शहराला केवळ एका जलकुंभ पॉर्इंटवरून होतोय पाणीपुरवठा

By Admin | Updated: March 28, 2016 00:17 IST2016-03-28T00:01:47+5:302016-03-28T00:17:09+5:30

लातूर : लातूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी शहरात ६ ठिकाणी जलकुंभ टँकर पॉर्इंट असले तरी केवळ आर्वी येथील जलकुंभ टँकर पॉर्इंटवरूनच पाणी वितरीत केले जात आहे़

Water supply is done only through a watercourse point in the city | शहराला केवळ एका जलकुंभ पॉर्इंटवरून होतोय पाणीपुरवठा

शहराला केवळ एका जलकुंभ पॉर्इंटवरून होतोय पाणीपुरवठा


लातूर : लातूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी शहरात ६ ठिकाणी जलकुंभ टँकर पॉर्इंट असले तरी केवळ आर्वी येथील जलकुंभ टँकर पॉर्इंटवरूनच पाणी वितरीत केले जात आहे़ अन्य जलकुंभात पाणी सोडल्यानंतर घट होत आहे़ त्यामुळे सध्यातरी आर्वी येथीलच जलकुंभ पॉर्इंटवरून टँकरद्वारे पाणी वितरण केले जात आहे़ रविवारी या पॉर्इंटवरून ६ हजार लिटर क्षमतेच्या १६६ टँकर फेऱ्या करून शहरात पाणीपुरवठा करण्यात आला आहे़ अन्य जलकुंभ कोरडेच आहेत़
हरंगुळ येथील जलशुद्धीकरण केंद्रातून बार्शी रोड पाण्याची टाकी, औसा रोडवरील पाण्याची टाकी आणि गांधी चौकातील पाण्याच्या टाकीत पाणी सोडता येते़ त्यानुसार हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्रात टँकरद्वारे आणलेले पाणी प्रस्तूत जलकुंभात टाकण्यात आले़ परंतू, जलकुंभाच्या मुख्य लाईनवर पाण्याचे मोठ मोठे कनेक्शन असल्यामुळे पाण्याची तुट झाली़ त्यामुळे या जलशुद्धीकरण केंद्रातून जलकुंभात पाणी टाकण्याचे नियोजन आता बंद करण्यता आले आहे़ परिणामी शहरातल्या केवळ आर्वी येथील जलकुंभातूनच टँकरद्वारे पाणी वितरण केले जात आहे़ हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्र ते गांधी चौक, सरस्वती कॉलनी आणि बार्शी रोडवरील पाण्याच्या टाकीत पाणी सोडल्यानंतर निम्म्या पाण्याची तुट होत आहे़ त्यामुळे मुख्य लाईनवरील मोठे कनेक्शन तोडले असले तरी या जलकुंभपॉर्इंटवरून पाणी टँकर भरणा बंद आहे़ त्यामुळे केवळ एका जलकुंभातून पाणी टँकर भरणा करून शहराला पुरवठा केला जात आहे़ ५ लाख लोकसंख्या असलेल्या शहराला एका जलकुंभावरून पाणी टँकरभरणा करून पाणी देण्यास प्रशसनाला कसरत करावी लागत आहे़ रविवारी दिवसभरात ६ हजार लिटर क्षमतेच्या केवळ १६६ टँकर फेऱ्या झाल्या़ ९ लाख लिटर्स पाण्याचे वितरण रविवारी झाले़ एका कुटूंबाला २०० लिटर हा नियम ग्राह्य धरला तरी ८ ते १० हजार कुटूंबांनाच पाणी मिळू शकले़ आर्वी जलकुंभ पॉर्इंटवरून शहराच्या नव्या वस्त्यांना पाणी देणे शक्य आहे़ तर बाभळगाव जलकुंभ टँकर पॉर्इंट सुरु करून जुन्या गाव भागात पाण्याचे वितरण करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न आहेत़ पुर्ण शहराला व्यवस्थीत पाणी वितरण होण्यासाठी शहरातील सहाही जलकुंभ टँकर पॉर्इंट सुरु होणे आवश्यक आहे़ मात्र शासकीय जलकुंभ टँकर पॉर्इंट, सरस्वती कॉलनी कॉलनी जलकुंभ टँकर पॉर्इंट, गांधी चौक जलकुंभ टँकर पॉर्इंट, नांदेड नाका जलकुंभ टँकर पॉर्इंट, आणि कॉईल नगर जलकुंभ टँकर पॉर्इंट सध्यातरी बंद आहेत़ मनपा प्रशासनाने सहाही टँकर पॉर्इंटवरून पाणी वितरीत करण्यासाठी प्रयत्न सुरु केले़ परंतू, पाण्याची घट होत असल्याने प्रशासनासमोेर संकट उभे टाकले आहे़
मागच्या आठवड्यात हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्रातून ३० लाख लिटर पाणी शहरातील बार्शी रोड, औसा रोड आणि गांधी चौकातील जलकुंभात सोडले होते़ मात्र १२ लाख लिटरच पाणी आले़ निम्या पाण्याची घट झाली़ पाणी गेले कोठे़ याचा शोध घेतला असता हरंगुळ ते गांधी चौक जलकुंभ पॉर्इंटवरील मुख्य लाईनवर कनेक्शन होते़ हे कनेक्शन तोडले नव्हते़ त्यामुळे पाण्याची घट झाली़ ही बाब लक्षात आल्यानंतर ३० ते ३५ कनेक्शन तोडण्यात आले असले तरी या जलशुद्धी केंद्रातून जलकुंभात त्यानंतर सोडले नाही़ परिणामी, सध्या एकाच आर्वी येथील जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा आहे़

Web Title: Water supply is done only through a watercourse point in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.