शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

गावागावात कळणार हवामानाचा अंदाज, काय आहे स्कायमेटचा महावेध प्रकल्प?

By विजय सरवदे | Updated: August 31, 2023 19:35 IST

यापुढे शेतकऱ्यांना स्वयंचलित हवामान केंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गावातच हवामानाचा अचूक अंदाज कळणार आहे.

छत्रपती संभाजीनगर : निसर्गाच्या बदलत्या परिस्थितीमुळे सध्या अस्तित्वात असलेली मंडळनिहाय पाऊस मोजण्याची यंत्रणा कुचकामी ठरत असल्यामुळे आता गावपातळीवरच हवामानाचे अचूक मोजमाप करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार स्कायमेटच्या महावेध प्रकल्पाअंतर्गत जिल्ह्यातील ३११ ग्रामपंचायतींच्या हद्दीत स्वयंचलित हवामान केंद्रे उभारली जाणार आहेत.

सध्या जिल्ह्यातील ६५ मंडळांमध्ये पाऊस मोजण्याची यंत्रणा कार्यान्वित आहे. याद्वारे त्या भागातील पर्जन्यमान, तापमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याची दिशा, वाऱ्याचा वेग आदी माहिती प्राप्त होते. या माहितीच्या आधारे पीकविमा योजना, हवामान आधारित फळपीक विमा योजनेचा लाभ दिला जातो. तसेच कृषी हवामान सल्ला व मार्गदर्शन केले जाते. पण, हवामान केंद्राची संख्या कमी असून हवामानाचा अचूक अंदाज यावा, यासाठी स्वयंचलित हवामान केंद्रांची संख्या वाढवणे आवश्यक होते. त्यामुळे शासनाने राज्यात १० हजार स्वयंचलित हवामान केंद्र उभारणीला मंजुरी दिली आहे. या केंद्रांसाठी ग्रामपंचायतींनी जागा द्यायची आहे, असे पत्र कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवले आहे. जागा उपलब्ध करून देणाऱ्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत अशी केंद्रे सुरू केली जाणार आहेत.

काय आहे महावेध प्रकल्प?शेतकऱ्यांना हवामानाबाबत आश्वस्त करणारा प्रकल्प म्हणून ‘महावेध’ हा प्रकल्प २०१७ साली अस्तित्वात आला. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रा.लि.ची नियुक्ती करण्यात आली. महावेधच्या स्वयंचलित हवामान केंद्रांद्वारे पर्जन्यमान, तापमान, हवेतील सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि वाऱ्याच्या दिशा या वातावरणातील घटकांचे मोजमाप केले जाते. जमा झालेली हवामानविषयक माहिती ही हवामान आधारित पीकविमा योजना, हवामान अंदाज, पीकविषयक सल्ला, हवामानविषयक संशोधन आणि इतर कल्याणकारी योजना राबविण्यासाठी साहाय्यभूत ठरत आहे. ३११ गावांत होणार हवामान केंद्र महावेध प्रकल्पाअंतर्गत जिल्ह्यातील ३११ ग्रामपंचायतींच्या हद्दीत स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यात येणार आहेत.

गावातच कळणार हवामानाचा अंदाजयापुढे शेतकऱ्यांना स्वयंचलित हवामान केंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गावातच हवामानाचा अचूक अंदाज कळणार आहे.

स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्याचा निर्णयग्रामपंचायतींकडून जागेची चाचपणी स्कायमेटच्या महावेध प्रकल्पाअंतर्गत जिल्ह्यातील ३११ ग्रामपंचायतींच्या हद्दीत स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्याचा निर्णय प्रस्तावित आहे. या केंद्रांच्या उभारणीसाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या ग्रामपंचायतीची निवड करण्यात येणार आहे.- प्रकाश देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीRainपाऊस