शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

एक विवाह ऐसा भी !; वऱ्हाडाने आणले जेवणाचे डबे अन् १७ मिनिटांत पार पडला सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 18:40 IST

अनावश्यक खर्च व अनिष्ट चालीरीतींना फाटा देत लग्न लावण्यात यावे ही वधू-वरांचीच नव्हे, तर संपूर्ण वऱ्हाडींची इच्छा होती. 

ठळक मुद्देसर्व खर्चास फाटा दिला छावणीत पार पडला लग्नसोहळा 

औरंगाबाद : शहरात सध्या लग्नसराईची धुमधाम सुरू असून, प्रत्येक लग्नसोहळ्यात वऱ्हाडींना पंचपक्वान्नांचे शाही भोजन दिले जात आहे. मात्र, छावणीत रविवारी एका लग्नात चक्क वऱ्हाडींनी घरूनच जेवणाचे डबे आणून तेथे जेवण केले. कारण, वधू-वर पित्यांवर लग्नाचा कोणताही भार पडू नये. अनावश्यक खर्च व अनिष्ट चालीरीतींना फाटा देत लग्न लावण्यात यावे ही वधू-वरांचीच नव्हे, तर संपूर्ण वऱ्हाडींची इच्छा होती. 

छावणीतील जैस्वाल मंगल कार्यालयात दुपारी १.३० वाजता लग्नाचे आयोजन करण्यात आले होते. पैठण तालुक्यातील जांभळी येथील वनिता चव्हाण व वाशिम येथील शेगी गावातील सुनील राठोड यांच्या विवाहासाठी शेकडो वऱ्हाडी जमले होते. मात्र, कोणत्याही प्रकारचे बॅण्डपथक, डीजेचा दणदणाट नाही. वरात नाही, मंगलाष्टक म्हणण्यात आले नाहीत. लग्नासाठी येणारा प्रत्येक जण संत रामपालजी महाराजांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन खाली सतरंजीवर बसत होता. 

केवळ धागा बांधून विवाह ठरलेल्या वेळी वधू-वर आले. त्यांनी एकमेकांना हार न घालता केवळ धागा बांधला आणि रमैनी (दुपारची आरती) सुरू झाली. अवघ्या १७ मिनिटांत विवाह सोहळा पार पडला. यानंतर वधू-वराला उपस्थित वऱ्हाडींनी भावी आयुष्याबदल शुभेच्छा दिल्या. लग्नात कोणताही खर्च न करण्याचा ठरविल्याने जेवणावळीची व्यवस्था करण्यात आली नव्हती. वऱ्हाडींनी घरूनच अन्नपाणी आणले होते. अनेक जण वधू-वराला आशीर्वाद देऊन निघून गेले. कोणत्याही प्रकारचा भेटवस्तू, हारतुऱ्यांचा वापर येथे करण्यात आला नाही. 

असे विवाह अधिक व्हावेत नवरदेवाचे वडील रामजीदास चव्हाण म्हणाले की, आमच्या गुरूच्या शिकवणीनुसार आम्ही हुंडा न घेता, संसारोपयोगी वस्तू न घेता-देता,अहेर, प्रतिअहेर, असे काहीही न घेता, तसेच कोणताही अतिरिक्त खर्च न करता विवाह पार पाडला आहे. मुलीच्या लग्नासाठी पैसे नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. तो प्रकार रोखण्यासाठी अशा पद्धतीचे विवाह काळाची गरज असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. 

अनिष्ट चालीरीतींना फाटा देण्यासाठी रमैनी विवाह रमैनी विवाहात वधू-वर पित्याला कुठलेही कार्यालय भाडे, वीज बिल, सफाई खर्च आदी द्यावे लागत नाही. विवाहाची कायदेशीर नोंदणी करण्यात येते. विवाह सोहळा सत्संगामधील एका १७ मिनिटांच्या आरतीने पार पडतो.  रमैनी विवाहामुळे समाजाचा कर्जबाजारीपणा, आत्महत्या, स्त्रीभ्रूणहत्या कमी होतील, समाजप्रबोधनासाठी असे विवाह होणे अपेक्षित असून, आज काही जणांनी त्यांच्या मुला-मुलींचे विवाह असेच करण्याचा निर्णय जाहीर केला असल्याची माहिती अशोकदास आव्हाड यांनी दिली. 

टॅग्स :marriageलग्नAurangabadऔरंगाबादSocialसामाजिक