शहरं
Join us  
Trending Stories
1
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
2
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
3
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
4
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
5
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
6
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
7
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
8
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
9
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
10
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
11
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
12
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
14
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
15
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
16
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
17
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
18
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
19
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
20
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले

भीजपावसाने पिकांना जीवदान, मात्र जलसाठे रिकामेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 12:27 IST

Rain Shortage in Aurangabad : मागील ८ दिवसात पडलेल्या भिजपावसाने करमाड पंचक्रोशीतील खरीप पिकांना पुन्हा जीवदान मिळाले आहे.

ठळक मुद्देआगामी दीड महिन्यातही पावसाची स्थिती अशीच राहिली तर गंभीर स्थिती उन्हाळ्यात हे तलाव कोरडेठाक पडून तीव्र पाणीटंचाई निर्माण होऊ शकते

करमाड ( औरंगाबाद ) : पावसाळ्याचा अर्धाअधिक कालावधी होत आला तरी औरंगाबाद तालुक्यातील बहुतांश भागात आजपर्यंत मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. तब्बल महिन्याभराच्या विश्रांतीनंतर जवळपास आठवडाभर झालेल्या भिजपावसानेे खरीप पिकांना जीवदान मिळाले असले तरी तालुक्यातील जलसाठे कोरडे असल्याने तालुक्यातील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. सुखनासह इतर धरणांची जलसाठ्यात अपेक्षित जलसाठा नसल्याने तालुक्यातील फळबागा उत्पादकांसह सर्वच शेतकऱ्यामध्ये चिंतेचे वातावरण आहे. ( Wet rains save crops, but water reservoirs are empty in Aurangabad ) 

मागील वर्षी जिल्ह्यासह​ तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने तालुक्यातील बहुतांश तलावात आजस्थितीत बर्यापैकी पाणी आहे. यावर पुढील काही महिने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवता येऊ शकेल. तथापि, आगामी दीड महिन्यातही पावसाची स्थिती अशीच राहिली तर मात्र ऐन उन्हाळ्यात हे तलाव कोरडेठाक पडून तीव्र पाणीटंचाई निर्माण होऊ शकते, अशी भिती जाणकरांनी व्यक्त केली आहे. यावर्षी पावसाच्या सुरूवाती पासुनच तालुक्यातील कुंभेफळ, लाडगाव, शेंद्रा बन, शेंद्रा कमंगर, वडखा, वरझडी, नाथनगर आदी भागात जेमतेम पाऊस पडला. येथील शेतकर्यांनी यावरच पेरण्या आटोपल्या. याच जेमतेम पावसावर पिकेही जोमदार आली. दरम्यान, मागील एक महिन्याच्या पावसाच्या दडीमुळे आता पिकांवर नांगर फिरवायची वेळ येऊन ठेपली होती. यातच जवळपास आठ दिवस या भागात ठिबक प्रमाणे अधुन-मधुन पाऊस होत असल्याने सध्यातरी या पिकांना जीवदान मिळाल्याचे म्हणता येईल.

याच्या उलट, तालुक्याचा केंद्रबिंदु म्हणून ओळखल्या जाणार्या करमाडसह त्याच्या उत्तरेकडील भांबर्डा, बनगाव, जयपूर, कुबेर गेवराई, दुधड, पिंपळखुंटा, लाडसावंगी व या गाव परिसरात पावसाळ्याच्या सुरूवातीला व अधुन-मधुन समाधानकारक पाऊस पडला आहे. यातच दुधड, भांबर्डा व परिसरात तर एक अतिवृष्टीचा पाऊसही होऊन गेला. पण येथेही मागील महिन्याभरांपासुन पावसाची विश्रांती होती. परंतु आजही येथील पिके जोमदार, सुस्थितीत व पाहिजे त्या अवस्थेत असल्याचे चित्र आहे. सोबतच अतिवृष्टीनेे येथील नदी-नाल्यांना गेलेल्या पुरासह छोट-छोटया पाझर तलावातही पाणीसाठा शिल्लक आहे. या शिवाय तालुक्यातील मंगरूळ, जडगाव, पिंप्रीराजा, टाकळीमाळी, सांजखेडा, पांढरी पिंपळगाव, कचनेर, कोरघळ, दरकवाडी, आडगाव ठोंबरे, गोलटगाव, कौडगाव, शेकटा, वाहेगाव, देमणी, चित्तेपिंपळगाव, निपाणी, गारखेडा, लायगाव, खोडेगाव आदी गावातही पावसाचा विश्रांतीचा काळ सोडल्यास समाधानकारक नसला तरी बर्यापैकी पाऊस पडलेला आहे. तथापि, आता जोरदार पावसाची अत्यंत आवश्यकता असुन तो न पडल्यास पिकांच्या उत्पादनात कमालीची घट नोंदविली जाऊ शकते सोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता जाणकार व्यक्त करीत आहेत.

तालुक्यातील धरणे व एकूण जलसाठा औरंगाबाद तालुक्यात बनगाव येथे लहुकी, लाडसावंगी येथील बाबूवाडी, दौलताबाद येथील मोमबत्ता तलाव व गारखेडा येथील सुखना या धरणांचा समावेश आहे. यात सुखना धरण सर्वात मोठे आहे. मागील वर्षी सगळीकडेच चांगले पर्जन्यमान राहिल्याने कोरड्याठाक पडलेल्या सर्वच धरणात अवघ्या दोनच महिन्यात 100% पाणीसाठा झाला होता. यातील सुखना धरण तर तब्बल 14 वर्षांनंतर भरले होते. आजही या धरणांसह इतर धरणांत व पाझर तलावांत पन्नास टक्क्यांच्यावर पाणीसाठा शिल्लक आहे. परतीच्या पावसाच्या काळात जर मोठे पाऊस झाले नाही तर उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो हे निश्चित.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊसFarmerशेतकरीagricultureशेती