शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील १४४ गावांना हिवाळ्यातच टँकरद्वारे पाणी; टँकरने ओलांडला १०० चा आकडा

By विकास राऊत | Updated: November 17, 2023 19:59 IST

प्रशासनाने विभागात ४०४ विहिरींचे अधिग्रहण केले आहे.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात येणाऱ्या काळात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे. हिवाळ्यातच विभागातील १४४ गावे तहानली असून, त्यांना १४३ टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. ४०४ विहिरी प्रशासनाने ताब्यात घेतल्या आहेत. ११८ गावे आणि २६ वाड्या सध्या तहानल्या आहेत. पंधरा दिवसांपूर्वी १०० च्या आसपास टँकरने पाणीपुरवठा होता. दिवाळीनंतर त्यात ४३ टँकरची भर पडली आहे.

गेल्या पावसाळ्यात मराठवाड्यात १५ टक्के पाऊस झाला. त्यातच नांदेड, हिंगोली वगळता सहा जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा खंड राहिला. परिणामी सिंचन प्रकल्पांमध्ये अपेक्षित पाणीसाठा झाला नाही. पुढील दोन ते तीन महिन्यांत प्रकल्प कोरडे होतील. त्यानंतर मात्र विभागातील सहा जिल्ह्यांना टंचाईच्या झळा सोसाव्या लागतील. सध्या छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांतील १४४ गावांमध्ये १४३ टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. विभागीय प्रशासनाने गेल्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांची आगामी काळातील टंचाईच्या अनुषंगाने बैठक घेऊन नियोजनाच्या सूचना दिल्या आहेत.

४०४ विहिरींचे अधिग्रहण....प्रशासनाने विभागात ४०४ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. यात टँकरसाठी ६९, तर टँकर व्यतिरिक्त २५४ विहिरींचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर व जालना या जिल्ह्यांतील ७० विहिरी प्रशासनाने ताब्यात (अधिग्रहीत) घेतल्या आहेत.

टॅग्स :WaterपाणीAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा