शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

पुण्यात १४८०, नाशिकला १२०० औरंगाबादेत पाणीपट्टी ४०५० का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 19:06 IST

सामाजिक मंच, पाणीपुरवठा नागरी कृती समितीचे आंदोलन 

ठळक मुद्देमनपासमोर नागरिकांचे निदर्शने खासगीकरण रद्द झाल्यानंतरही पाणीपट्टी मात्र कायमच वाढलेली आहे.

औरंगाबाद : पुण्यात दररोज नागरिकांना पाणीपुरवठाकरण्यात येतो. पाणीपट्टी फक्त १४८० रुपये वसूल करण्यात येते. नाशिक शहरातही महापालिका दररोज पाणीपुरवठा करून नागरिकांकडून फक्त १२०० रुपये पाणीपट्टी घेत आहे. औरंगाबादेत आठवड्यातून एकदा पाणी देण्यात येते. त्यानंतरही पाणीपट्टी तब्बल ४०५० रुपये वसूल करण्यात येते. या अवाढव्य पाणीपट्टीच्या निषेधार्थ सोमवारी दुपारी मनपासमोर सामाजिक मंच व पाणीपुरवठा नागरी कृती समितीतर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली.

निदर्शनानंतर शिष्टमंडळाने महापौर नंदकुमार घोडेले, आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांना निवेदन सादर केले. निवेदनात नमूद करण्यात आले की, महानगरपालिकेने २०१२ मध्ये समांतर जलवाहिनीसाठी पाणीपुरवठ्याचे खासगीकरण केले. कंत्राट एस.पी.एम.एल., तसेच सिटी वॉटर युटीलिटी कंपनीला दिले. नागरिकांचा प्रखर विरोध लक्षात घेता महापालिकेने हे खासगीकरण नंतर रद्द केले. दरम्यानच्या काळात पाणीपुरवठा एवढा विस्कळीत झाला की, दोन दिवसाआड, नंतर तीन दिवसाआड, चार दिवसाआड करीत आज पाणीपुरवठा सहा ते सात दिवसांआड झाला आहे. दुसरीकडे पाणीपट्टी १८०० रुपयांवरून ४०५० रुपयांवर नेण्यात आली. खासगीकरण रद्द झाल्यानंतरही पाणीपट्टी मात्र कायमच वाढलेली आहे. मनपाकडून करण्यात आलेली दरवाढ रद्द करावी अशी मागणीही निवेदनात केली आहे. 

शिष्टमंडळाने महापौरांसोबत चर्चा करताना नमूद केले की, राज्यात एवढी प्रचंड पाणीपट्टी कोणत्याच शहरात नाही. महापालिकेने या गंभीर प्रश्नात लक्ष घालावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या आंदोलनात सामाजिक मंचचे प्रा. विजय दिवाण, सुभाष लोमटे, अजमल खान, मेराज सिद्दीकी, अण्णा खंदारे, भीमराव बनसोड, बुद्धिनाथ बराळ, सिद्धार्थ बनसोड, डॉ. सुनीती धारवाडकर, सुलभा खंदारे, मंगल खिंवसरा यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादWaterपाणीTaxकरagitationआंदोलन