शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबाच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
3
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
4
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
5
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
6
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
7
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
8
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
9
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
10
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
11
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
12
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
13
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
14
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
15
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
16
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
17
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
18
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
19
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
20
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US

चार महिने पुरेल एवढ्या पाण्याची झाली वाफ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 23:56 IST

तीव्र उन्हामुळे जायकवाडी धरणातून गेल्या तीन महिन्यांत बाष्पीभवनाने तब्बल १४०.२८८ दशलक्ष घनमीटर पाण्याची वाफ झाली. वाफ झालेल्या या पाण्यातून औरंगाबाद, जालना येथील पाणीपुरवठा योजनांना चार महिने पाणी पुरले असते.

ठळक मुद्देजायकवाडी : उन्हाळ्यातील तीन महिन्यांत १४०.२८८ दशलक्ष घनमीटर पाण्याची वाफ

संतोष हिरेमठ ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : तीव्र उन्हामुळे जायकवाडी धरणातून गेल्या तीन महिन्यांत बाष्पीभवनाने तब्बल १४०.२८८ दशलक्ष घनमीटर पाण्याची वाफ झाली. वाफ झालेल्या या पाण्यातून औरंगाबाद, जालना येथील पाणीपुरवठा योजनांना चार महिने पाणी पुरले असते.मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना यासह विविध प्रादेशिक पाणी योजनांसाठी जायकवाडीतून पाणी देण्यात येते. याच पाण्यातून नगर, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड या भागांतील शेती सिंचनाखाली येते. उन्हाळा सोडला, तर इतर कालावधीत दररोज ०.४०० ते ०.६०० दशलक्ष घनमीटर एवढे पाणी बाष्पीभवन होऊन उडून जाते; परंतु उन्हाळ्याला सुरुवात होताच यामध्ये दुपटीने वाढ होते. यंदा मार्चमध्ये तापमानाचा पारा ३८.३ अंशांवर पोहोचला. त्यानंतर एप्रिलमध्ये ४१ आणि मे महिन्यात ४२ अंश सेल्सिअसपर्यंत ताममान गेले. तापमान जसजसे वाढत गेले तसे जायकवाडीतील बाष्पीभवनही वाढत गेले. मार्च महिन्यात ४०.३७८, तर एप्रिलमध्ये ५०.००७ दशलक्ष घनमीटर पाण्याची वाफ झाली. मे महिन्यात ४९.९०३ दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन झाल्याची नोंद करण्यात आली आहे. जायकवाडी येथे बाष्पीभवन मापक यंत्र बसविण्यात आलेले आहे. यातून जलाशयात होणाऱ्या बाष्पीभवनाची नोंद होते.औरंगाबादला महिन्याकाठी जवळपास ९ दशलक्ष घनमीटर याप्रमाणे तीन महिन्यांसाठी सुमारे २७ दशलक्ष घनमीटर पाणी लागते. तीन महिन्यांत बाष्पीभवन झालेल्या पाण्यातून किमान चार महिने जायकवाडीतून पाणीपुरवठा योजनांसाठी पाणी देता आले असते. पाण्याचे बाप्षीभवन थांबविण्यासाठी थर्माकोल, सोलार पॅनल इतर पर्यायांचा वापर केला जातो; परंतु जायकवाडीच्या पाण्याचे क्षेत्र पाहता हे अशक्य आहे. शिवाय ते आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. बाष्पीभवन हे नैसर्गिक चक्र असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांचे म्हणणे आहे. उन्हाळ्यात बाष्पीभवनातून पाणी आटण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी अन्य पर्यायांचा विचार करण्याची गरज आहे.काही प्रमाणात का होईना उन्हाळ्यात जायकवाडीतील पाणी छोट्या प्रकल्पात साठविण्याचा उपाय महत्त्वपूर्ण ठरू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्या जायकवाडीमध्ये १२६६.१०२ दशलक्ष घनमीटर म्हणजे २४.३२ टक्के पाणीसाठा असल्यामुळे पाण्याची फार अडचण नाही. पाणीवापराच्या नियोजनानुसार पाणीसाठा योग्य पद्धतीने पुरवला जात असल्याचे अधिकारी सांगतात.सेकंडरी स्टोअरची कल्पना४पाणी वाचविण्यासाठी उन्हाळ्यात सेकंडरी स्टोअर कल्पना महत्त्वपूर्ण ठरू शकते. औरंगाबाद शहर परिसराला लागणारे पाणी १ मार्चनंतर जलवाहिनीद्वारे शहराजवळ छोट्या प्रकल्पात साठवायचे. प्रकल्प लहान असल्याने त्यातून कमी प्रमाणात बाष्पीभवन होऊन पाणी वाचविणे शक्य आहे. अनेक देशांत ही कल्पना प्रत्यक्षात राबविली गेली आहे.-प्रदीप पुरंदरे, जलतज्ज्ञ

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादwater shortageपाणीकपात