शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
3
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
4
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
5
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
6
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
7
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
8
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
9
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
10
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
11
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
12
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
13
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
14
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
16
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
17
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
18
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
19
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

पुण्यात १४८०, नाशिकला १२०० औरंगाबादेत पाणीपट्टी ४०५० का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 19:06 IST

सामाजिक मंच, पाणीपुरवठा नागरी कृती समितीचे आंदोलन 

ठळक मुद्देमनपासमोर नागरिकांचे निदर्शने खासगीकरण रद्द झाल्यानंतरही पाणीपट्टी मात्र कायमच वाढलेली आहे.

औरंगाबाद : पुण्यात दररोज नागरिकांना पाणीपुरवठाकरण्यात येतो. पाणीपट्टी फक्त १४८० रुपये वसूल करण्यात येते. नाशिक शहरातही महापालिका दररोज पाणीपुरवठा करून नागरिकांकडून फक्त १२०० रुपये पाणीपट्टी घेत आहे. औरंगाबादेत आठवड्यातून एकदा पाणी देण्यात येते. त्यानंतरही पाणीपट्टी तब्बल ४०५० रुपये वसूल करण्यात येते. या अवाढव्य पाणीपट्टीच्या निषेधार्थ सोमवारी दुपारी मनपासमोर सामाजिक मंच व पाणीपुरवठा नागरी कृती समितीतर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली.

निदर्शनानंतर शिष्टमंडळाने महापौर नंदकुमार घोडेले, आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांना निवेदन सादर केले. निवेदनात नमूद करण्यात आले की, महानगरपालिकेने २०१२ मध्ये समांतर जलवाहिनीसाठी पाणीपुरवठ्याचे खासगीकरण केले. कंत्राट एस.पी.एम.एल., तसेच सिटी वॉटर युटीलिटी कंपनीला दिले. नागरिकांचा प्रखर विरोध लक्षात घेता महापालिकेने हे खासगीकरण नंतर रद्द केले. दरम्यानच्या काळात पाणीपुरवठा एवढा विस्कळीत झाला की, दोन दिवसाआड, नंतर तीन दिवसाआड, चार दिवसाआड करीत आज पाणीपुरवठा सहा ते सात दिवसांआड झाला आहे. दुसरीकडे पाणीपट्टी १८०० रुपयांवरून ४०५० रुपयांवर नेण्यात आली. खासगीकरण रद्द झाल्यानंतरही पाणीपट्टी मात्र कायमच वाढलेली आहे. मनपाकडून करण्यात आलेली दरवाढ रद्द करावी अशी मागणीही निवेदनात केली आहे. 

शिष्टमंडळाने महापौरांसोबत चर्चा करताना नमूद केले की, राज्यात एवढी प्रचंड पाणीपट्टी कोणत्याच शहरात नाही. महापालिकेने या गंभीर प्रश्नात लक्ष घालावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या आंदोलनात सामाजिक मंचचे प्रा. विजय दिवाण, सुभाष लोमटे, अजमल खान, मेराज सिद्दीकी, अण्णा खंदारे, भीमराव बनसोड, बुद्धिनाथ बराळ, सिद्धार्थ बनसोड, डॉ. सुनीती धारवाडकर, सुलभा खंदारे, मंगल खिंवसरा यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादWaterपाणीTaxकरagitationआंदोलन