शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
4
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
5
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
6
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
7
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
8
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
9
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
10
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
11
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
12
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
13
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
14
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
15
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
16
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
17
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
18
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
19
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
20
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

एक विवाह ऐसा भी !; वऱ्हाडाने आणले जेवणाचे डबे अन् १७ मिनिटांत पार पडला सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 18:40 IST

अनावश्यक खर्च व अनिष्ट चालीरीतींना फाटा देत लग्न लावण्यात यावे ही वधू-वरांचीच नव्हे, तर संपूर्ण वऱ्हाडींची इच्छा होती. 

ठळक मुद्देसर्व खर्चास फाटा दिला छावणीत पार पडला लग्नसोहळा 

औरंगाबाद : शहरात सध्या लग्नसराईची धुमधाम सुरू असून, प्रत्येक लग्नसोहळ्यात वऱ्हाडींना पंचपक्वान्नांचे शाही भोजन दिले जात आहे. मात्र, छावणीत रविवारी एका लग्नात चक्क वऱ्हाडींनी घरूनच जेवणाचे डबे आणून तेथे जेवण केले. कारण, वधू-वर पित्यांवर लग्नाचा कोणताही भार पडू नये. अनावश्यक खर्च व अनिष्ट चालीरीतींना फाटा देत लग्न लावण्यात यावे ही वधू-वरांचीच नव्हे, तर संपूर्ण वऱ्हाडींची इच्छा होती. 

छावणीतील जैस्वाल मंगल कार्यालयात दुपारी १.३० वाजता लग्नाचे आयोजन करण्यात आले होते. पैठण तालुक्यातील जांभळी येथील वनिता चव्हाण व वाशिम येथील शेगी गावातील सुनील राठोड यांच्या विवाहासाठी शेकडो वऱ्हाडी जमले होते. मात्र, कोणत्याही प्रकारचे बॅण्डपथक, डीजेचा दणदणाट नाही. वरात नाही, मंगलाष्टक म्हणण्यात आले नाहीत. लग्नासाठी येणारा प्रत्येक जण संत रामपालजी महाराजांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन खाली सतरंजीवर बसत होता. 

केवळ धागा बांधून विवाह ठरलेल्या वेळी वधू-वर आले. त्यांनी एकमेकांना हार न घालता केवळ धागा बांधला आणि रमैनी (दुपारची आरती) सुरू झाली. अवघ्या १७ मिनिटांत विवाह सोहळा पार पडला. यानंतर वधू-वराला उपस्थित वऱ्हाडींनी भावी आयुष्याबदल शुभेच्छा दिल्या. लग्नात कोणताही खर्च न करण्याचा ठरविल्याने जेवणावळीची व्यवस्था करण्यात आली नव्हती. वऱ्हाडींनी घरूनच अन्नपाणी आणले होते. अनेक जण वधू-वराला आशीर्वाद देऊन निघून गेले. कोणत्याही प्रकारचा भेटवस्तू, हारतुऱ्यांचा वापर येथे करण्यात आला नाही. 

असे विवाह अधिक व्हावेत नवरदेवाचे वडील रामजीदास चव्हाण म्हणाले की, आमच्या गुरूच्या शिकवणीनुसार आम्ही हुंडा न घेता, संसारोपयोगी वस्तू न घेता-देता,अहेर, प्रतिअहेर, असे काहीही न घेता, तसेच कोणताही अतिरिक्त खर्च न करता विवाह पार पाडला आहे. मुलीच्या लग्नासाठी पैसे नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. तो प्रकार रोखण्यासाठी अशा पद्धतीचे विवाह काळाची गरज असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. 

अनिष्ट चालीरीतींना फाटा देण्यासाठी रमैनी विवाह रमैनी विवाहात वधू-वर पित्याला कुठलेही कार्यालय भाडे, वीज बिल, सफाई खर्च आदी द्यावे लागत नाही. विवाहाची कायदेशीर नोंदणी करण्यात येते. विवाह सोहळा सत्संगामधील एका १७ मिनिटांच्या आरतीने पार पडतो.  रमैनी विवाहामुळे समाजाचा कर्जबाजारीपणा, आत्महत्या, स्त्रीभ्रूणहत्या कमी होतील, समाजप्रबोधनासाठी असे विवाह होणे अपेक्षित असून, आज काही जणांनी त्यांच्या मुला-मुलींचे विवाह असेच करण्याचा निर्णय जाहीर केला असल्याची माहिती अशोकदास आव्हाड यांनी दिली. 

टॅग्स :marriageलग्नAurangabadऔरंगाबादSocialसामाजिक