शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
2
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
3
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
4
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
5
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
6
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
7
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
8
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
9
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
10
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
11
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
12
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
13
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
14
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
15
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
16
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
17
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
18
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
19
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
20
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई

औरंगाबादमध्ये आरटीई प्रवेशात श्रीमंतांचीच सरशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 19:52 IST

काही नामांकित शाळांच्या मुख्याध्यापकांनी सत्यता पडताळली असता आरटीई प्रवेशामध्ये गर्भश्रीमंतांच्या मुलांची घुसखोरी मोठ्या प्रमाणात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

औरंगाबाद : काही नामांकित शाळांच्या मुख्याध्यापकांनी सत्यता पडताळली असता आरटीई प्रवेशामध्ये गर्भश्रीमंतांच्या मुलांची घुसखोरी मोठ्या प्रमाणात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. परिणामी खोटी कागदपत्रे तसेच घराचे अंतर दर्शविण्यामध्ये बनावटपणा केल्यामुळे वंचित घटकांतील मुलांच्या अधिकारावरच गदा आली असल्याचे मत शिक्षणाधिकारी एस. पी. जैस्वाल यांनी सांगितले. 

शिक्षण हक्क कायद्यानुसार देण्यात येणार्‍या २५ टक्के प्रवेशाला शिक्षण विभागाने ४ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे पहिल्या फेरीत नाव आलेल्या पालकांना ११ दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे. प्रवेशाची पहिली फेरी १३ मार्च रोजी राबविण्यात आली. आरटीई प्रवेशासाठी जिल्ह्यातील ५६५ शाळांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. या शाळांमध्ये ६ हजार ३७१ जागांसाठी ११ हजार ११६ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. शाळेपासून एक किलोमीटर अंतरावर राहणार्‍या मुलांसाठी पहिली फेरी राबविली. यामध्ये सोडत पद्धतीने जवळपास ३ हजार मुलांची प्रवेशासाठी निवड जाहीर करण्यात आली.

दरम्यान, काही नामांकित शाळांमध्ये अगोदरच्या मुलाला कारने सोडणारे पालक आहेत. ते नियमितपणे शाळेचे शैक्षणिक शुल्कही भरतात. आता मात्र, तेच पालक आपल्या दुसर्‍या मुलाचा ‘आरटीई’ अंतर्गत प्रवेशासाठी त्याच शाळेत आल्याचे पाहून मुख्याध्यापकही चक्रावून गेले आहेत. शहानूरमियाँ परिसरातील एका नामांकित शाळेचे मुख्याध्यापक हे आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी येणार्‍या प्रत्येक पालकाच्या घराचे अंतर मोजण्यासाठी परिश्रम घेत आहेत. त्यांनी अनेक पालकांचे घर पाहिले, तेव्हा तेही चक्रावून गेले. अनेक पालक मोठ्या बंगल्यात राहतात. अनेकांची घरे मार्बलची आहेत. अनेकांच्या घराचे अंतर हे शाळेपासून १ किलोमीटरपेक्षा जास्तच आहे, तरीही अशा पालकांनी खोटी कागदपत्रे काढून, शाळा ते घराचे अंतर बनावट दाखवून प्रवेश घेण्यासाठी शासनाची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. 

शाळांना कागदपत्रांच्या पडताळणीचे अधिकारशिक्षणाधिकारी जैस्वाल यांनी सांगितले की, अनेक श्रीमंत पालकांनी आरटीई प्रवेशामध्ये घुसखोरी केल्यामुळे वंचित, शोषित, दुर्बल घटकांतील मुले मोफत प्रवेशापासून वंचित राहिली आहेत. आरटीई कायद्यांतर्गत प्रवेशासाठी येणार्‍या विद्यार्थ्यांची कागदपत्रे, घर ते शाळेच्या अंतराची सत्यता पडताळणीचे अधिकार शाळांना आहेत. तथापि, एका शाळेत सहावीपासून पुढचे वर्ग आहेत. त्यांना नवीन शैक्षणिक वर्षापासून पहिला वर्ग सुरू करायचा असल्यामुळे त्यांनी ‘आरटीई’ अंतर्गत नोंदणी केली होती. त्यानुसार पहिल्या फेरीत या शाळेत काही मुलांचा नंबर लागला. शाळेत सध्या पहिलीचा वर्गच नाही, तर मुलांना प्रवेश कसा द्यावा, असा पेच निर्माण झाला आहे. मुलांना प्रवेश नाकारला, तर शाळेची मान्यता रद्द करण्याची शिफारस शासनाकडे करणार असल्याचा पवित्रा शिक्षणाधिकारी जैस्वाल यांनी घेतला आहे.