शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मराठवाड्यातील १४४ गावांना हिवाळ्यातच टँकरद्वारे पाणी; टँकरने ओलांडला १०० चा आकडा

By विकास राऊत | Updated: November 17, 2023 19:59 IST

प्रशासनाने विभागात ४०४ विहिरींचे अधिग्रहण केले आहे.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात येणाऱ्या काळात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे. हिवाळ्यातच विभागातील १४४ गावे तहानली असून, त्यांना १४३ टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. ४०४ विहिरी प्रशासनाने ताब्यात घेतल्या आहेत. ११८ गावे आणि २६ वाड्या सध्या तहानल्या आहेत. पंधरा दिवसांपूर्वी १०० च्या आसपास टँकरने पाणीपुरवठा होता. दिवाळीनंतर त्यात ४३ टँकरची भर पडली आहे.

गेल्या पावसाळ्यात मराठवाड्यात १५ टक्के पाऊस झाला. त्यातच नांदेड, हिंगोली वगळता सहा जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा खंड राहिला. परिणामी सिंचन प्रकल्पांमध्ये अपेक्षित पाणीसाठा झाला नाही. पुढील दोन ते तीन महिन्यांत प्रकल्प कोरडे होतील. त्यानंतर मात्र विभागातील सहा जिल्ह्यांना टंचाईच्या झळा सोसाव्या लागतील. सध्या छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांतील १४४ गावांमध्ये १४३ टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. विभागीय प्रशासनाने गेल्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांची आगामी काळातील टंचाईच्या अनुषंगाने बैठक घेऊन नियोजनाच्या सूचना दिल्या आहेत.

४०४ विहिरींचे अधिग्रहण....प्रशासनाने विभागात ४०४ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. यात टँकरसाठी ६९, तर टँकर व्यतिरिक्त २५४ विहिरींचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर व जालना या जिल्ह्यांतील ७० विहिरी प्रशासनाने ताब्यात (अधिग्रहीत) घेतल्या आहेत.

टॅग्स :WaterपाणीAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा