शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

आम्हाला नोकरी मिळेना अन् निवृत्त शिक्षकांना २० हजार मानधनावर घेणार! युवकांमध्ये संताप

By राम शिनगारे | Updated: July 15, 2023 15:39 IST

युवकांमध्ये तीव्र पडसाद, शिक्षक संघटनांचाही सेवानिवृत्तांच्या नेमणुकीला विरोध

छत्रपती संभाजीनगर : राज्य शासनाने जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त शिक्षकांच्या पदांवर सेवानिवृत्त शिक्षकांना मानधन तत्त्वावर नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाची अंमलबजावणी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सुरू झाली आहे. हजारो पात्रताधारक बेरोजगार नोकरीच्या शोधासाठी भटकंती करीत असताना त्यांच्या नेमणुका करण्याऐवजी ज्यांना मोठ्या प्रमाणात पेन्शन मिळते, त्यांच्या नियुक्तीचा घाट शासनाने घातला आहे. या निर्णयाला बेरोजगार युवकांसह शिक्षक संघटनांनी विरोध दर्शविला आहे. त्याचे पडसादही उमटण्यास सुरुवात झाली आहे.

महिन्याला २० हजार मानधनराज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांच्या कंत्राटी तत्त्वावर नियुक्तीचा आदेश ७ जुलै रोजी काढला आहे. सदर आदेशानुसार ७० वर्षे वयापर्यंतच्या सेवानिवृत्त शिक्षकांना नेमणुका देता येणार आहेत. या सेवानिवृत्तांना २० हजार रुपये प्रतिमहिना मानधन देण्याचे आदेशात म्हटले आहे. सेवानिवृत्तांच्या नेमणुकीची प्रक्रिया पंधरा दिवसांत पूर्ण करण्याचेही आदेशात म्हटले आहे.

जिल्ह्यात शिक्षकांच्या ७०० जागा रिक्तजिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मागील वर्षीच्या संचमान्यतेनुसार जवळपास ७०० जागा रिक्त आहेत. त्यामध्ये यावर्षीच्या संचमान्यतेनुसार बदल होणार आहे. या जागांवर नेमणुकीसाठी हजारो पात्रताधारक बेरोजगार रांगेत उभे आहेत. त्यांना नोकरीची संधी मिळत नसतानाच सेवानिवृत्तांची नेमणूक केली जाणार आहे.

उपोषण करणार राज्याचे शिक्षणमंत्री ३० हजार शिक्षकांच्या भरतीची यादी ऑगस्टमध्ये लावणार असल्याची घोषणा करतात. त्याचवेळी मागच्या दाराने सेवानिवृत्तांची नेमणूक करण्याचा आदेश काढतात. या आदेशामुळे शिक्षक भरती होणारच नसल्याचे स्पष्ट होते. या विरोधात पुण्यातील शिक्षण आयुक्तालयासमोर १७ जुलैपासून बेमुदत उपोषण सुरू करणार आहोत.-संतोष मगर, अध्यक्ष, डीटीएड, बीएड स्टुडंटस् असोसिएशन

अनेक जागा रिकाम्या सेवानिवृत्त शिक्षकांना नेमण्यासाठी निधीची आवश्यकता लागणार आहे. हा निधी कोठून उपलब्ध करायचा त्याविषयीचे मार्गदर्शन वरिष्ठ करतील. त्यानंतर रिक्त जागांवर नेमणुकीचा निर्णय होऊ शकतो. सध्या प्रत्येक तालुक्यात ५ ते ७ टक्के शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्यानुसार सेवानिवृत्तांच्या नेमणुकीचा निर्णय घेतला जाईल.- जयश्री चव्हाण, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जि. प.

युवकांची नेमणूक करावी 

पात्रताधारक युवकांना संधी मिळाली पाहिजे. ते काम करू शकतात. युवकांच्या उत्साहाचा उपयोग विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठीच होईल. सेवानिवृत्त शिक्षक कामे करू शकणार नाहीत. त्यामुळे सेवानिवृत्तांपेक्षा युवकांचीच नेमणूक मानधन तत्त्वावर झाली पाहिजे.-प्रभाकर पवार, माजी निमंत्रित सदस्य, शिक्षण समिती

टॅग्स :Educationशिक्षणTeacherशिक्षकAurangabadऔरंगाबाद