शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

औरंगाबाद जिल्ह्यातील ३ लाख ४४ हजार विद्यार्थ्यांचे वजन कमी; शाळांमध्ये होणार ‘खिचडी’ची परीक्षा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 16:57 IST

शाळांमध्ये रोज पोषण आहार दिला जातो, तर मग ३ लाख ४४ हजार २३५ विद्यार्थ्यांचे वजन सामान्य विद्यार्थ्यांपेक्षा कमी कसे

ठळक मुद्देजिल्ह्यात ४ लाख ८० हजार ५८३  विद्यार्थी   केंद्र सरकारचे अधिकारी घेणार शालेय पोषण आहाराचा आढावा

- विजय सरवदे 

औरंगाबाद : शाळांमध्ये रोज पोषण आहार दिला जातो, तर मग जिल्ह्यातील ४ लाख ८० हजार ५८३ विद्यार्थ्यांपैकी तब्बल ३ लाख ४४ हजार २३५ विद्यार्थ्यांचे वजन सामान्य विद्यार्थ्यांपेक्षा कमी कसे, हा प्रश्न या योजनेच्या अंमलबजावणीवरच उपस्थित करणारा आहे.

शालेय पोषण आहार योजनेचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांचे पथक ३ ते १० डिसेंबरदरम्यान राज्यातील शाळांना अचानक भेटी देणार आहे. या पथकात डॉ. उमा अय्यर, जी. विजया भास्कर, डॉ. स्वाती धु्रुव, सुनील चौहान, डॉ. यास्मीन अली हक, भूपेंद्र कुमार, दिनेश प्रधान, डॉ. श्रुती कंटावाला, श्वेता पटेल, दिव्या पटेल आणि मयुरी राणे आदी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या पथकातील काही अधिकारी ५, ६ डिसेंबर यापैकी कोणत्याही दिवशी औरंगाबाद जिल्ह्यातील मध्यान्ह भोजन योजना राबविणाऱ्या कोणत्याही शाळांना अचानक भेटी देऊन तपासणी केली जाणार आहे. त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे अधिकारीही असतील; पण त्यांच्यापासूनही शाळा भेटीच्या कार्यक्रमाची संपूर्ण गुप्तता पाळली जाणार आहे.

हे पथक शाळांमध्ये शालेय पोषण योजना लाभदायी आहे का, शाळांमध्ये सकस, सात्त्विक, पौष्टिक व पुरेसे मध्यान्ह भोजन दिले जाते का, मध्यान्ह भोजनामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारले आहे का, पुरवठादारांकडून तांदळाचा योग्य पुरवठा होतो का, या व इतर बाबींच्या उत्तरांसाठी आता गुरुजींना तयार राहावे लागणार आहे. केंद्र सरकारी अधिकाऱ्यांच्या पथकांमार्फत शालेय पोषण आहार योजनेचे रेकॉर्ड, शिजविण्याचे ठिकाण, भांडी, स्वच्छता, मध्यान्ह भोजन निकषानुसार शिजविले जाते का, त्यामध्ये ठरवून दिलेल्या अन्न घटकांचा समावेश केला जातो का, पुरवठादारांमार्फत शाळांपर्यंत तांदूळ व धान्यादी मालाचा पुरवठा होतो का, शाळांमध्ये तांदूळ व धान्यादी मालाची निगा राखली जाते का, किती मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली, किती मुलांची प्रकृती खराब आहे, किती मुले गंभीर आजारी आहेत, यासह अनेक बाबींचा आढावा घेतला जाणार आहे.

जिल्ह्यातील ६ हजार ६४ शाळांपैकी ३ हजार २७ शाळांमध्ये खिचडीजिल्ह्यातील एकूण ६ हजार ६४ शाळांपैकी ३ हजार २७ शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाते. या शाळांतील इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत २ लाख ९५ हजार १८६ विद्यार्थी, तर इयत्ता सहावी ते आठवीपर्यंत १ लाख ८५ हजार ३४७ विद्यार्थी, असे एकूण ४ लाख ८० हजार ५८३ विद्यार्थ्यांना रोज पोषण आहार (खिचडी) दिला जातो. पोषण आहार घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली तेव्हा तब्बल ३ लाख ४४ हजार २३५ विद्यार्थ्यांचे वजन जागतिक आरोग्य संघटनेने ठरवून दिलेल्या शरीर वस्तुमान निर्देशांकापेक्षा (बीएमआय) कमी अर्थात एवढी मुले कमी वजनाची आढळून आली आहेत. १ लाख ३४ हजार ५३६ विद्यार्थ्यांचे सामान्य व १ हजार ८१२ विद्यार्थ्यांचे सामान्य वजनापेक्षा अधिक वजनाची आढळून आली आहेत. ७३ विद्यार्थी गंभीर आजारी, तर ४४० विद्यार्थ्यांमध्ये दृष्टिदोष असल्याचे निष्पन्न झाले असल्याचे शालेय पोषण आहार योजनेचे वरिष्ठ लेखाधिकारी राजेंद्र खाजेकर यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSchoolशाळाStudentविद्यार्थीCentral Governmentकेंद्र सरकारTeacherशिक्षक