शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
3
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
4
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
5
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
6
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
7
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
8
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
9
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
10
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
11
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
12
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
13
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
14
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
15
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
16
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
17
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
18
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
19
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
20
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
Daily Top 2Weekly Top 5

चार महिने पुरेल एवढ्या पाण्याची झाली वाफ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 23:56 IST

तीव्र उन्हामुळे जायकवाडी धरणातून गेल्या तीन महिन्यांत बाष्पीभवनाने तब्बल १४०.२८८ दशलक्ष घनमीटर पाण्याची वाफ झाली. वाफ झालेल्या या पाण्यातून औरंगाबाद, जालना येथील पाणीपुरवठा योजनांना चार महिने पाणी पुरले असते.

ठळक मुद्देजायकवाडी : उन्हाळ्यातील तीन महिन्यांत १४०.२८८ दशलक्ष घनमीटर पाण्याची वाफ

संतोष हिरेमठ ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : तीव्र उन्हामुळे जायकवाडी धरणातून गेल्या तीन महिन्यांत बाष्पीभवनाने तब्बल १४०.२८८ दशलक्ष घनमीटर पाण्याची वाफ झाली. वाफ झालेल्या या पाण्यातून औरंगाबाद, जालना येथील पाणीपुरवठा योजनांना चार महिने पाणी पुरले असते.मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना यासह विविध प्रादेशिक पाणी योजनांसाठी जायकवाडीतून पाणी देण्यात येते. याच पाण्यातून नगर, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड या भागांतील शेती सिंचनाखाली येते. उन्हाळा सोडला, तर इतर कालावधीत दररोज ०.४०० ते ०.६०० दशलक्ष घनमीटर एवढे पाणी बाष्पीभवन होऊन उडून जाते; परंतु उन्हाळ्याला सुरुवात होताच यामध्ये दुपटीने वाढ होते. यंदा मार्चमध्ये तापमानाचा पारा ३८.३ अंशांवर पोहोचला. त्यानंतर एप्रिलमध्ये ४१ आणि मे महिन्यात ४२ अंश सेल्सिअसपर्यंत ताममान गेले. तापमान जसजसे वाढत गेले तसे जायकवाडीतील बाष्पीभवनही वाढत गेले. मार्च महिन्यात ४०.३७८, तर एप्रिलमध्ये ५०.००७ दशलक्ष घनमीटर पाण्याची वाफ झाली. मे महिन्यात ४९.९०३ दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन झाल्याची नोंद करण्यात आली आहे. जायकवाडी येथे बाष्पीभवन मापक यंत्र बसविण्यात आलेले आहे. यातून जलाशयात होणाऱ्या बाष्पीभवनाची नोंद होते.औरंगाबादला महिन्याकाठी जवळपास ९ दशलक्ष घनमीटर याप्रमाणे तीन महिन्यांसाठी सुमारे २७ दशलक्ष घनमीटर पाणी लागते. तीन महिन्यांत बाष्पीभवन झालेल्या पाण्यातून किमान चार महिने जायकवाडीतून पाणीपुरवठा योजनांसाठी पाणी देता आले असते. पाण्याचे बाप्षीभवन थांबविण्यासाठी थर्माकोल, सोलार पॅनल इतर पर्यायांचा वापर केला जातो; परंतु जायकवाडीच्या पाण्याचे क्षेत्र पाहता हे अशक्य आहे. शिवाय ते आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. बाष्पीभवन हे नैसर्गिक चक्र असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांचे म्हणणे आहे. उन्हाळ्यात बाष्पीभवनातून पाणी आटण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी अन्य पर्यायांचा विचार करण्याची गरज आहे.काही प्रमाणात का होईना उन्हाळ्यात जायकवाडीतील पाणी छोट्या प्रकल्पात साठविण्याचा उपाय महत्त्वपूर्ण ठरू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्या जायकवाडीमध्ये १२६६.१०२ दशलक्ष घनमीटर म्हणजे २४.३२ टक्के पाणीसाठा असल्यामुळे पाण्याची फार अडचण नाही. पाणीवापराच्या नियोजनानुसार पाणीसाठा योग्य पद्धतीने पुरवला जात असल्याचे अधिकारी सांगतात.सेकंडरी स्टोअरची कल्पना४पाणी वाचविण्यासाठी उन्हाळ्यात सेकंडरी स्टोअर कल्पना महत्त्वपूर्ण ठरू शकते. औरंगाबाद शहर परिसराला लागणारे पाणी १ मार्चनंतर जलवाहिनीद्वारे शहराजवळ छोट्या प्रकल्पात साठवायचे. प्रकल्प लहान असल्याने त्यातून कमी प्रमाणात बाष्पीभवन होऊन पाणी वाचविणे शक्य आहे. अनेक देशांत ही कल्पना प्रत्यक्षात राबविली गेली आहे.-प्रदीप पुरंदरे, जलतज्ज्ञ

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादwater shortageपाणीकपात