील फळबागा उत्पादकांसह सर्वच शेतकऱ्यामध्ये चिंतेचे वातावरण आहे. ( Wet rains save crops, but water reservoirs are empty in Aurangabad ) 

मागील वर्षी जिल्ह्यासह​ तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने तालुक्यातील बहुतांश तलावात आजस्थितीत बर्यापैकी पाणी आहे. यावर पुढील काही महिने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवता येऊ शकेल. तथापि, आगामी दीड महिन्यातही पावसाची स्थिती अशीच राहिली तर मात्र ऐन उन्हाळ्यात हे तलाव कोरडेठाक पडून तीव्र पाणीटंचाई निर्माण होऊ शकते, अशी भिती जाणकरांनी व्यक्त केली आहे. यावर्षी पावसाच्या सुरूवाती पासुनच तालुक्यातील कुंभेफळ, लाडगाव, शेंद्रा बन, शेंद्रा कमंगर, वडखा, वरझडी, नाथनगर आदी भागात जेमतेम पाऊस पडला. येथील शेतकर्यांनी यावरच पेरण्या आटोपल्या. याच जेमतेम पावसावर पिकेही जोमदार आली. दरम्यान, मागील एक महिन्याच्या पावसाच्या दडीमुळे आता पिकांवर नांगर फिरवायची वेळ येऊन ठेपली होती. यातच जवळपास आठ दिवस या भागात ठिबक प्रमाणे अधुन-मधुन पाऊस होत असल्याने सध्यातरी या पिकांना जीवदान मिळाल्याचे म्हणता येईल.

याच्या उलट, तालुक्याचा केंद्रबिंदु म्हणून ओळखल्या जाणार्या करमाडसह त्याच्या उत्तरेकडील भांबर्डा, बनगाव, जयपूर, कुबेर गेवराई, दुधड, पिंपळखुंटा, लाडसावंगी व या गाव परिसरात पावसाळ्याच्या सुरूवातीला व अधुन-मधुन समाधानकारक पाऊस पडला आहे. यातच दुधड, भांबर्डा व परिसरात तर एक अतिवृष्टीचा पाऊसही होऊन गेला. पण येथेही मागील महिन्याभरांपासुन पावसाची विश्रांती होती. परंतु आजही येथील पिके जोमदार, सुस्थितीत व पाहिजे त्या अवस्थेत असल्याचे चित्र आहे. सोबतच अतिवृष्टीनेे येथील नदी-नाल्यांना गेलेल्या पुरासह छोट-छोटया पाझर तलावातही पाणीसाठा शिल्लक आहे. या शिवाय तालुक्यातील मंगरूळ, जडगाव, पिंप्रीराजा, टाकळीमाळी, सांजखेडा, पांढरी पिंपळगाव, कचनेर, कोरघळ, दरकवाडी, आडगाव ठोंबरे, गोलटगाव, कौडगाव, शेकटा, वाहेगाव, देमणी, चित्तेपिंपळगाव, निपाणी, गारखेडा, लायगाव, खोडेगाव आदी गावातही पावसाचा विश्रांतीचा काळ सोडल्यास समाधानकारक नसला तरी बर्यापैकी पाऊस पडलेला आहे. तथापि, आता जोरदार पावसाची अत्यंत आवश्यकता असुन तो न पडल्यास पिकांच्या उत्पादनात कमालीची घट नोंदविली जाऊ शकते सोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता जाणकार व्यक्त करीत आहेत.

तालुक्यातील धरणे व एकूण जलसाठा औरंगाबाद तालुक्यात बनगाव येथे लहुकी, लाडसावंगी येथील बाबूवाडी, दौलताबाद येथील मोमबत्ता तलाव व गारखेडा येथील सुखना या धरणांचा समावेश आहे. यात सुखना धरण सर्वात मोठे आहे. मागील वर्षी सगळीकडेच चांगले पर्जन्यमान राहिल्याने कोरड्याठाक पडलेल्या सर्वच धरणात अवघ्या दोनच महिन्यात 100% पाणीसाठा झाला होता. यातील सुखना धरण तर तब्बल 14 वर्षांनंतर भरले होते. आजही या धरणांसह इतर धरणांत व पाझर तलावांत पन्नास टक्क्यांच्यावर पाणीसाठा शिल्लक आहे. परतीच्या पावसाच्या काळात जर मोठे पाऊस झाले नाही तर उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो हे निश्चित.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊसFarmerशेतकरीagricultureशेती