शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

‘हम दो, हमारे दो’ऐवजी ‘हम दो, हमारा एक ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 00:11 IST

पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांचा आवश्यक असलेला वेळ, वाढती महागाई, शिक्षणाचा वाढत जाणारा खर्च, अशा विविध कारणांमुळे आता ‘हम दो, हमारे दो’ऐवजी आता ‘हम दो, हमारा एक’ याकडे नागरिकांचा कल वाढतो आहे. विशेषत: शहरामध्ये या नव्या संकल्पनेचे प्रमाण अधिक आहे.

ठळक मुद्देनवीन संकल्पना : कुटुंबात एकच अपत्य, निर्णय घेण्यात महिला आघाडीवर

औरंगाबाद : पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांचा आवश्यक असलेला वेळ, वाढती महागाई, शिक्षणाचा वाढत जाणारा खर्च, अशा विविध कारणांमुळे आता ‘हम दो, हमारे दो’ऐवजी आता ‘हम दो, हमारा एक’ याकडे नागरिकांचा कल वाढतो आहे. विशेषत: शहरामध्ये या नव्या संकल्पनेचे प्रमाण अधिक आहे.शहर असो की ग्रामीण भाग, पूर्वी कुटुंबात एकापेक्षा जास्त अपत्ये असण्याचे प्रमाण अधिक होते. मात्र, वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक समस्या निर्माण होत असल्याची बाब पुढे आली. त्यातून छोटे कुटुंब ठेवण्यासंदर्भात विविध माध्यमांतून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. ‘हम दो, हमारे दो’ ही संकल्पना मोठ्या प्रमाणात रुजली. यामध्ये आता आणखी एक पाऊल पडले आहे. एकच अपत्य ठेवण्याकडे कल वाढत आहे. शिवाय चौथ्या राष्ट्रीय कुटुंब कल्याण सर्वेक्षणातही ‘हम दो, हमारा एक ’ म्हणणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढल्याची बाब पुढे आली होती.शहरात अनेक दाम्पत्ये आहेत, ज्यांना एकच मूल आहे. मुलगा असो की मुलगी, एकच अपत्य ठेवण्याचा निर्णय घेऊन पाल्याच्या सर्वांगीण वाढीकडे लक्ष दिले जात आहे. एक अपत्य ठेवण्यामागे अनेक कारणे आहेत. लग्नाचे वाढते वय, त्यामुळे प्रसूतीदरम्यान निर्माण होणारी गुंतागुंत, करिअर हेदेखील त्यातील कारण आहे. जिल्ह्यात वर्षभरात १२ हजार कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया झाल्या. मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर म्हणाल्या की, छोटे कुटुंब ठेवण्याचा कल वाढत आहे. विशेषत: कु टुंबनियोजन शस्त्रक्रियांमध्ये महिलांचा सहभाग अधिक आहे.मुलगा सीए झालामुलगा असो की मुलगी, एकच अपत्याचा निर्णय मी आणि पत्नी आशा हिने मिळून घेतला होता. त्याच्या पालनाकडे चांगल्या प्रकारे लक्ष देता येईल, ही त्यामागील भूमिका होती. एकच मुलगा आहे. तो आता सीए झाला असून, सध्या आॅस्ट्रेलियात आहे. छोट्याशा कुंटुबामुळे आम्ही अंत्यत समाधानी आहोत.-संजय औरंगाबादकरकाळाची गरजलहान कुटुंब हे नेहमी आनंदी असते. त्यामुळेच ‘लहान कुटुंब, आनंदी कुटुंब’ असे म्हटले जाते. एकच मुलगा आहे. छोटे कुटुंब ही काळाची गरज आहे. त्यामुळे पती आणि मी दोघांनी एकत्रित निर्णय घेतला. मुलाच्या सर्वांगीण वाढीसाठी आम्ही प्रयत्न करतो.-उज्ज्वला ज्ञानेश्वर बनसोड

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSocialसामाजिकFamilyपरिवार