शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
3
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
4
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
5
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
6
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
7
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
8
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
9
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
10
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
11
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
12
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
13
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
14
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
15
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
16
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
18
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
19
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!
20
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?

औरंगाबादमध्ये आरटीई प्रवेशात श्रीमंतांचीच सरशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 19:52 IST

काही नामांकित शाळांच्या मुख्याध्यापकांनी सत्यता पडताळली असता आरटीई प्रवेशामध्ये गर्भश्रीमंतांच्या मुलांची घुसखोरी मोठ्या प्रमाणात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

औरंगाबाद : काही नामांकित शाळांच्या मुख्याध्यापकांनी सत्यता पडताळली असता आरटीई प्रवेशामध्ये गर्भश्रीमंतांच्या मुलांची घुसखोरी मोठ्या प्रमाणात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. परिणामी खोटी कागदपत्रे तसेच घराचे अंतर दर्शविण्यामध्ये बनावटपणा केल्यामुळे वंचित घटकांतील मुलांच्या अधिकारावरच गदा आली असल्याचे मत शिक्षणाधिकारी एस. पी. जैस्वाल यांनी सांगितले. 

शिक्षण हक्क कायद्यानुसार देण्यात येणार्‍या २५ टक्के प्रवेशाला शिक्षण विभागाने ४ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे पहिल्या फेरीत नाव आलेल्या पालकांना ११ दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे. प्रवेशाची पहिली फेरी १३ मार्च रोजी राबविण्यात आली. आरटीई प्रवेशासाठी जिल्ह्यातील ५६५ शाळांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. या शाळांमध्ये ६ हजार ३७१ जागांसाठी ११ हजार ११६ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. शाळेपासून एक किलोमीटर अंतरावर राहणार्‍या मुलांसाठी पहिली फेरी राबविली. यामध्ये सोडत पद्धतीने जवळपास ३ हजार मुलांची प्रवेशासाठी निवड जाहीर करण्यात आली.

दरम्यान, काही नामांकित शाळांमध्ये अगोदरच्या मुलाला कारने सोडणारे पालक आहेत. ते नियमितपणे शाळेचे शैक्षणिक शुल्कही भरतात. आता मात्र, तेच पालक आपल्या दुसर्‍या मुलाचा ‘आरटीई’ अंतर्गत प्रवेशासाठी त्याच शाळेत आल्याचे पाहून मुख्याध्यापकही चक्रावून गेले आहेत. शहानूरमियाँ परिसरातील एका नामांकित शाळेचे मुख्याध्यापक हे आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी येणार्‍या प्रत्येक पालकाच्या घराचे अंतर मोजण्यासाठी परिश्रम घेत आहेत. त्यांनी अनेक पालकांचे घर पाहिले, तेव्हा तेही चक्रावून गेले. अनेक पालक मोठ्या बंगल्यात राहतात. अनेकांची घरे मार्बलची आहेत. अनेकांच्या घराचे अंतर हे शाळेपासून १ किलोमीटरपेक्षा जास्तच आहे, तरीही अशा पालकांनी खोटी कागदपत्रे काढून, शाळा ते घराचे अंतर बनावट दाखवून प्रवेश घेण्यासाठी शासनाची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. 

शाळांना कागदपत्रांच्या पडताळणीचे अधिकारशिक्षणाधिकारी जैस्वाल यांनी सांगितले की, अनेक श्रीमंत पालकांनी आरटीई प्रवेशामध्ये घुसखोरी केल्यामुळे वंचित, शोषित, दुर्बल घटकांतील मुले मोफत प्रवेशापासून वंचित राहिली आहेत. आरटीई कायद्यांतर्गत प्रवेशासाठी येणार्‍या विद्यार्थ्यांची कागदपत्रे, घर ते शाळेच्या अंतराची सत्यता पडताळणीचे अधिकार शाळांना आहेत. तथापि, एका शाळेत सहावीपासून पुढचे वर्ग आहेत. त्यांना नवीन शैक्षणिक वर्षापासून पहिला वर्ग सुरू करायचा असल्यामुळे त्यांनी ‘आरटीई’ अंतर्गत नोंदणी केली होती. त्यानुसार पहिल्या फेरीत या शाळेत काही मुलांचा नंबर लागला. शाळेत सध्या पहिलीचा वर्गच नाही, तर मुलांना प्रवेश कसा द्यावा, असा पेच निर्माण झाला आहे. मुलांना प्रवेश नाकारला, तर शाळेची मान्यता रद्द करण्याची शिफारस शासनाकडे करणार असल्याचा पवित्रा शिक्षणाधिकारी जैस्वाल यांनी घेतला आहे.