शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
3
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
4
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
5
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
6
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
7
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
8
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
9
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
10
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
11
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
12
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
13
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
14
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
15
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
16
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
17
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
18
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
20
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन

पुण्यात १४८०, नाशिकला १२०० औरंगाबादेत पाणीपट्टी ४०५० का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 19:06 IST

सामाजिक मंच, पाणीपुरवठा नागरी कृती समितीचे आंदोलन 

ठळक मुद्देमनपासमोर नागरिकांचे निदर्शने खासगीकरण रद्द झाल्यानंतरही पाणीपट्टी मात्र कायमच वाढलेली आहे.

औरंगाबाद : पुण्यात दररोज नागरिकांना पाणीपुरवठाकरण्यात येतो. पाणीपट्टी फक्त १४८० रुपये वसूल करण्यात येते. नाशिक शहरातही महापालिका दररोज पाणीपुरवठा करून नागरिकांकडून फक्त १२०० रुपये पाणीपट्टी घेत आहे. औरंगाबादेत आठवड्यातून एकदा पाणी देण्यात येते. त्यानंतरही पाणीपट्टी तब्बल ४०५० रुपये वसूल करण्यात येते. या अवाढव्य पाणीपट्टीच्या निषेधार्थ सोमवारी दुपारी मनपासमोर सामाजिक मंच व पाणीपुरवठा नागरी कृती समितीतर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली.

निदर्शनानंतर शिष्टमंडळाने महापौर नंदकुमार घोडेले, आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांना निवेदन सादर केले. निवेदनात नमूद करण्यात आले की, महानगरपालिकेने २०१२ मध्ये समांतर जलवाहिनीसाठी पाणीपुरवठ्याचे खासगीकरण केले. कंत्राट एस.पी.एम.एल., तसेच सिटी वॉटर युटीलिटी कंपनीला दिले. नागरिकांचा प्रखर विरोध लक्षात घेता महापालिकेने हे खासगीकरण नंतर रद्द केले. दरम्यानच्या काळात पाणीपुरवठा एवढा विस्कळीत झाला की, दोन दिवसाआड, नंतर तीन दिवसाआड, चार दिवसाआड करीत आज पाणीपुरवठा सहा ते सात दिवसांआड झाला आहे. दुसरीकडे पाणीपट्टी १८०० रुपयांवरून ४०५० रुपयांवर नेण्यात आली. खासगीकरण रद्द झाल्यानंतरही पाणीपट्टी मात्र कायमच वाढलेली आहे. मनपाकडून करण्यात आलेली दरवाढ रद्द करावी अशी मागणीही निवेदनात केली आहे. 

शिष्टमंडळाने महापौरांसोबत चर्चा करताना नमूद केले की, राज्यात एवढी प्रचंड पाणीपट्टी कोणत्याच शहरात नाही. महापालिकेने या गंभीर प्रश्नात लक्ष घालावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या आंदोलनात सामाजिक मंचचे प्रा. विजय दिवाण, सुभाष लोमटे, अजमल खान, मेराज सिद्दीकी, अण्णा खंदारे, भीमराव बनसोड, बुद्धिनाथ बराळ, सिद्धार्थ बनसोड, डॉ. सुनीती धारवाडकर, सुलभा खंदारे, मंगल खिंवसरा यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादWaterपाणीTaxकरagitationआंदोलन