बीडमध्ये गजानन महाराजांच्या पालखीचे उत्साहात स्वागत

By Admin | Updated: July 20, 2014 00:03 IST2014-07-20T00:03:46+5:302014-07-20T00:03:46+5:30

बीड: पंढरपूरहून शेगावकडे परतणाऱ्या गजानन महाराजांच्या पालखीचे शनिवारी सकाळी बीडमध्ये आगमन झाले.

Welcome to the bead of Gajanan Maharaj Palkhi | बीडमध्ये गजानन महाराजांच्या पालखीचे उत्साहात स्वागत

बीडमध्ये गजानन महाराजांच्या पालखीचे उत्साहात स्वागत

कोल्हापूर : गांधीनगर येथील रि.स.नंबर २६३६ या सरकारी जागेबाबत कोल्हापूरच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयाला पुणे विभागीय अप्पर आयुक्तशाम देशपांडे यांनी यापूर्वी दिलेली स्थगिती आज, शनिवारी कायम केली. आज सकाळी कोल्हापुरात ही सुनावणी झाली. याप्रकरणी आता ६ सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.
शहरालगत असलेल्या गांधीनगर येथील रि.स. नंबर २६३६ या ५७.१६ आर., पैकी सरकारी जमिनीवर ५१ व्यापारी व दुकानदार असलेल्या मिळकत धारकांनी अतिक्रमण केले होते. त्याबाबत काहीजणांनी तक्रारी केल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी सरकारी जमिनीवरील अतिक्रमण काढून ती सरकारी हक्कात घ्यावी, असे आदेश दिले होते. त्यानंतर २४ आॅगस्ट २०१२ रोजी या जमिनीवर उभारलेली ३६ दुकाने सील केली होती. या कारवाईच्या विरोधात तत्कालीन विभागीय आयुक्त दिलीप बंड यांच्याकडे अपील करण्यात आले होते. तेथे त्यांनीही जमीन सरकारी हक्कात घेण्याचा आदेश कायम केला होता.
विभागीय आयुक्तांच्या विरोधात महसूलमंत्री थोरात यांच्याकडे अपील केले गेले. त्यामुळे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्याकडे हे प्रकरण पुनर्विचारार्थ पाठविण्यात आले. तेव्हा अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार यांनी आपल्या अधिकारात गांधीनगर येथील या जमिनीवरील बांधकाम ठरावीक रक्कम भरून घेऊन नियमित करून देण्यात यावीत, असा आदेश दिला होता.
सुमारे एक एकर ३३ गुंठे ही जमीन केवळ ७५ हजार रुपये भरून घेण्याचे आदेश पवार यांनी दिले होते. त्याच्या विरोधात ४ जुलैला हिरालाल केशव गळीयल (रा. गांधीनगर) व कोल्हापुरातील प्रजासत्ताक संघटनेने विभागीय अप्पर आयुक्तांकडे अपील केले होते. यानुसार ७ जुलैला तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. ती आजच्या सुनावणीवेळी कायम करण्यात आली.
साथीच्या आजार रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज
सीपीआर ,महापालिका,जिल्हा परिषद प्रशासनावर जबाबदारी
कोल्हापूर : डेंग्यू , काविळ, मलेरिया या साथीच्या आजाराचे रुग्ण दगावल्यानंतरच जिल्हा प्रशासन जागे होते, हे आजपर्यंतचे चित्र आहे. काल (शुक्रवारी) हेर्ले (ता.हातकणंगले) येथील बालिकेचा डेंग्युसदृश्य आजाराने मृत्यु झाला. विशेषत : पावसाळ्यात या साथीचे आजार डोके वर काढतात. या आजारांना पायबंद घालण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आहे. त्यासाठी कोल्हापूर महापालिका, जिल्हा परिषद व छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) प्रशासनाने महत्वाची जबाबदारी उचलावी.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण रुग्णालयात अशा आजारांचा रुग्ण आला तर त्यावर तत्काळ उपचार करावे अशा सक्त सुचना वैद्यकिय अधिकाऱ्यांना दिला असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
प्राथमिक आरोग्य केंद्रांना सूचना
सीपीआर प्रशासनाच्या अखत्यारित चार कोडोली, गडहिंग्लज, सेवा रुग्णालय (लाईन बाजार) व जयसिंगपूर ही उपजिल्हा रुग्णालये तर १६ प्राथमिक आरोग्य केंद्रे असे एकूण २० रुग्णालये येतात. प्राथमिक आरोग्य केंद्रातील मुख्य वैद्यकिय अधिकाऱ्यांना साथीच्या आजाराचे रोज किती रुग्ण दाखल झाले, याची माहिती द्यावी, अशा सक्त सुचना जिल्हाशल्यचिकित्सकांनी यांनी दिल्या आहेत.
साथीच्या आजाराने डोकेवर काढल्याने महापालिका प्रशासन सतर्क राहिले आहे.शहरातील कोणत्याही खासगी रुग्णालयात डेंग्यु,मलेरिया व काविळ या आजाराची लागण झाल्यास तत्काळ कळवावे.नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी औषध फवारणी,गटारी स्वच्छ करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

Web Title: Welcome to the bead of Gajanan Maharaj Palkhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.