शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

‘हम दो, हमारे दो’ऐवजी ‘हम दो, हमारा एक ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 00:11 IST

पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांचा आवश्यक असलेला वेळ, वाढती महागाई, शिक्षणाचा वाढत जाणारा खर्च, अशा विविध कारणांमुळे आता ‘हम दो, हमारे दो’ऐवजी आता ‘हम दो, हमारा एक’ याकडे नागरिकांचा कल वाढतो आहे. विशेषत: शहरामध्ये या नव्या संकल्पनेचे प्रमाण अधिक आहे.

ठळक मुद्देनवीन संकल्पना : कुटुंबात एकच अपत्य, निर्णय घेण्यात महिला आघाडीवर

औरंगाबाद : पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांचा आवश्यक असलेला वेळ, वाढती महागाई, शिक्षणाचा वाढत जाणारा खर्च, अशा विविध कारणांमुळे आता ‘हम दो, हमारे दो’ऐवजी आता ‘हम दो, हमारा एक’ याकडे नागरिकांचा कल वाढतो आहे. विशेषत: शहरामध्ये या नव्या संकल्पनेचे प्रमाण अधिक आहे.शहर असो की ग्रामीण भाग, पूर्वी कुटुंबात एकापेक्षा जास्त अपत्ये असण्याचे प्रमाण अधिक होते. मात्र, वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक समस्या निर्माण होत असल्याची बाब पुढे आली. त्यातून छोटे कुटुंब ठेवण्यासंदर्भात विविध माध्यमांतून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. ‘हम दो, हमारे दो’ ही संकल्पना मोठ्या प्रमाणात रुजली. यामध्ये आता आणखी एक पाऊल पडले आहे. एकच अपत्य ठेवण्याकडे कल वाढत आहे. शिवाय चौथ्या राष्ट्रीय कुटुंब कल्याण सर्वेक्षणातही ‘हम दो, हमारा एक ’ म्हणणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढल्याची बाब पुढे आली होती.शहरात अनेक दाम्पत्ये आहेत, ज्यांना एकच मूल आहे. मुलगा असो की मुलगी, एकच अपत्य ठेवण्याचा निर्णय घेऊन पाल्याच्या सर्वांगीण वाढीकडे लक्ष दिले जात आहे. एक अपत्य ठेवण्यामागे अनेक कारणे आहेत. लग्नाचे वाढते वय, त्यामुळे प्रसूतीदरम्यान निर्माण होणारी गुंतागुंत, करिअर हेदेखील त्यातील कारण आहे. जिल्ह्यात वर्षभरात १२ हजार कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया झाल्या. मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर म्हणाल्या की, छोटे कुटुंब ठेवण्याचा कल वाढत आहे. विशेषत: कु टुंबनियोजन शस्त्रक्रियांमध्ये महिलांचा सहभाग अधिक आहे.मुलगा सीए झालामुलगा असो की मुलगी, एकच अपत्याचा निर्णय मी आणि पत्नी आशा हिने मिळून घेतला होता. त्याच्या पालनाकडे चांगल्या प्रकारे लक्ष देता येईल, ही त्यामागील भूमिका होती. एकच मुलगा आहे. तो आता सीए झाला असून, सध्या आॅस्ट्रेलियात आहे. छोट्याशा कुंटुबामुळे आम्ही अंत्यत समाधानी आहोत.-संजय औरंगाबादकरकाळाची गरजलहान कुटुंब हे नेहमी आनंदी असते. त्यामुळेच ‘लहान कुटुंब, आनंदी कुटुंब’ असे म्हटले जाते. एकच मुलगा आहे. छोटे कुटुंब ही काळाची गरज आहे. त्यामुळे पती आणि मी दोघांनी एकत्रित निर्णय घेतला. मुलाच्या सर्वांगीण वाढीसाठी आम्ही प्रयत्न करतो.-उज्ज्वला ज्ञानेश्वर बनसोड

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSocialसामाजिकFamilyपरिवार