शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

‘हम दो, हमारे दो’ऐवजी ‘हम दो, हमारा एक ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 00:11 IST

पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांचा आवश्यक असलेला वेळ, वाढती महागाई, शिक्षणाचा वाढत जाणारा खर्च, अशा विविध कारणांमुळे आता ‘हम दो, हमारे दो’ऐवजी आता ‘हम दो, हमारा एक’ याकडे नागरिकांचा कल वाढतो आहे. विशेषत: शहरामध्ये या नव्या संकल्पनेचे प्रमाण अधिक आहे.

ठळक मुद्देनवीन संकल्पना : कुटुंबात एकच अपत्य, निर्णय घेण्यात महिला आघाडीवर

औरंगाबाद : पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांचा आवश्यक असलेला वेळ, वाढती महागाई, शिक्षणाचा वाढत जाणारा खर्च, अशा विविध कारणांमुळे आता ‘हम दो, हमारे दो’ऐवजी आता ‘हम दो, हमारा एक’ याकडे नागरिकांचा कल वाढतो आहे. विशेषत: शहरामध्ये या नव्या संकल्पनेचे प्रमाण अधिक आहे.शहर असो की ग्रामीण भाग, पूर्वी कुटुंबात एकापेक्षा जास्त अपत्ये असण्याचे प्रमाण अधिक होते. मात्र, वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक समस्या निर्माण होत असल्याची बाब पुढे आली. त्यातून छोटे कुटुंब ठेवण्यासंदर्भात विविध माध्यमांतून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. ‘हम दो, हमारे दो’ ही संकल्पना मोठ्या प्रमाणात रुजली. यामध्ये आता आणखी एक पाऊल पडले आहे. एकच अपत्य ठेवण्याकडे कल वाढत आहे. शिवाय चौथ्या राष्ट्रीय कुटुंब कल्याण सर्वेक्षणातही ‘हम दो, हमारा एक ’ म्हणणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढल्याची बाब पुढे आली होती.शहरात अनेक दाम्पत्ये आहेत, ज्यांना एकच मूल आहे. मुलगा असो की मुलगी, एकच अपत्य ठेवण्याचा निर्णय घेऊन पाल्याच्या सर्वांगीण वाढीकडे लक्ष दिले जात आहे. एक अपत्य ठेवण्यामागे अनेक कारणे आहेत. लग्नाचे वाढते वय, त्यामुळे प्रसूतीदरम्यान निर्माण होणारी गुंतागुंत, करिअर हेदेखील त्यातील कारण आहे. जिल्ह्यात वर्षभरात १२ हजार कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया झाल्या. मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर म्हणाल्या की, छोटे कुटुंब ठेवण्याचा कल वाढत आहे. विशेषत: कु टुंबनियोजन शस्त्रक्रियांमध्ये महिलांचा सहभाग अधिक आहे.मुलगा सीए झालामुलगा असो की मुलगी, एकच अपत्याचा निर्णय मी आणि पत्नी आशा हिने मिळून घेतला होता. त्याच्या पालनाकडे चांगल्या प्रकारे लक्ष देता येईल, ही त्यामागील भूमिका होती. एकच मुलगा आहे. तो आता सीए झाला असून, सध्या आॅस्ट्रेलियात आहे. छोट्याशा कुंटुबामुळे आम्ही अंत्यत समाधानी आहोत.-संजय औरंगाबादकरकाळाची गरजलहान कुटुंब हे नेहमी आनंदी असते. त्यामुळेच ‘लहान कुटुंब, आनंदी कुटुंब’ असे म्हटले जाते. एकच मुलगा आहे. छोटे कुटुंब ही काळाची गरज आहे. त्यामुळे पती आणि मी दोघांनी एकत्रित निर्णय घेतला. मुलाच्या सर्वांगीण वाढीसाठी आम्ही प्रयत्न करतो.-उज्ज्वला ज्ञानेश्वर बनसोड

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSocialसामाजिकFamilyपरिवार